शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

पश्चिम रेल्वेकडून मराठीचा अवमान?

By admin | Updated: April 1, 2017 05:11 IST

पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही पश्चिम रेल्वे महाराष्ट्राच्या राजभाषेचा हेतुपुरस्पर दुजाभाव करून

वसई : पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही पश्चिम रेल्वे महाराष्ट्राच्या राजभाषेचा हेतुपुरस्पर दुजाभाव करून अवमान करीत असल्याची तक्रार रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. १९६५ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५ (महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४) अन्वये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तिची लिपी देवनागरी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर मराठी भाषा ही वर्जित प्रयोजना व्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी राज्यात उपयोगात आणावयाची भाषा झाली. भारताच्या संविधानाच्या अनुसूची ८ मध्ये एकूण २२ भाषांचा निर्देश असून त्यात मराठी भाषा १३ व्या क्रमांकावर आहे. मराठी हा राजभाषा असल्याचे घोषित करणारा कायदा विधीमंडळात मंजूर होऊन ११ जानेवारी १९६५ ला राजपत्रातून जाहीरही करण्यात आले. तरीही पश्चिम रेल्वेकडून राजभाषेचा अवमान केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. डहाणू ते बोरीवली दरम्यान रेल्वे स्थानकांवरील तक्रार पुस्तिकेत मराठी पर्याय उपलब्ध नसणे, डहाणू ते चर्चगेट स्थानकांवर मराठीत उद्घोषणा न करणे, गाड्यांवर मराठी पाट्या नसणे, तिकीटे व त्यावरील सूचना मराठीत नसणे, रेल्वेच्या इमारतींवर मराठीत नाव नसणे, उपहार गृहे, खानपान केंद्रात मराठीचा वापर न करणे, माहिती अधिकार, तक्रारी, टिष्ट्वटर, इमेल आणि वेब साईटमधून मराठीतील तक्रारींना उत्तरे न देणे हा मराठीचा अवमान असल्याची तक्रार रेल्वेमंत्र्याकडे त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)