शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ रस्त्याच्या कामात दिरंगाई; विद्यार्थ्यांना करावी लागते पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 23:11 IST

गोऱ्हे-गालतरे बससेवा महिन्यापासून बंद

वाडा : वाडा तालुक्यातील गोऱ्हे-गालतरे रस्त्याचे काम संथगतीने सुरू झाल्यामुळे बससेवा बंद झाली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून दररोज चार ते पाच किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालघर जिल्ह्यात थंडीची लाट असताना विद्यार्थ्यांना पहाटेच्या सुमारास लवकर उठून बसविना थंडीत पायपीट करावी लागत आहे.

तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा वाडा-गोऱ्हे-गालतरे रस्त्यावर गोऱ्हे येथे काँक्रिटीकरण कामाला एक महिना पूर्ण झाला असून संबंधित ठेकेदाराकडून दिरंगाई होताना दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याचे काम चालू असताना कुठेही फलक लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

गोऱ्हे-गालतरे हा रस्ता चार ते पाच कि.मी. लांबीचा असून त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून दहा कोटी निधी देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट टाकलेले दिसत आहे. रस्त्याचे काम चालू असताना पर्यायी रस्ता अरुंद असल्याने बस व इतर वाहने येत नसल्याने विद्यार्थ्यांना तसेच येथील नागरिकांना पायपीट करून घरी परतावे लागते. याबाबतीत मुख्यमंत्री सडक योजनेतील शाखा अभियंता विनोद घोलप यांना विचारले असता कुठलीही बससेवा बंद नसून याबाबतीत माझ्यापर्यंत काहीही आलेले नाही. बससेवा बंद असेल तर ती सुरू करण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले.

दरम्यान, रस्त्याचे काम चालू असल्यामुळे गावातून बस जात नाही. गावाच्या बाहेरून अरुंद रस्त्यावरून बस चालकाने बस फिरवण्यासाठी प्रयत्न करत असताना एका घराचा पत्रा तुटला. तो त्या वाहकाने भरून दिला. त्यामुळे रस्ता अरुंद असल्याने बससेवा बंद करण्यात आली आहे.

लवकरात लवकर काम पूर्ण करा

जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे काम दर्जेदार असेल याची खात्री आहे, परंतु रस्त्याचे काम खूप संथ गतीने चालू असल्याकारणामुळे बससेवा गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांचे हाल होत असून त्यांना प्रवासासाठी वणवण करून शाळेत जावे लागते. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करून शाळेतील मुलांचा त्रास दूर करावा.

- डॉ. राहुल पाटीलनाणे-गोऱ्हे रस्त्याचे काम संथ गतीने चालू आहे, त्यामुळे शाळेतील मुलांना जाण्यासाठी खूप त्रास होतो. कारण एस.टी. सेवाही बंद करण्यात आली आहे. तसेच रस्त्याचे काम चालू असताना कुठेही फलक लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला होणारा त्रास कमी करावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी केली आहे.- वैभव पाटील, नाणे

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरार