शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

दहा वर्षातील निधी गेला कुठे?

By admin | Updated: December 9, 2015 00:32 IST

या तालुक्यात गेल्या दहा वर्षात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे.वन विभाग, जिल्हा परीषद, सामाजिक वनीकरण,कृषी विभाग

श्याम राऊत,  टोकावडे/मुरबाड या तालुक्यात गेल्या दहा वर्षात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे.वन विभाग, जिल्हा परीषद, सामाजिक वनीकरण,कृषी विभाग,लोकनिधींचे आर्थिक योगदान, श्रमदान,अशा प्रकारे अनेक योजना राबवून ,नदी नाल्यावर माती बंधारे,सिमेंट बंधारे,नाला बंडींगच्या माध्यमातून पाणी अडवण्याची कामे करण्यात आलीत.मात्र १९७२नंतर प्रथमच पाणी टंचाई,आणि दुष्काळ दिसू लागल्याने, नवीन बंधारे बांधले जावेत असे प्रशासनाला वाटू लागले आहे. त्यामुळे बंधारे बांधण्याचा खटाटोप शासकिय यंत्रणा करीत आहे.मात्र दहा वर्षात केलेला लाखोंचा खर्च गेला कुठे याचा शोध शासनाने घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यात २२७ महसूल गावात नदी नाल्यावर ठिकठिकाणी जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे, वनी विभाग, कृषी विभाग,सामाजिक वनीकरण,पाणलोट क्षेत्र विकास,योजनाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात कोट्यावधींचा खर्च पक्के बंधारे,माती बंधारे,नाला बडींग,वनीकरण,यावर करण्यात आला.केलेली कामे कशी होतात . याची देखरेख वरिष्ठ अधिकारी , ग्रामपंचायत सदस्य, आमदार, खासदार अशांची असतांना केवळ कार्यकर्ते पोसण्यासाठी त्यांच्या कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असते.तर अधिकारी टक्केवारीच्या भागिदारीमु्ळे ठेकेदाराना पाठीशी घालण्यात ते धन्यता मानत असल्याने केलेली कामे चांगली कशी होणार? त्यामुळे बंधाऱ्यांच्या वरून पाणी जाण्या ऐवजी खालून पाणी जाते.आता ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी जिल्ह्यातील नागरीकांना श्रमदानातून वन बंधारे बांधण्याचे आवाहन केले होते.त्याला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद देऊन ,नदी नाल्यावर बंधारे बांधले. १९७२ नंतर ठाणे जिल्ह्यात पाण्याची समस्या उध्भवणार असल्याने प्रशासन जागे झाले .परंतु दहा वर्षात किती कोटी खर्च पाण्यावर झाले याचा शोध कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी जोशी मॅडम यांनी घ्यावा असे नागरिकांचे मत आहे. मागील कालावधीतील या कामांचा आढावा घेतल्यास ,पाणी जिरवण्याऐवजी पैसे जिरवले, असेच चित्र आहे.