शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

योग्यता प्रमाणपत्रासाठी कल्याणची फेरी; पालघरमधील वाहनचालक नाराज, वाहन संघटना काढणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:23 IST

वसईत ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने पालघर जिल्ह्यातील लाखो वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्रासाठी थेट कल्याण गाठावे लागणार आहे. पालघर जिल्हयापासून कल्याण दूरवर असल्याने वाहन चालक नाराज झाले आहे.

वसई : वसईत ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने पालघर जिल्ह्यातील लाखो वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्रासाठी थेट कल्याण गाठावे लागणार आहे. पालघर जिल्हयापासून कल्याण दूरवर असल्याने वाहन चालक नाराज झाले आहे. सरकारी जमिनीवर ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करून चाचणी त्याठिकाणी करण्यात यावी यामागणीसाठी जिल्हयातील विविध वाहन संघटना एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रवाशी वाहतूक आणि मालवाहतूक करणाºया वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जागेवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवरच घेणे बंधनकारक आहे. तीही दरवर्षी करुन घेणे बंधनकारक आहे. पण, असे ट्रॅक महाराष्ट्र राज्यात अवघ्या १४ ठिकाणीच उपलब्ध आहेत. ज्या कार्यालयात असे ट्रॅक उपलब्ध नाहीत त्यांनी नजिकच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या ठिकाणाही योग्यता प्रमाणपत्र आणि ब्रेक तपासणी करून घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. विरार कार्यालयात ट्रॅक उपलब्ध नसल्याने पालघरवासियांनी त्यासाठी कल्याण येथे जावे लागणार आहे.पालघर जिल्हयातील आठ तालुक्यातील वाहनांची नोंदणी करण्यासाठी विरार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यात आले आहे. सध्या भाड्याच्या जागेत असलेल्या ठिकाणी ब्रेक टेस्ट ट्रॅक्सची सोय नाही. या कार्यालयात दरवर्षी किमान पाच लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी केली जाते. सध्या या कार्यालयातून रिक्शा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टरसह इतर प्रवाशी वाहनांसह मालवाहतूक करणाºया वाहनांची लाखांच्या घरात नोंदणी झालेली आहे. तसेच दरदिवशी नोंदणी सुरुच असते. मात्र, या लाखो प्रवाशांना आता कल्याणसारख्या दूरवरच्या ठिकाणी जावे लागणार आहे.- कल्याण पालघर जिल्ह्यापासून खूप अंतरावर आहे. त्याठिकाणी ये-जा करण्यासाठी वेळ, इंधन आणि पैसा खर्ची घालावा लागणार आहे. एका दिवसात चाचणी झाली नाही तर पुन्हा हेलपाटे मारावे लागणार असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.- उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने त्याप्रमाणेच वागावे लागणार आहे. पण, आदिवासी पालघर जिल्ह्याचा विचार करून परिवहन विभागाने जिल्ह्यात सरकारी जागेत ब्रेक टेस्ट ट्र्ॅक तयार करावेत , अशी मागणी विजय खेतले यांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार