शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला पासपोर्ट कार्यालय कधी?

By admin | Updated: April 20, 2017 23:54 IST

पालघर जिल्ह्यातील हजारो नागरीक, विद्यार्थी भटकंती आणि शिक्षणासाठी परदेशात ये-जा करीत आहेत. पण, जिल्हयात पासपोर्ट कार्यालय नसल्याने त्यांना ठाणे

वसई : पालघर जिल्ह्यातील हजारो नागरीक, विद्यार्थी भटकंती आणि शिक्षणासाठी परदेशात ये-जा करीत आहेत. पण, जिल्हयात पासपोर्ट कार्यालय नसल्याने त्यांना ठाणे, मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी केंद्र सरकारने टपाल कार्यालयातून देण्यात येणाऱ्या पासपोर्ट सुविधा पालघर जिल्ह्यात सुरु करावी, अशी मागणी काँगेसचे वसई शहर अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी केंद्रीय परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्याकडे केली आहे. पालघर जिल्ह्यात विशेषत: वसई तालुक्यातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. मात्र, त्यांना पासपोर्ट मिळवण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जिल्हा विभाजनानंतरही येथील लोकांना पासपोर्टसाठी ठाणे आणि मुंबईत जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा खर्च होऊन त्रासही सहन करावा लागत असल्याची तक्रार फुर्ट्याडो यांनी केली आहे. नागरीकांना पासपोर्ट नजिकच्या ठिकाणांहून मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुुरु करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण, तो अतिशय खर्चिक असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने देशातील प्रमुख ६५० पोस्ट कार्यालयातून ही सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयाचा समावेश करण्यात आला नसेल तर तो करावा, अशी मागणी फुर्ट्याडो यांनी केली आहे. तसे असेल तर त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने नागरीकांना उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून पालघरवासियांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, असे फुर्ट्याडो यांनी म्हटले आहे.(प्रतिनिधी)