शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईसाठी मुहूर्त कधी सापडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:22 IST

अनधिकृत गाळे पाडणार कधी? : अहवाल देऊन दोन महिने उलटले; नागरिक राहतात जीव मुठीत धरून

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथील सेठीया इंडस्ट्रीजमधील काही औद्योगिक गाळे हे महसूल खात्याच्या नवीन शर्तीच्या जमिनीवर उभारले आहेत. या इंडस्ट्रीजच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेल्या संरक्षक भिंतीमुळे शिवापाडा परिसरातील स्थानिक जीव मुठीत धरून राहत आहेत. पुण्यात आणि मालाड शहरात संरक्षक भिंत कोसळून अनेकांनी आपला जीव गमावल्याची दुर्घटना घडल्याने स्थानिकांनी जिल्हाधिकारीपासून तहसीलदारापर्यंत याबाबत अनेक तक्रारी केलेल्या आहेत. पण तहसीलदारांनी १५ जुलैला या भिंतीवर नाममात्र कारवाई केली होती. ती भिंत पुन्हा बांधण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संरक्षक भिंतीवर आणि अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांना अद्याप मुहूर्त सापडत नाही का, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

वसई फाटा येथे शिवापाडा गाव असून शेकडो गरीब परिवार चाळीमध्ये राहतात. यात मोठ्या प्रमाणात आदिवासींचा समावेश आहे. या गावाच्या आसपास काही जमीन सरकारी आहे. या सरकारी जमिनीवर अनधिकृत पद्धतीने मोठ-मोठ्या इंडस्ट्रीज बनविण्यात आल्या आहेत. या कंपनीच्या संरक्षक भिंती गावातील घरांच्या बाजूनेच बनवण्यात आल्या आहेत. काही भिंती तर झुकलेल्या परिस्थितीत आहेत. येथे राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की, बाजूलाच सेठीया इंडस्ट्रीयल कंपनीची भिंत झुकली असून ती घरांवर कधीही पडू शकते. आजूबाजूला लहान मुले खेळत असल्याने कधी कोणती दुर्घटना घडू शकते. म्हणून मुलांना त्याठिकाणी खेळायला जाण्यास विरोध केला जातो. या कंपनीची भिंत यापूर्वीही पडली आहे. यामुळे याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

मंडळ, तलाठ्याने सर्व्हे केला, पण कारवाई नाही : सेठीया इंडस्ट्रीजच्या अनधिकृत गाळ्यांचा पंचनामा करून त्याचा अहवाल पेल्हार तलाठीने तहसीलदारांना १६ जून २०१९ ला पाठवला आहे. तर मांडवी येथील मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांनी या जमिनीवरील बांधकामाबाबत कुठल्याही शासकीय प्रकारची परवानगी नसल्याने कारवाई करावी, असा अहवाल तहसीलदारांना ६ जुलै २०१९ ला पाठवला आहे. ही वन खात्याकडील जमीन अल्प भूधारक व भूमिहीन आदिवासी लोकांना वाटण्यासाठी महसूल खात्याच्या ताब्यात दिली होती पण महसूल अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे येथे बांधकामे झाली. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी तहसीलदारांना अहवाल पाठवूनही दोन महिने उलटले. तरीही कारवाई होत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.नेमके काय आहे अहवालात : मौजे पेल्हार येथील सर्व्हे नंबर ३२४ मधील क्षेत्रफळ ३६ या वर्णनाची जमीन कब्जेदार सदरी एकनाथ महादेव शेलार यांच्या नावे दाखल आहे. या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झालेले असून सदर बांधकामाबाबत जमीन मालक आणि बांधकाम व्यावसायिकाना विचारणा केली असता त्यांच्याकडे शासकीय अकृषिक परवानगी अथवा वसई विरार शहर महानगरपालिकेची बांधकाम करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्रकारची परवानगी नाही. सदर जमिनीचे आणि कंपनीचे पंचनामा करून कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना अहवाल पाठवला आहे. याबाबत तहसीलदारांना संपर्क साधला असता आपण तुंगारेश्वर येथे कारवाईदरम्यान असून यासंदर्भात नंतर बोलू असे त्यांनी सांगितले. मात्र, नंतर त्यांचा फोन आऊट आॅफ रिच लागत होता. 

सदर जमीन ही महसूलची असून तहसीलदार कार्यालयातून अजूनपर्यंत कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला नाही. जर आमच्या कडे त्यांनी पत्रव्यवहार केला तर नक्कीच अनिधकृत बांधकामावर कारवाई करणार.- प्रशांत चौधरी,सहाय्यक आयुक्त, वालीव प्रभाग