शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

कारवाईसाठी मुहूर्त कधी सापडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:22 IST

अनधिकृत गाळे पाडणार कधी? : अहवाल देऊन दोन महिने उलटले; नागरिक राहतात जीव मुठीत धरून

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथील सेठीया इंडस्ट्रीजमधील काही औद्योगिक गाळे हे महसूल खात्याच्या नवीन शर्तीच्या जमिनीवर उभारले आहेत. या इंडस्ट्रीजच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेल्या संरक्षक भिंतीमुळे शिवापाडा परिसरातील स्थानिक जीव मुठीत धरून राहत आहेत. पुण्यात आणि मालाड शहरात संरक्षक भिंत कोसळून अनेकांनी आपला जीव गमावल्याची दुर्घटना घडल्याने स्थानिकांनी जिल्हाधिकारीपासून तहसीलदारापर्यंत याबाबत अनेक तक्रारी केलेल्या आहेत. पण तहसीलदारांनी १५ जुलैला या भिंतीवर नाममात्र कारवाई केली होती. ती भिंत पुन्हा बांधण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संरक्षक भिंतीवर आणि अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांना अद्याप मुहूर्त सापडत नाही का, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

वसई फाटा येथे शिवापाडा गाव असून शेकडो गरीब परिवार चाळीमध्ये राहतात. यात मोठ्या प्रमाणात आदिवासींचा समावेश आहे. या गावाच्या आसपास काही जमीन सरकारी आहे. या सरकारी जमिनीवर अनधिकृत पद्धतीने मोठ-मोठ्या इंडस्ट्रीज बनविण्यात आल्या आहेत. या कंपनीच्या संरक्षक भिंती गावातील घरांच्या बाजूनेच बनवण्यात आल्या आहेत. काही भिंती तर झुकलेल्या परिस्थितीत आहेत. येथे राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की, बाजूलाच सेठीया इंडस्ट्रीयल कंपनीची भिंत झुकली असून ती घरांवर कधीही पडू शकते. आजूबाजूला लहान मुले खेळत असल्याने कधी कोणती दुर्घटना घडू शकते. म्हणून मुलांना त्याठिकाणी खेळायला जाण्यास विरोध केला जातो. या कंपनीची भिंत यापूर्वीही पडली आहे. यामुळे याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

मंडळ, तलाठ्याने सर्व्हे केला, पण कारवाई नाही : सेठीया इंडस्ट्रीजच्या अनधिकृत गाळ्यांचा पंचनामा करून त्याचा अहवाल पेल्हार तलाठीने तहसीलदारांना १६ जून २०१९ ला पाठवला आहे. तर मांडवी येथील मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांनी या जमिनीवरील बांधकामाबाबत कुठल्याही शासकीय प्रकारची परवानगी नसल्याने कारवाई करावी, असा अहवाल तहसीलदारांना ६ जुलै २०१९ ला पाठवला आहे. ही वन खात्याकडील जमीन अल्प भूधारक व भूमिहीन आदिवासी लोकांना वाटण्यासाठी महसूल खात्याच्या ताब्यात दिली होती पण महसूल अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे येथे बांधकामे झाली. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी तहसीलदारांना अहवाल पाठवूनही दोन महिने उलटले. तरीही कारवाई होत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.नेमके काय आहे अहवालात : मौजे पेल्हार येथील सर्व्हे नंबर ३२४ मधील क्षेत्रफळ ३६ या वर्णनाची जमीन कब्जेदार सदरी एकनाथ महादेव शेलार यांच्या नावे दाखल आहे. या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झालेले असून सदर बांधकामाबाबत जमीन मालक आणि बांधकाम व्यावसायिकाना विचारणा केली असता त्यांच्याकडे शासकीय अकृषिक परवानगी अथवा वसई विरार शहर महानगरपालिकेची बांधकाम करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्रकारची परवानगी नाही. सदर जमिनीचे आणि कंपनीचे पंचनामा करून कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना अहवाल पाठवला आहे. याबाबत तहसीलदारांना संपर्क साधला असता आपण तुंगारेश्वर येथे कारवाईदरम्यान असून यासंदर्भात नंतर बोलू असे त्यांनी सांगितले. मात्र, नंतर त्यांचा फोन आऊट आॅफ रिच लागत होता. 

सदर जमीन ही महसूलची असून तहसीलदार कार्यालयातून अजूनपर्यंत कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला नाही. जर आमच्या कडे त्यांनी पत्रव्यवहार केला तर नक्कीच अनिधकृत बांधकामावर कारवाई करणार.- प्रशांत चौधरी,सहाय्यक आयुक्त, वालीव प्रभाग