शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुडूस-चिंचघर-गौरापूर रस्त्याची गाडी फास्ट कधी धावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:06 IST

तालुक्यातील कुडूस- चिंचघर-गौरापूर या रस्त्याच्या मजबूतीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील देवघर या गावाच्या हद्दीत छोट्या पुलाचे काम सुरू असून ते अत्यंत संथगतीने सुरू आहे.

- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील कुडूस- चिंचघर-गौरापूर या रस्त्याच्या मजबूतीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील देवघर या गावाच्या हद्दीत छोट्या पुलाचे काम सुरू असून ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. पावसाळ्याला अवघे काही दिवस उरले असून त्याआधी हे काम न झाल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.तालुक्यातील वर्दळीचा असणारा कुडूस - देवघर - गौरापूर या अंतर्गत रस्त्याच्या मजबूतीकरण व रूंदीकरणाचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. कुडूस ते चिंचघर हा १३०० मीटरचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा तर उर्वरीत चिंचघर ते गौरापूर हा डांबरी होणार आहे. रस्त्याचे काम सुरू असून देवघर या गावाच्या हद्दीत छोट्या पुलाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. आता पर्यंत फक्त पुलाच्या खालच्या भागाचे काम करण्यात आले आहे. दरम्यान, ठेकेदार संदीप गणोरे यांनी पावसाळ्या पूर्वी काम पूर्ण करु असे सांगितले आहे.यंदाचा पावसाळा धुवॉँधार असून जून, जुलैमध्ये पावसाचे ९७ टक्के प्रमाण असणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. रविवारपर्यंत पाऊस कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. होणार पावसाळा आता फक्त काही दिवस उरले असून पावसाआधी पुल न झाल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.या मार्गाचे काम वेळेत सुरू न केल्याने कुणबी सेना, स्वाभिमान संघटना यांनी आंदोलने केलीत तसेच चिंचघर कुडूस येथे असलेल्या शाळांच्या प्रशासनाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाला काम सुरू करण्यास भाग पाडले होते. अखेर या आंदोलनाची दखल घेऊन काम सुरु केले आहे. मात्र काम संथगतीने सुरू असून पावसाआधी रस्त्याचे काम होणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी वाहतूक पुलाशेजारील शेतातून केली आहे. आणि पाऊस पडल्यास ही वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युध्दपातळीवर पुलाचे काम करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत. या रस्त्याचे ठेकेदार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही . त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी मी बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर काही प्रमाणात सुधारणा झाली. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. पुलाबाबत दिरंगाई झाल्यास व पावसाआधी काम पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडू- प्रदीप हरड, उपतालुका प्रमुख, कुणबी सेनाया पुलाच्या फुटींगचे (पाया भरणी)चे काम झाले असून पडदी भरून स्लॅब टाकण्याचे काम शिल्लक आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हे काम होईल तसेच या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून गुंज-काटी येथून रस्ता आहे. दोन किलोमीटर अंतर वाढेल पण वाहतूक बंद होणार नाही.- विनोद घोलप, शाखा अभियंतापंतप्रधान ग्रामसडक योजना

टॅग्स :Vasai Virarवसई विरार