शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

वाड्याला नगरपंचायत कधी

By admin | Updated: June 3, 2016 01:42 IST

राज्यातील सर्व तालुका मुख्यालये असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण असून त्या प्रमाणे पालघर जिल्हातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या ग्रामपंचायतींना

वाडा : राज्यातील सर्व तालुका मुख्यालये असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण असून त्या प्रमाणे पालघर जिल्हातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आला. मात्र वाड्याला या पासून का वगळले, असा प्रश्न चर्चिला जात असून हे काम पालकमंत्री सवरांना झेपणारे नसून त्यासाठी शिवसेनेने आता सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनाच साकडे घालायचे ठरवले आहे. शासनाने १ मार्च २०१४ च्या अधिसूचनव्दारे १० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या व तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक २७ जुलै २०१५ रोजी जिल्हा परिषदेला पाठविलेल्या पत्रान्वये तसे प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने वाडा ,मोखाडा, विक्रमगड व तलासरी या ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्ताव ७ नोव्हेंबर २०१५ रोजी ग्रामविकास विभागाकडे पाठविले होते. या प्रस्तावानुसार वरील चारही तालुकास्तरीय ग्रामपंचायतीना नगर पंचायतीचा दर्जा देणे आवश्यक होते. मात्र ७ मे २०१६ च्या अधिसूचनेनुसार जिल्हयातील विक्र मगड, मोखाडा व तलासरी या नगरपंचायतीची निर्मिती करण्यात आली. मात्र झपाटयÞाने विस्तारणाऱ्या वाडासारख्या मोठ्या ग्रामपंचायतीला यातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हयातील वाडा, विक्र मगड, तलासरी व मोखाडा या चारही तालुकास्तरीय ग्रामपंचायतीचे प्रस्ताव असताना नगरविकास विभागाने विक्रमगड, मोखाडा व तलासरी या तीनच नगरपंचायतीची घोषणा केली. मात्र यातून वाडा वगळण्याने पालकमंत्र्यांचे राजकीय बळ कमी पडले, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. तर काही जाणकार या निर्णयाला स्थानिक राजकारणाची फोडणी असल्याचेही छातीठोकपणे सांगतात. खरे तर वाडा तालुका हा औद्योगिकीकरणासाठी प्रसिद्ध आहे. शेकडो कारखाने डी प्लस झोनमुळे वाडा तालुक्यात आहेत. या कंपन्यामुळे नोकरी कामधंद्यासाठी आलेल्यांची संख्या वाड्यात वाढली आहे. अनेक शासकीय व निमशासकीय कर्मचारी येथे राहतात. त्यामुळे वाडा गावाचे नागरीकरण झपाटयÞाने वाढत आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार असणाऱ्या आकडेवारीपेक्षा वाड्याची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. त्यामुळे वाडा गावात नागरी समस्यांचा ताण वाढत आहे.या नागरी समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता ग्रामपंचायतीची नसल्याने सर्वात आधी वाड्यात नगरपंचायत होणे अपेक्षित होते. वाड्याची नगरपंचायत व्हावी या करिता स्थानिकांनी सातत्याने लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेकडे मागणी केली होती. तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण शासनाने जाहीर केल्यापासून वाडावासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र नुकत्याच नगरपंचायतींच्या घोषणा करतांना वाड्याला वगळल्याने जनतेत नाराजी पसरली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे वाड्यात राहात असून त्यांचे निवासस्थान असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)