शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट थांबणार कधी?

By admin | Updated: February 3, 2016 02:05 IST

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातल्या नोकर भरतीमध्ये केंद्र सरकार व न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशन आॅफ इंडियाने प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात केल्याने प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल

हितेन नाईक, पालघरतारापूर अणुऊर्जा प्रकल्पातल्या नोकर भरतीमध्ये केंद्र सरकार व न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशन आॅफ इंडियाने प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात केल्याने प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी लक्ष घालावे अशी मागणी पोफरण फिशरमेन्स सहकारी संस्थेचे चेअरमन वासुदेव नाईक यांनी केली आहे.तारापुरच्या न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशन आॅफ इंडिया या प्रकल्पात असिस्टंट जनरल पदासाठी सात जागा, असिस्टंट जनरल पदासाठी सहा जागा, असिस्टंट जनरल सी. एॅड. एम. एम. पदासाठी एक जागा, स्टेनो (जनरल) पदासाठी एक जागा, फार्मासिस्ट पदासाठी एक जागा अशा बावीस पदाच्या भरतीसाठी जाहीरात काढण्यात आली होती. ही जाहीरात देशातील बहुतांश वृत्तपत्रातून इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून देशभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज येणार असले तरी त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय झाला आहे.पालघर जिल्ह्यातील तारापुर अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी १९६२ साली घिवली, पोफरण गावातील मच्छीमार शेतकरी इ. स्थानिकांच्या जमीनी व घरे शासनाने ताब्यात घेऊन त्यांना विस्थापित करण्यात आले. त्यावेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेतले जाईल असे आश्वासन तात्कालीन केंद्र सरकारसह राज्य सरकार व न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशनने दिले होते. परंतु ५४ वर्षाचा कालावधी उलटूनही प्रकल्पग्रस्तांना ना नोकऱ्या मिळाल्या ना व्यवस्थित मोबदला. या प्रकल्पग्रस्तांवरील झालेल्या अन्यायाविरोधात स्वत: रामनाईक तत्कालीन शासनाविरोधात न्यायालयात लढा देत होते. ते स्वत: आता उत्तरप्रदेशचे राज्यपाल म्हणून विराजमान असताना व केंद्रात व राज्यात भाजपा-सेनेची सत्ता असताना हे प्रश्न अजून सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)