शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

पालघऱ जिल्ह्याला सुसज्ज अग्नीशमनदल कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:58 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला गुरुवारी लागलेली आग आणि ती विझविण्यास पुरेशी यंत्रणा नसल्याने आगीच्या भक्षस्थानी पडलेले पाच इतर कारखाने यांनी पालघर जिल्ह्यातील अग्नीशमन यंत्रणेच्या कुचकामीपणावर बोट ठेवले आहे. साडे सात हजारांहून अधिक कारखाने असलेल्या व रिलायन्स एनर्जी आणि बीएआरसी असे प्रचंड प्रकल्प असलेल्या या

विशेष प्रतिनिधीपालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला गुरुवारी लागलेली आग आणि ती विझविण्यास पुरेशी यंत्रणा नसल्याने आगीच्या भक्षस्थानी पडलेले पाच इतर कारखाने यांनी पालघर जिल्ह्यातील अग्नीशमन यंत्रणेच्या कुचकामीपणावर बोट ठेवले आहे. साडे सात हजारांहून अधिक कारखाने असलेल्या व रिलायन्स एनर्जी आणि बीएआरसी असे प्रचंड प्रकल्प असलेल्या या परिसरात जर अग्नीकांड घडले तर त्याला वेळीच आवर घालणारी प्रभावी यंत्रणा या जिल्ह्यात अस्तित्वात नाही.जिल्ह्यात वसई-विरार महानगरपालिका ही एकच महापालिका आहे. तिची सुद्धा अग्नीशमन यंत्रणा पुरेशी मजबूत नाही. डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगरपालिका जिल्ह्यात आहेत. परंतु त्यांच्याकडे उत्पन्नाची पुरेशी साधने नसल्याने अग्नीशमन दलाच्याबाबतीत तिथेही बोंब आहे. चार नव्या नगरपंचायती जिल्ह्यात अस्तित्वात आल्या. परंतु त्यांचीही अवस्था भिक्षांदेही स्वरुपाची आहे. त्यामुळे स्वतंत्र अशी अग्नीशमन यंत्रणा उभारण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एम.एम.आर.डी.ए. आणि जिल्ह्याचे नवे मुख्यालय उभारणाºया सिडकोनेच पुढाकार घेणे आवश्यक आहे.वाडा, कुडूस या पट्ट्यामध्ये जवळपास हजारएक कारखाने आहेत. परंतु भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन महापालिकांच्या जवळ हा पट्टा असल्याने तेथील अग्नीतांडवाचे शमन कसेबसे होते. परंतु बोईसर, तारापूर, वसई, विरार आणि त्या लगतचा पट्टा येथे असलेल्या कारखान्याच्या बाबतीत अग्नीशमन हे आव्हानच ठरते. वसईहून अग्नीशामक बंब पालघर, तारापूर, बोईसर येथे पाठवायचा म्हटला की, ९० किलोमीटरचे अंतर कापावे लागते. तर ठाणे, भिवंडी, कल्याण येथील बंबांना सव्वाशे ते दीडशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यात खराब रस्ते, वाहतूककोंडी यामुळे स्थिती बिकट होते. याशिवाय एकदा भरलेला बंब रिकामा झाल्यास तो भरायचा कुठे? व कसा? ही समस्या उभी राहते.गुरुवारी रात्री लागलेली आग विझविणारे बंब रिकामे झाल्यावर ते पुन्हा भरण्यासाठी साध्या वॉटर टँकरमधील पाण्याचा वापर केला गेला. या कारखान्यांमध्ये अग्नीशमन यंत्रणेचा पूर्ण अभाव आहे, तर काहींनी नाममात्र स्वरुपात त्या उभारल्या आहेत. औद्योगिक सुरक्षिततेचे नियम तर बहूसंख्य कारखान्यांनी पाळलेले नाही. त्याचे आॅडीटही होत नाही. त्यामुळे अग्नीतांडवाचा धोका सदैव असतोच. रसायनामुळे लागलेली आग विझविण्यासाठी फोम (फेस)चा वापर केला जातो. अनेकदा प्रचंड दाबाखाली साठविलेल्या कार्बनडाय आॅक्साइडचा वापर केला जातो. परंतु या आधुनिक साधनसामुग्रीचा संपूर्ण अभाव या संपूर्ण परिसरातील अग्नीशमन यंत्रणेत आहे.यात जिल्ह्यातल्या महामार्गावरून रोज लाखो लीटर धोकादायक रसायनांची वाहतूक टँकर करीत असतात. त्यामध्ये गॅस टँकरचाही समावेश असतो. त्यांना अपघात घडून अग्नीकांड उद्धभवत असते. त्यामुळे कंपन्यांच्या सीएसआर निधीतून एमएमआरडीएने सुसज्ज असे अग्नीशमन केंद्र एमआयडीसीच्या माध्यमातून उभारावे, हाच एक इलाज तज्ज्ञांनी सुचविला आहे. तसेच येथील सुरक्षात्मक आॅडीट करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करा नाहीतर कारखाने बंद करा असे धोरण राबवायला हवे, तरच ही अग्नीतांडवावर मात करता येईल, असे तज्ज्ञांनी सुचविले आहे.एमएमआरडीए सिडकोवर भारजिल्ह्यातील अग्नीशमन यंत्रणा अधिक प्रभावी कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पालकमंत्र्या सोबत बैठका घेण्यात आल्या असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत अशी, माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी लोकमतला दिली. एकंदरीतच गुरुवारी रात्री बोईसरमधील अग्नीकांड पाहता स्वतंत्र अशी अग्नीशमन यंत्रणा उभारण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एम.एम.आर.डी.ए. आणि जिल्ह्याचे नवे मुख्यालय उभारणाºया सिडकोनेच पुढाकार घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार