शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:08 IST

तारापूरमधील कारखान्यांमधील प्रदूषित पाणी थेट समुद्रात : आजारांत वाढ; जैवविविधताही धोक्यात

हितेन नाईकपालघर : तारापूरच्या कारखान्यातून प्रक्रिया न करताच घातक प्रदूषित पाणी बाहेर सोडले जात असून त्यामुळे समुद्रातील जैवविविधता नष्ट होत असून नागरिकांना श्वसनाच्या आजारासह अनेक गंभीर आजार जडत आहेत. २०१३ ते २०१६ दरम्यान दांडी, तारापूर, मुरबे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावातील जवळपास १३ हजार १८९ रु ग्ण कॅन्सर, त्वचा रोग, किडनीच्या विकाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश हरित लवादाने दिले होते, मात्र, या अंतरिम आदेशाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होताना दिसत नाही. यामुळे आज अनेक रुग्ण मृत्यूच्या दारात आहेत.

देशामध्ये प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतींमध्ये तारापूर प्रथम क्रमांकावर असल्याचे घोषित झाले असून त्यांचा प्रदूषणाचा निर्देशांक ९३.६९ टक्के इतका वाढला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तारापूर क्षेत्रात छोटे-मोठे सुमारे २ ते ३ हजार कारखाने असून येथून बाहेर पडणाºया प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या २५ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता कमी पडू लागल्याने ५० एमएलडी क्षमतेच्या प्रक्रिया केंद्राच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. या केंद्रातून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पाईपलाईनद्वारे थेट नवापूरच्या समुद्रात ७.१० किलोमीटर्स एवढ्या लांब सोडण्याचे प्रस्तावित होते. नवापूर ग्रामपंचायतीच्या काही तत्कालीन पदाधिकारी तसेच सदस्यांनी नवापूर ग्रामस्थांचा होकार असल्याने ग्रामसभेच्या ठरावाच्या नावाखाली ही पाईपलाईन टाकण्यास ‘ना हरकत दाखला’ही देऊन टाकला. त्यामुळे समुद्रात प्रदूषित पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा मार्ग मोकळा झाला. या पाईपलाईनमुळे नवापूरसह उच्छेळी-दांडी, आलेवाडी, मुरबे, सातपाटी आदी भागातील समुद्रासह, खाड्या आणि मत्स्यसंपदेचा गोल्डन बेल्ट प्रदूषित होणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पुण्याच्या हरित लवादात या विरोधात याचिका दाखल केली होती.

या प्रदूषणामुळे किनारपट्टीवरील अनेक गावात विविध आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे मांगेला समाज परिषदेने हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिले. यावर संतापलेल्या लवादाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने १७ आॅक्टोबर २०१६ रोजी किनारपट्टीवरील गावांचा दौरा केला. एमआयडीसीमधून सोडण्यात येणारे घातक प्रदूषित पाणी योग्य प्रक्रि या न करताच सोडले जात असल्याचे यात नमूद केले होते.

उच्छेळी, दांडी, उनभाट, तारापूर आणि अन्य गावे, मुरबे केंद्रांतर्गत नवापूर व मुरबे या गावातून येणाºया रुग्णांच्या तपासणीची समितीने घेतलेली आकडेवारी ही धक्कादायक आहे. या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

केळवे ते तारापूर भागातील १३ ते १५ गावांना या प्रदूषित घातक पाण्याचा मोठा फटका बसत आहे. या गावातील गंभीर रु ग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य शिबिर भरवून त्यांच्या औषधोपचारासाठी प्रयत्न करण्याचे आदेश लवादाने दिले होते. या संदर्भात याचिकाकर्त्या मांगेला समाज परिषदेच्या पदाधिकाºयांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेत शिबिरे आयोजित करण्याबाबत विचारणा केली होती. या घटनेला वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही याबाबत जिल्हा प्रशासन सजग असल्याचे दिसून येत नाही. हे लवादाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे याचिकाकर्ते वैभव वझे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार