शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

जिल्ह्याला पासपोर्ट कार्यालय कधी?

By admin | Updated: April 20, 2017 23:54 IST

पालघर जिल्ह्यातील हजारो नागरीक, विद्यार्थी भटकंती आणि शिक्षणासाठी परदेशात ये-जा करीत आहेत. पण, जिल्हयात पासपोर्ट कार्यालय नसल्याने त्यांना ठाणे

वसई : पालघर जिल्ह्यातील हजारो नागरीक, विद्यार्थी भटकंती आणि शिक्षणासाठी परदेशात ये-जा करीत आहेत. पण, जिल्हयात पासपोर्ट कार्यालय नसल्याने त्यांना ठाणे, मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी केंद्र सरकारने टपाल कार्यालयातून देण्यात येणाऱ्या पासपोर्ट सुविधा पालघर जिल्ह्यात सुरु करावी, अशी मागणी काँगेसचे वसई शहर अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी केंद्रीय परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्याकडे केली आहे. पालघर जिल्ह्यात विशेषत: वसई तालुक्यातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. मात्र, त्यांना पासपोर्ट मिळवण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जिल्हा विभाजनानंतरही येथील लोकांना पासपोर्टसाठी ठाणे आणि मुंबईत जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा खर्च होऊन त्रासही सहन करावा लागत असल्याची तक्रार फुर्ट्याडो यांनी केली आहे. नागरीकांना पासपोर्ट नजिकच्या ठिकाणांहून मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुुरु करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण, तो अतिशय खर्चिक असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने देशातील प्रमुख ६५० पोस्ट कार्यालयातून ही सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयाचा समावेश करण्यात आला नसेल तर तो करावा, अशी मागणी फुर्ट्याडो यांनी केली आहे. तसे असेल तर त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने नागरीकांना उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून पालघरवासियांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, असे फुर्ट्याडो यांनी म्हटले आहे.(प्रतिनिधी)