शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पालघऱ जिल्ह्याला सुसज्ज अग्नीशमनदल कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:58 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला गुरुवारी लागलेली आग आणि ती विझविण्यास पुरेशी यंत्रणा नसल्याने आगीच्या भक्षस्थानी पडलेले पाच इतर कारखाने यांनी पालघर जिल्ह्यातील अग्नीशमन यंत्रणेच्या कुचकामीपणावर बोट ठेवले आहे. साडे सात हजारांहून अधिक कारखाने असलेल्या व रिलायन्स एनर्जी आणि बीएआरसी असे प्रचंड प्रकल्प असलेल्या या

विशेष प्रतिनिधीपालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला गुरुवारी लागलेली आग आणि ती विझविण्यास पुरेशी यंत्रणा नसल्याने आगीच्या भक्षस्थानी पडलेले पाच इतर कारखाने यांनी पालघर जिल्ह्यातील अग्नीशमन यंत्रणेच्या कुचकामीपणावर बोट ठेवले आहे. साडे सात हजारांहून अधिक कारखाने असलेल्या व रिलायन्स एनर्जी आणि बीएआरसी असे प्रचंड प्रकल्प असलेल्या या परिसरात जर अग्नीकांड घडले तर त्याला वेळीच आवर घालणारी प्रभावी यंत्रणा या जिल्ह्यात अस्तित्वात नाही.जिल्ह्यात वसई-विरार महानगरपालिका ही एकच महापालिका आहे. तिची सुद्धा अग्नीशमन यंत्रणा पुरेशी मजबूत नाही. डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगरपालिका जिल्ह्यात आहेत. परंतु त्यांच्याकडे उत्पन्नाची पुरेशी साधने नसल्याने अग्नीशमन दलाच्याबाबतीत तिथेही बोंब आहे. चार नव्या नगरपंचायती जिल्ह्यात अस्तित्वात आल्या. परंतु त्यांचीही अवस्था भिक्षांदेही स्वरुपाची आहे. त्यामुळे स्वतंत्र अशी अग्नीशमन यंत्रणा उभारण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एम.एम.आर.डी.ए. आणि जिल्ह्याचे नवे मुख्यालय उभारणाºया सिडकोनेच पुढाकार घेणे आवश्यक आहे.वाडा, कुडूस या पट्ट्यामध्ये जवळपास हजारएक कारखाने आहेत. परंतु भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन महापालिकांच्या जवळ हा पट्टा असल्याने तेथील अग्नीतांडवाचे शमन कसेबसे होते. परंतु बोईसर, तारापूर, वसई, विरार आणि त्या लगतचा पट्टा येथे असलेल्या कारखान्याच्या बाबतीत अग्नीशमन हे आव्हानच ठरते. वसईहून अग्नीशामक बंब पालघर, तारापूर, बोईसर येथे पाठवायचा म्हटला की, ९० किलोमीटरचे अंतर कापावे लागते. तर ठाणे, भिवंडी, कल्याण येथील बंबांना सव्वाशे ते दीडशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यात खराब रस्ते, वाहतूककोंडी यामुळे स्थिती बिकट होते. याशिवाय एकदा भरलेला बंब रिकामा झाल्यास तो भरायचा कुठे? व कसा? ही समस्या उभी राहते.गुरुवारी रात्री लागलेली आग विझविणारे बंब रिकामे झाल्यावर ते पुन्हा भरण्यासाठी साध्या वॉटर टँकरमधील पाण्याचा वापर केला गेला. या कारखान्यांमध्ये अग्नीशमन यंत्रणेचा पूर्ण अभाव आहे, तर काहींनी नाममात्र स्वरुपात त्या उभारल्या आहेत. औद्योगिक सुरक्षिततेचे नियम तर बहूसंख्य कारखान्यांनी पाळलेले नाही. त्याचे आॅडीटही होत नाही. त्यामुळे अग्नीतांडवाचा धोका सदैव असतोच. रसायनामुळे लागलेली आग विझविण्यासाठी फोम (फेस)चा वापर केला जातो. अनेकदा प्रचंड दाबाखाली साठविलेल्या कार्बनडाय आॅक्साइडचा वापर केला जातो. परंतु या आधुनिक साधनसामुग्रीचा संपूर्ण अभाव या संपूर्ण परिसरातील अग्नीशमन यंत्रणेत आहे.यात जिल्ह्यातल्या महामार्गावरून रोज लाखो लीटर धोकादायक रसायनांची वाहतूक टँकर करीत असतात. त्यामध्ये गॅस टँकरचाही समावेश असतो. त्यांना अपघात घडून अग्नीकांड उद्धभवत असते. त्यामुळे कंपन्यांच्या सीएसआर निधीतून एमएमआरडीएने सुसज्ज असे अग्नीशमन केंद्र एमआयडीसीच्या माध्यमातून उभारावे, हाच एक इलाज तज्ज्ञांनी सुचविला आहे. तसेच येथील सुरक्षात्मक आॅडीट करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करा नाहीतर कारखाने बंद करा असे धोरण राबवायला हवे, तरच ही अग्नीतांडवावर मात करता येईल, असे तज्ज्ञांनी सुचविले आहे.एमएमआरडीए सिडकोवर भारजिल्ह्यातील अग्नीशमन यंत्रणा अधिक प्रभावी कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पालकमंत्र्या सोबत बैठका घेण्यात आल्या असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत अशी, माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी लोकमतला दिली. एकंदरीतच गुरुवारी रात्री बोईसरमधील अग्नीकांड पाहता स्वतंत्र अशी अग्नीशमन यंत्रणा उभारण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एम.एम.आर.डी.ए. आणि जिल्ह्याचे नवे मुख्यालय उभारणाºया सिडकोनेच पुढाकार घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार