शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूची पश्चिम किनारपट्टी दररोज चार ते पाच तास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:50 IST

डहाणूच्या किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावांपासून दिवस, रात्र वीजपूरवठा सातत्याने खंडीत होत आहे. परिणामी वीजेवर अवलंबुन असलेल्या झेरॉक्सची दुकाने, पिठाच्या गिरण्या, डायमेकर्स, लघुउद्योजक तसेच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होत असल्याने महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

- शौकत शेखडहाणू : डहाणूच्या किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावांपासून दिवस, रात्र वीजपूरवठा सातत्याने खंडीत होत आहे. परिणामी वीजेवर अवलंबुन असलेल्या झेरॉक्सची दुकाने, पिठाच्या गिरण्या, डायमेकर्स, लघुउद्योजक तसेच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होत असल्याने महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. या बाबत डहाणूतील राष्टÑवादी काँग्रेसने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील चिंचणी, वरोर, वानगांव, या फिडर अंतर्गत येणाऱ्या सुमारे चाळीस ते पन्नांस गावांत तसेच खेडोपाडयात महावितरणाचा भोंगळ कारभारा सुरु आहे. दिवस, रात्र वीजेचा खेळ खंडोबा सुरू असल्याने परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येत आहे. वरील गावांत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून महावितरणाचा वीजपूरवठा सुरळीत राहावा यासाठी कोणतीच ठोस उपायोजना न केल्यामुळे येथील ट्रान्सफार्म, जिर्ण व जुनाट झालेले वीजेची तारे, कंडक्टर, फ्यूस वारंवार बिघाड होऊन दररोज चार, पाच तास वीज पूरवठा खंडीत होणे नित्याची बाब झाली आहे.विशेष म्हणजे दर शुक्रवारी दुरूस्तीच्या नावाखाली डहाणू शहर, चिंचणी, वरोर, वानगांव, कासा भागांत आठ ते दहा तास वीजपूरवठा खंडीत केला जातो. नागरीकांनी वारंवार तक्रारी करुन सुद्धा कामकाजामध्ये कोणतीच सुधारणा होत नसल्याने राष्टÑवादीे तालुकाध्यक्ष राजेश पारेख तसेच काँग्रेसचे मोईन शेख यांनी दिला आहे.बोईसर येथील तांत्रिक बिघाडामुळे भारनियमनदिवसभर लोंबकळत असलेल्या वीजेच्या तारा कोणत्याही क्षणी कुठे ना कुठे तुटून पडत असल्याने सातत्याने वीजपूरवठा खंडीत होत आहे. त्याच्यात भर म्हणून गेल्या महिनाभरापासून बोईसर येथे सातत्याने तांत्रिक ािघाड होत असल्याने आपत्कालिन भारनियमन घेतले जात आहे.विशेष म्हणजे रात्री, बेरात्री बोईसर उपकेंद्रात बिघाड झाला की सात आठ तास वीजपूरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे लोकांचा काम धंदा, व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून लाखोचे नुकसान होत आहे. वीजेचे दुप्पट तिप्पट वीज बील भरणाºया नागरिकांना दिवसभर उकाडयात राहवे लागते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार