शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

खैर तस्करीला उधाण!

By admin | Updated: February 19, 2017 04:00 IST

गेल्या अनेक दिवसांपासून वाडा तालुक्यातील जंगलामधील तस्करांनी खैराची अवैध तोड करून त्याची तस्करी करण्याचा सपाटा लावला आहे. वनविकास महामंडळाचे अपुरे मनुष्यबळ

- वसंत भोईर,  वाडा

गेल्या अनेक दिवसांपासून वाडा तालुक्यातील जंगलामधील तस्करांनी खैराची अवैध तोड करून त्याची तस्करी करण्याचा सपाटा लावला आहे. वनविकास महामंडळाचे अपुरे मनुष्यबळ आणि वाहनांचा अभाव यामुळे ते वनांच्या रक्षणासाठी व खैराच्या तस्करीला आळा घालण्यास ते असमर्थ ठरत आहे. साडेपाच हजार हेक्टर वरील वनांचे रक्षण करण्यासाठी मुळातच तोकडे मनुष्यबळ असतानाही वनपालाचे १ तर वनरक्षकांची ४ पदे रिक्त आहेत. गस्तीवाहनांचा पत्ता नाही. कार्यालयाचे संगणकीकरण नाही, अशी दारुण अवस्था आहे. त्यामुळे तस्करांचे फावते आहे. आठ दिवसांत वनविभागाच्या हाताला खैराची तस्करी करणारे एखादे तरी वाहन लागत असून परवा एकाच रात्री दोन वाहनांवर झालेल्या कारवाईने आता जंगलाच्या व विशेषत: खैराच्या झाडांबाबतची चिंता वाढली आहे. वृक्षांची तोड झाली की सगळ्यांसमोर येते ते प्रादेशिक वनविभाग! मात्र अनेकदा किंबहुना सर्वच वेळा मिळालेला माल हा एकतर वन्यजीव विभागातील असतो किंवा वनविकास महामंडळाच्या हद्दीतील असतो.वनविकास महामंडळ हा विभाग प्रकाशझोतापासून दूर असून तो जंगलाच्या रक्षणासाठी असमर्थ आहे. या परिक्षेत्राकडे खुपरी, सावरखांड, वाडा, कंचाड व पोशेरी अशा पाच परिमंडळात सुमारे ५ हजार हेक्टर वनक्षेत्र संरक्षणासाठी आहे. ज्यात आजही मोठ्या प्रमाणात खैर अस्तित्वात आहे, असे असतांना परिक्षेत्रात अवघे ४ वनपाल व ७ वनरक्षक असून वनपालाचे १ व वनरक्षकाची ४ पदे रिक्त आहेत. रात्रगस्त घालण्यासाठी वाहन नसल्याने कर्मचारी आपल्या दुचाकीवरून गस्त घालतात ती अपुरी ठरते. तसेच ती कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक आहे. या कार्यालयाने अद्याप संगणक पाहिलेलाच नाही. शिवाय कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी काहीशी अवस्था आहे.खैराची चोरटी तोड फक्त वनविकास महामंडळ यांच्या हद्दीत होत असल्याचे गेल्या काही दिवसात पकडलेल्या वाहनांवरून स्पष्ट होत आहे. प्रादेशिक विभागाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात जंगल आहे तेथेही खैर आहे. मात्र खैराची होणारी तोड फक्त वनविकास महामंडळाच्या हद्दीतच का होते? असा प्रश्न सध्या जनतेत चर्चिला जात आहे. त्याचे कोणते उत्तर वनखात्याकडे आहे?गस्त, तपासणी ठप्पमुळात महामंडळाकडे कर्मचारी अत्यल्प असून रात्र गस्त, जंगल तपासणी अशी अनेक कामे होतच नाहीत. शिवाय प्रादेशिक विभागाशी असणारी अंतर्गत धुसफूस व त्यामुळे जंगल संरक्षणाकडे होत असणारे दुर्लक्ष याचा बरोब्बर फायदा खैर तस्कर उठवित आहेत. ते वनविकास महामंडळाच्या दुबळे पणाचा फायदा घेऊन खैरासारख्या मौल्यवान वृक्षाची अक्षरश: लूट करीत आहेत. हे प्रकार आता तात्काळ थांबले पाहिजे. त्यासाठी महामंडळ वनविभागात विलीन करण्याची वेळ आली तरी चालेल पण आमचे जंगल आता वाचावा असे म्हणण्याची वेळ आली आहे.