शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

योग्यता प्रमाणपत्रासाठी कल्याणची फेरी; पालघरमधील वाहनचालक नाराज, वाहन संघटना काढणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:23 IST

वसईत ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने पालघर जिल्ह्यातील लाखो वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्रासाठी थेट कल्याण गाठावे लागणार आहे. पालघर जिल्हयापासून कल्याण दूरवर असल्याने वाहन चालक नाराज झाले आहे.

वसई : वसईत ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने पालघर जिल्ह्यातील लाखो वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्रासाठी थेट कल्याण गाठावे लागणार आहे. पालघर जिल्हयापासून कल्याण दूरवर असल्याने वाहन चालक नाराज झाले आहे. सरकारी जमिनीवर ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करून चाचणी त्याठिकाणी करण्यात यावी यामागणीसाठी जिल्हयातील विविध वाहन संघटना एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रवाशी वाहतूक आणि मालवाहतूक करणाºया वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जागेवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवरच घेणे बंधनकारक आहे. तीही दरवर्षी करुन घेणे बंधनकारक आहे. पण, असे ट्रॅक महाराष्ट्र राज्यात अवघ्या १४ ठिकाणीच उपलब्ध आहेत. ज्या कार्यालयात असे ट्रॅक उपलब्ध नाहीत त्यांनी नजिकच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या ठिकाणाही योग्यता प्रमाणपत्र आणि ब्रेक तपासणी करून घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. विरार कार्यालयात ट्रॅक उपलब्ध नसल्याने पालघरवासियांनी त्यासाठी कल्याण येथे जावे लागणार आहे.पालघर जिल्हयातील आठ तालुक्यातील वाहनांची नोंदणी करण्यासाठी विरार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यात आले आहे. सध्या भाड्याच्या जागेत असलेल्या ठिकाणी ब्रेक टेस्ट ट्रॅक्सची सोय नाही. या कार्यालयात दरवर्षी किमान पाच लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी केली जाते. सध्या या कार्यालयातून रिक्शा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टरसह इतर प्रवाशी वाहनांसह मालवाहतूक करणाºया वाहनांची लाखांच्या घरात नोंदणी झालेली आहे. तसेच दरदिवशी नोंदणी सुरुच असते. मात्र, या लाखो प्रवाशांना आता कल्याणसारख्या दूरवरच्या ठिकाणी जावे लागणार आहे.- कल्याण पालघर जिल्ह्यापासून खूप अंतरावर आहे. त्याठिकाणी ये-जा करण्यासाठी वेळ, इंधन आणि पैसा खर्ची घालावा लागणार आहे. एका दिवसात चाचणी झाली नाही तर पुन्हा हेलपाटे मारावे लागणार असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.- उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने त्याप्रमाणेच वागावे लागणार आहे. पण, आदिवासी पालघर जिल्ह्याचा विचार करून परिवहन विभागाने जिल्ह्यात सरकारी जागेत ब्रेक टेस्ट ट्र्ॅक तयार करावेत , अशी मागणी विजय खेतले यांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार