शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

योग्यता प्रमाणपत्रासाठी कल्याणची फेरी; पालघरमधील वाहनचालक नाराज, वाहन संघटना काढणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:23 IST

वसईत ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने पालघर जिल्ह्यातील लाखो वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्रासाठी थेट कल्याण गाठावे लागणार आहे. पालघर जिल्हयापासून कल्याण दूरवर असल्याने वाहन चालक नाराज झाले आहे.

वसई : वसईत ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने पालघर जिल्ह्यातील लाखो वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्रासाठी थेट कल्याण गाठावे लागणार आहे. पालघर जिल्हयापासून कल्याण दूरवर असल्याने वाहन चालक नाराज झाले आहे. सरकारी जमिनीवर ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करून चाचणी त्याठिकाणी करण्यात यावी यामागणीसाठी जिल्हयातील विविध वाहन संघटना एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रवाशी वाहतूक आणि मालवाहतूक करणाºया वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जागेवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवरच घेणे बंधनकारक आहे. तीही दरवर्षी करुन घेणे बंधनकारक आहे. पण, असे ट्रॅक महाराष्ट्र राज्यात अवघ्या १४ ठिकाणीच उपलब्ध आहेत. ज्या कार्यालयात असे ट्रॅक उपलब्ध नाहीत त्यांनी नजिकच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या ठिकाणाही योग्यता प्रमाणपत्र आणि ब्रेक तपासणी करून घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. विरार कार्यालयात ट्रॅक उपलब्ध नसल्याने पालघरवासियांनी त्यासाठी कल्याण येथे जावे लागणार आहे.पालघर जिल्हयातील आठ तालुक्यातील वाहनांची नोंदणी करण्यासाठी विरार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यात आले आहे. सध्या भाड्याच्या जागेत असलेल्या ठिकाणी ब्रेक टेस्ट ट्रॅक्सची सोय नाही. या कार्यालयात दरवर्षी किमान पाच लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी केली जाते. सध्या या कार्यालयातून रिक्शा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टरसह इतर प्रवाशी वाहनांसह मालवाहतूक करणाºया वाहनांची लाखांच्या घरात नोंदणी झालेली आहे. तसेच दरदिवशी नोंदणी सुरुच असते. मात्र, या लाखो प्रवाशांना आता कल्याणसारख्या दूरवरच्या ठिकाणी जावे लागणार आहे.- कल्याण पालघर जिल्ह्यापासून खूप अंतरावर आहे. त्याठिकाणी ये-जा करण्यासाठी वेळ, इंधन आणि पैसा खर्ची घालावा लागणार आहे. एका दिवसात चाचणी झाली नाही तर पुन्हा हेलपाटे मारावे लागणार असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.- उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने त्याप्रमाणेच वागावे लागणार आहे. पण, आदिवासी पालघर जिल्ह्याचा विचार करून परिवहन विभागाने जिल्ह्यात सरकारी जागेत ब्रेक टेस्ट ट्र्ॅक तयार करावेत , अशी मागणी विजय खेतले यांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार