शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

दहा वर्षातील निधी गेला कुठे?

By admin | Updated: December 9, 2015 00:32 IST

या तालुक्यात गेल्या दहा वर्षात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे.वन विभाग, जिल्हा परीषद, सामाजिक वनीकरण,कृषी विभाग

श्याम राऊत,  टोकावडे/मुरबाड या तालुक्यात गेल्या दहा वर्षात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे.वन विभाग, जिल्हा परीषद, सामाजिक वनीकरण,कृषी विभाग,लोकनिधींचे आर्थिक योगदान, श्रमदान,अशा प्रकारे अनेक योजना राबवून ,नदी नाल्यावर माती बंधारे,सिमेंट बंधारे,नाला बंडींगच्या माध्यमातून पाणी अडवण्याची कामे करण्यात आलीत.मात्र १९७२नंतर प्रथमच पाणी टंचाई,आणि दुष्काळ दिसू लागल्याने, नवीन बंधारे बांधले जावेत असे प्रशासनाला वाटू लागले आहे. त्यामुळे बंधारे बांधण्याचा खटाटोप शासकिय यंत्रणा करीत आहे.मात्र दहा वर्षात केलेला लाखोंचा खर्च गेला कुठे याचा शोध शासनाने घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यात २२७ महसूल गावात नदी नाल्यावर ठिकठिकाणी जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे, वनी विभाग, कृषी विभाग,सामाजिक वनीकरण,पाणलोट क्षेत्र विकास,योजनाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात कोट्यावधींचा खर्च पक्के बंधारे,माती बंधारे,नाला बडींग,वनीकरण,यावर करण्यात आला.केलेली कामे कशी होतात . याची देखरेख वरिष्ठ अधिकारी , ग्रामपंचायत सदस्य, आमदार, खासदार अशांची असतांना केवळ कार्यकर्ते पोसण्यासाठी त्यांच्या कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असते.तर अधिकारी टक्केवारीच्या भागिदारीमु्ळे ठेकेदाराना पाठीशी घालण्यात ते धन्यता मानत असल्याने केलेली कामे चांगली कशी होणार? त्यामुळे बंधाऱ्यांच्या वरून पाणी जाण्या ऐवजी खालून पाणी जाते.आता ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी जिल्ह्यातील नागरीकांना श्रमदानातून वन बंधारे बांधण्याचे आवाहन केले होते.त्याला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद देऊन ,नदी नाल्यावर बंधारे बांधले. १९७२ नंतर ठाणे जिल्ह्यात पाण्याची समस्या उध्भवणार असल्याने प्रशासन जागे झाले .परंतु दहा वर्षात किती कोटी खर्च पाण्यावर झाले याचा शोध कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी जोशी मॅडम यांनी घ्यावा असे नागरिकांचे मत आहे. मागील कालावधीतील या कामांचा आढावा घेतल्यास ,पाणी जिरवण्याऐवजी पैसे जिरवले, असेच चित्र आहे.