शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट थांबणार कधी?

By admin | Updated: February 3, 2016 02:05 IST

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातल्या नोकर भरतीमध्ये केंद्र सरकार व न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशन आॅफ इंडियाने प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात केल्याने प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल

हितेन नाईक, पालघरतारापूर अणुऊर्जा प्रकल्पातल्या नोकर भरतीमध्ये केंद्र सरकार व न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशन आॅफ इंडियाने प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात केल्याने प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी लक्ष घालावे अशी मागणी पोफरण फिशरमेन्स सहकारी संस्थेचे चेअरमन वासुदेव नाईक यांनी केली आहे.तारापुरच्या न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशन आॅफ इंडिया या प्रकल्पात असिस्टंट जनरल पदासाठी सात जागा, असिस्टंट जनरल पदासाठी सहा जागा, असिस्टंट जनरल सी. एॅड. एम. एम. पदासाठी एक जागा, स्टेनो (जनरल) पदासाठी एक जागा, फार्मासिस्ट पदासाठी एक जागा अशा बावीस पदाच्या भरतीसाठी जाहीरात काढण्यात आली होती. ही जाहीरात देशातील बहुतांश वृत्तपत्रातून इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून देशभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज येणार असले तरी त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय झाला आहे.पालघर जिल्ह्यातील तारापुर अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी १९६२ साली घिवली, पोफरण गावातील मच्छीमार शेतकरी इ. स्थानिकांच्या जमीनी व घरे शासनाने ताब्यात घेऊन त्यांना विस्थापित करण्यात आले. त्यावेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेतले जाईल असे आश्वासन तात्कालीन केंद्र सरकारसह राज्य सरकार व न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशनने दिले होते. परंतु ५४ वर्षाचा कालावधी उलटूनही प्रकल्पग्रस्तांना ना नोकऱ्या मिळाल्या ना व्यवस्थित मोबदला. या प्रकल्पग्रस्तांवरील झालेल्या अन्यायाविरोधात स्वत: रामनाईक तत्कालीन शासनाविरोधात न्यायालयात लढा देत होते. ते स्वत: आता उत्तरप्रदेशचे राज्यपाल म्हणून विराजमान असताना व केंद्रात व राज्यात भाजपा-सेनेची सत्ता असताना हे प्रश्न अजून सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)