शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

जिल्ह्याला पासपोर्ट कार्यालय कधी?

By admin | Updated: April 20, 2017 23:54 IST

पालघर जिल्ह्यातील हजारो नागरीक, विद्यार्थी भटकंती आणि शिक्षणासाठी परदेशात ये-जा करीत आहेत. पण, जिल्हयात पासपोर्ट कार्यालय नसल्याने त्यांना ठाणे

वसई : पालघर जिल्ह्यातील हजारो नागरीक, विद्यार्थी भटकंती आणि शिक्षणासाठी परदेशात ये-जा करीत आहेत. पण, जिल्हयात पासपोर्ट कार्यालय नसल्याने त्यांना ठाणे, मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी केंद्र सरकारने टपाल कार्यालयातून देण्यात येणाऱ्या पासपोर्ट सुविधा पालघर जिल्ह्यात सुरु करावी, अशी मागणी काँगेसचे वसई शहर अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी केंद्रीय परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्याकडे केली आहे. पालघर जिल्ह्यात विशेषत: वसई तालुक्यातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. मात्र, त्यांना पासपोर्ट मिळवण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जिल्हा विभाजनानंतरही येथील लोकांना पासपोर्टसाठी ठाणे आणि मुंबईत जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा खर्च होऊन त्रासही सहन करावा लागत असल्याची तक्रार फुर्ट्याडो यांनी केली आहे. नागरीकांना पासपोर्ट नजिकच्या ठिकाणांहून मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुुरु करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण, तो अतिशय खर्चिक असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने देशातील प्रमुख ६५० पोस्ट कार्यालयातून ही सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयाचा समावेश करण्यात आला नसेल तर तो करावा, अशी मागणी फुर्ट्याडो यांनी केली आहे. तसे असेल तर त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने नागरीकांना उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून पालघरवासियांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, असे फुर्ट्याडो यांनी म्हटले आहे.(प्रतिनिधी)