शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वाड्याला नगरपंचायत कधी

By admin | Updated: June 3, 2016 01:42 IST

राज्यातील सर्व तालुका मुख्यालये असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण असून त्या प्रमाणे पालघर जिल्हातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या ग्रामपंचायतींना

वाडा : राज्यातील सर्व तालुका मुख्यालये असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण असून त्या प्रमाणे पालघर जिल्हातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आला. मात्र वाड्याला या पासून का वगळले, असा प्रश्न चर्चिला जात असून हे काम पालकमंत्री सवरांना झेपणारे नसून त्यासाठी शिवसेनेने आता सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनाच साकडे घालायचे ठरवले आहे. शासनाने १ मार्च २०१४ च्या अधिसूचनव्दारे १० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या व तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक २७ जुलै २०१५ रोजी जिल्हा परिषदेला पाठविलेल्या पत्रान्वये तसे प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने वाडा ,मोखाडा, विक्रमगड व तलासरी या ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्ताव ७ नोव्हेंबर २०१५ रोजी ग्रामविकास विभागाकडे पाठविले होते. या प्रस्तावानुसार वरील चारही तालुकास्तरीय ग्रामपंचायतीना नगर पंचायतीचा दर्जा देणे आवश्यक होते. मात्र ७ मे २०१६ च्या अधिसूचनेनुसार जिल्हयातील विक्र मगड, मोखाडा व तलासरी या नगरपंचायतीची निर्मिती करण्यात आली. मात्र झपाटयÞाने विस्तारणाऱ्या वाडासारख्या मोठ्या ग्रामपंचायतीला यातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हयातील वाडा, विक्र मगड, तलासरी व मोखाडा या चारही तालुकास्तरीय ग्रामपंचायतीचे प्रस्ताव असताना नगरविकास विभागाने विक्रमगड, मोखाडा व तलासरी या तीनच नगरपंचायतीची घोषणा केली. मात्र यातून वाडा वगळण्याने पालकमंत्र्यांचे राजकीय बळ कमी पडले, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. तर काही जाणकार या निर्णयाला स्थानिक राजकारणाची फोडणी असल्याचेही छातीठोकपणे सांगतात. खरे तर वाडा तालुका हा औद्योगिकीकरणासाठी प्रसिद्ध आहे. शेकडो कारखाने डी प्लस झोनमुळे वाडा तालुक्यात आहेत. या कंपन्यामुळे नोकरी कामधंद्यासाठी आलेल्यांची संख्या वाड्यात वाढली आहे. अनेक शासकीय व निमशासकीय कर्मचारी येथे राहतात. त्यामुळे वाडा गावाचे नागरीकरण झपाटयÞाने वाढत आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार असणाऱ्या आकडेवारीपेक्षा वाड्याची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. त्यामुळे वाडा गावात नागरी समस्यांचा ताण वाढत आहे.या नागरी समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता ग्रामपंचायतीची नसल्याने सर्वात आधी वाड्यात नगरपंचायत होणे अपेक्षित होते. वाड्याची नगरपंचायत व्हावी या करिता स्थानिकांनी सातत्याने लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेकडे मागणी केली होती. तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण शासनाने जाहीर केल्यापासून वाडावासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र नुकत्याच नगरपंचायतींच्या घोषणा करतांना वाड्याला वगळल्याने जनतेत नाराजी पसरली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे वाड्यात राहात असून त्यांचे निवासस्थान असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)