शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कारवाईसाठी मुहूर्त कधी सापडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:22 IST

अनधिकृत गाळे पाडणार कधी? : अहवाल देऊन दोन महिने उलटले; नागरिक राहतात जीव मुठीत धरून

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथील सेठीया इंडस्ट्रीजमधील काही औद्योगिक गाळे हे महसूल खात्याच्या नवीन शर्तीच्या जमिनीवर उभारले आहेत. या इंडस्ट्रीजच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेल्या संरक्षक भिंतीमुळे शिवापाडा परिसरातील स्थानिक जीव मुठीत धरून राहत आहेत. पुण्यात आणि मालाड शहरात संरक्षक भिंत कोसळून अनेकांनी आपला जीव गमावल्याची दुर्घटना घडल्याने स्थानिकांनी जिल्हाधिकारीपासून तहसीलदारापर्यंत याबाबत अनेक तक्रारी केलेल्या आहेत. पण तहसीलदारांनी १५ जुलैला या भिंतीवर नाममात्र कारवाई केली होती. ती भिंत पुन्हा बांधण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संरक्षक भिंतीवर आणि अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांना अद्याप मुहूर्त सापडत नाही का, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

वसई फाटा येथे शिवापाडा गाव असून शेकडो गरीब परिवार चाळीमध्ये राहतात. यात मोठ्या प्रमाणात आदिवासींचा समावेश आहे. या गावाच्या आसपास काही जमीन सरकारी आहे. या सरकारी जमिनीवर अनधिकृत पद्धतीने मोठ-मोठ्या इंडस्ट्रीज बनविण्यात आल्या आहेत. या कंपनीच्या संरक्षक भिंती गावातील घरांच्या बाजूनेच बनवण्यात आल्या आहेत. काही भिंती तर झुकलेल्या परिस्थितीत आहेत. येथे राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की, बाजूलाच सेठीया इंडस्ट्रीयल कंपनीची भिंत झुकली असून ती घरांवर कधीही पडू शकते. आजूबाजूला लहान मुले खेळत असल्याने कधी कोणती दुर्घटना घडू शकते. म्हणून मुलांना त्याठिकाणी खेळायला जाण्यास विरोध केला जातो. या कंपनीची भिंत यापूर्वीही पडली आहे. यामुळे याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

मंडळ, तलाठ्याने सर्व्हे केला, पण कारवाई नाही : सेठीया इंडस्ट्रीजच्या अनधिकृत गाळ्यांचा पंचनामा करून त्याचा अहवाल पेल्हार तलाठीने तहसीलदारांना १६ जून २०१९ ला पाठवला आहे. तर मांडवी येथील मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांनी या जमिनीवरील बांधकामाबाबत कुठल्याही शासकीय प्रकारची परवानगी नसल्याने कारवाई करावी, असा अहवाल तहसीलदारांना ६ जुलै २०१९ ला पाठवला आहे. ही वन खात्याकडील जमीन अल्प भूधारक व भूमिहीन आदिवासी लोकांना वाटण्यासाठी महसूल खात्याच्या ताब्यात दिली होती पण महसूल अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे येथे बांधकामे झाली. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी तहसीलदारांना अहवाल पाठवूनही दोन महिने उलटले. तरीही कारवाई होत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.नेमके काय आहे अहवालात : मौजे पेल्हार येथील सर्व्हे नंबर ३२४ मधील क्षेत्रफळ ३६ या वर्णनाची जमीन कब्जेदार सदरी एकनाथ महादेव शेलार यांच्या नावे दाखल आहे. या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झालेले असून सदर बांधकामाबाबत जमीन मालक आणि बांधकाम व्यावसायिकाना विचारणा केली असता त्यांच्याकडे शासकीय अकृषिक परवानगी अथवा वसई विरार शहर महानगरपालिकेची बांधकाम करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्रकारची परवानगी नाही. सदर जमिनीचे आणि कंपनीचे पंचनामा करून कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना अहवाल पाठवला आहे. याबाबत तहसीलदारांना संपर्क साधला असता आपण तुंगारेश्वर येथे कारवाईदरम्यान असून यासंदर्भात नंतर बोलू असे त्यांनी सांगितले. मात्र, नंतर त्यांचा फोन आऊट आॅफ रिच लागत होता. 

सदर जमीन ही महसूलची असून तहसीलदार कार्यालयातून अजूनपर्यंत कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला नाही. जर आमच्या कडे त्यांनी पत्रव्यवहार केला तर नक्कीच अनिधकृत बांधकामावर कारवाई करणार.- प्रशांत चौधरी,सहाय्यक आयुक्त, वालीव प्रभाग