शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

कुडूस-चिंचघर-गौरापूर रस्त्याची गाडी फास्ट कधी धावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:06 IST

तालुक्यातील कुडूस- चिंचघर-गौरापूर या रस्त्याच्या मजबूतीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील देवघर या गावाच्या हद्दीत छोट्या पुलाचे काम सुरू असून ते अत्यंत संथगतीने सुरू आहे.

- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील कुडूस- चिंचघर-गौरापूर या रस्त्याच्या मजबूतीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील देवघर या गावाच्या हद्दीत छोट्या पुलाचे काम सुरू असून ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. पावसाळ्याला अवघे काही दिवस उरले असून त्याआधी हे काम न झाल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.तालुक्यातील वर्दळीचा असणारा कुडूस - देवघर - गौरापूर या अंतर्गत रस्त्याच्या मजबूतीकरण व रूंदीकरणाचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. कुडूस ते चिंचघर हा १३०० मीटरचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा तर उर्वरीत चिंचघर ते गौरापूर हा डांबरी होणार आहे. रस्त्याचे काम सुरू असून देवघर या गावाच्या हद्दीत छोट्या पुलाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. आता पर्यंत फक्त पुलाच्या खालच्या भागाचे काम करण्यात आले आहे. दरम्यान, ठेकेदार संदीप गणोरे यांनी पावसाळ्या पूर्वी काम पूर्ण करु असे सांगितले आहे.यंदाचा पावसाळा धुवॉँधार असून जून, जुलैमध्ये पावसाचे ९७ टक्के प्रमाण असणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. रविवारपर्यंत पाऊस कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. होणार पावसाळा आता फक्त काही दिवस उरले असून पावसाआधी पुल न झाल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.या मार्गाचे काम वेळेत सुरू न केल्याने कुणबी सेना, स्वाभिमान संघटना यांनी आंदोलने केलीत तसेच चिंचघर कुडूस येथे असलेल्या शाळांच्या प्रशासनाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाला काम सुरू करण्यास भाग पाडले होते. अखेर या आंदोलनाची दखल घेऊन काम सुरु केले आहे. मात्र काम संथगतीने सुरू असून पावसाआधी रस्त्याचे काम होणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी वाहतूक पुलाशेजारील शेतातून केली आहे. आणि पाऊस पडल्यास ही वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युध्दपातळीवर पुलाचे काम करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत. या रस्त्याचे ठेकेदार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही . त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी मी बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर काही प्रमाणात सुधारणा झाली. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. पुलाबाबत दिरंगाई झाल्यास व पावसाआधी काम पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडू- प्रदीप हरड, उपतालुका प्रमुख, कुणबी सेनाया पुलाच्या फुटींगचे (पाया भरणी)चे काम झाले असून पडदी भरून स्लॅब टाकण्याचे काम शिल्लक आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हे काम होईल तसेच या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून गुंज-काटी येथून रस्ता आहे. दोन किलोमीटर अंतर वाढेल पण वाहतूक बंद होणार नाही.- विनोद घोलप, शाखा अभियंतापंतप्रधान ग्रामसडक योजना

टॅग्स :Vasai Virarवसई विरार