शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वसई-विरार पालिका आयुक्त नियुक्तीला मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 23:24 IST

नागरिकांचा प्रश्न : मीरा-भार्इंदर, कल्याणला नवीन आयुक्त

वसई : वसई-विरार शहर महापालिकेचा कारभार सध्या मागील दोन महिन्यांपासून आयुक्तांशिवाय सुरू असून येथील आयुक्तपदाचा अतिरिक्त प्रभार शासनाने पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान, मागील पंधरा दिवसांत मुख्यमंत्री आणि त्यांच्या नगरविकास खात्याने राज्यातील अनेक सनदी अधिकारी वर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या नजीकच्या महापालिकांना नवीन आयुक्त मिळाले आहेत, मात्र मागील दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या आणि दोन हजार कोटी बजेट असलेल्या वसई-विरार महापालिकेला आयुक्त मिळालेला नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्याचे नगरविकास खाते हे शिवसेनेकडे असून त्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. गुरु वारी नगरविकास खात्याने विविध पालिका, महापालिका व जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदांवर काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे यात पालघर जिल्हा वगळून केवळ ठाणे जिल्ह्यातील प्रमुख दोन महानगरपालिका असलेल्या मीरा-भार्इंदर व कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी दोघा सनदी अधिकाºयांची बदली केली आहे.

यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तपदी डॉ.व्ही.एन. सूर्यवंशी तर मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्तपदी सी.के. डांगे यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, वसई-विरारकरांना वाटले होते की, या बदली आदेश निघालेल्या आठ जणांच्या यादीमध्ये वसई-विरार शहर महापालिका आयुक्तपदी कुणाची तरी वर्णी लागेल, परंतु तसे काहीच झालेले नाही. एकंदरीत आयुक्ताविना महापालिका असेच काहीसे चित्र आता या ठिकाणी निर्माण झाले असून मागील दि. ३१ डिसेंबर रोजी पालिकेचे आयुक्त बी. जी. पवार हे स्वेच्छानिवृत्त झाले होते.२० जूनला संपणार महापालिकेची मुदतवसई-विरार शहर महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक व त्याची मुदत २० जून २०२० रोजी संपत असून साधारणपणे मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात या पालिकेच्या निवडणुका होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे साधारण एप्रिल महिन्यात आदर्श आचारसंहिता अस्तित्वात येऊ शकते.