शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

कारवाईसाठी मुहूर्त कधी सापडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:22 IST

अनधिकृत गाळे पाडणार कधी? : अहवाल देऊन दोन महिने उलटले; नागरिक राहतात जीव मुठीत धरून

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथील सेठीया इंडस्ट्रीजमधील काही औद्योगिक गाळे हे महसूल खात्याच्या नवीन शर्तीच्या जमिनीवर उभारले आहेत. या इंडस्ट्रीजच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेल्या संरक्षक भिंतीमुळे शिवापाडा परिसरातील स्थानिक जीव मुठीत धरून राहत आहेत. पुण्यात आणि मालाड शहरात संरक्षक भिंत कोसळून अनेकांनी आपला जीव गमावल्याची दुर्घटना घडल्याने स्थानिकांनी जिल्हाधिकारीपासून तहसीलदारापर्यंत याबाबत अनेक तक्रारी केलेल्या आहेत. पण तहसीलदारांनी १५ जुलैला या भिंतीवर नाममात्र कारवाई केली होती. ती भिंत पुन्हा बांधण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संरक्षक भिंतीवर आणि अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांना अद्याप मुहूर्त सापडत नाही का, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

वसई फाटा येथे शिवापाडा गाव असून शेकडो गरीब परिवार चाळीमध्ये राहतात. यात मोठ्या प्रमाणात आदिवासींचा समावेश आहे. या गावाच्या आसपास काही जमीन सरकारी आहे. या सरकारी जमिनीवर अनधिकृत पद्धतीने मोठ-मोठ्या इंडस्ट्रीज बनविण्यात आल्या आहेत. या कंपनीच्या संरक्षक भिंती गावातील घरांच्या बाजूनेच बनवण्यात आल्या आहेत. काही भिंती तर झुकलेल्या परिस्थितीत आहेत. येथे राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की, बाजूलाच सेठीया इंडस्ट्रीयल कंपनीची भिंत झुकली असून ती घरांवर कधीही पडू शकते. आजूबाजूला लहान मुले खेळत असल्याने कधी कोणती दुर्घटना घडू शकते. म्हणून मुलांना त्याठिकाणी खेळायला जाण्यास विरोध केला जातो. या कंपनीची भिंत यापूर्वीही पडली आहे. यामुळे याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

मंडळ, तलाठ्याने सर्व्हे केला, पण कारवाई नाही : सेठीया इंडस्ट्रीजच्या अनधिकृत गाळ्यांचा पंचनामा करून त्याचा अहवाल पेल्हार तलाठीने तहसीलदारांना १६ जून २०१९ ला पाठवला आहे. तर मांडवी येथील मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांनी या जमिनीवरील बांधकामाबाबत कुठल्याही शासकीय प्रकारची परवानगी नसल्याने कारवाई करावी, असा अहवाल तहसीलदारांना ६ जुलै २०१९ ला पाठवला आहे. ही वन खात्याकडील जमीन अल्प भूधारक व भूमिहीन आदिवासी लोकांना वाटण्यासाठी महसूल खात्याच्या ताब्यात दिली होती पण महसूल अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे येथे बांधकामे झाली. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी तहसीलदारांना अहवाल पाठवूनही दोन महिने उलटले. तरीही कारवाई होत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.नेमके काय आहे अहवालात : मौजे पेल्हार येथील सर्व्हे नंबर ३२४ मधील क्षेत्रफळ ३६ या वर्णनाची जमीन कब्जेदार सदरी एकनाथ महादेव शेलार यांच्या नावे दाखल आहे. या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झालेले असून सदर बांधकामाबाबत जमीन मालक आणि बांधकाम व्यावसायिकाना विचारणा केली असता त्यांच्याकडे शासकीय अकृषिक परवानगी अथवा वसई विरार शहर महानगरपालिकेची बांधकाम करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्रकारची परवानगी नाही. सदर जमिनीचे आणि कंपनीचे पंचनामा करून कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना अहवाल पाठवला आहे. याबाबत तहसीलदारांना संपर्क साधला असता आपण तुंगारेश्वर येथे कारवाईदरम्यान असून यासंदर्भात नंतर बोलू असे त्यांनी सांगितले. मात्र, नंतर त्यांचा फोन आऊट आॅफ रिच लागत होता. 

सदर जमीन ही महसूलची असून तहसीलदार कार्यालयातून अजूनपर्यंत कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला नाही. जर आमच्या कडे त्यांनी पत्रव्यवहार केला तर नक्कीच अनिधकृत बांधकामावर कारवाई करणार.- प्रशांत चौधरी,सहाय्यक आयुक्त, वालीव प्रभाग