शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

‘त्या’ रस्त्याच्या कामात दिरंगाई; विद्यार्थ्यांना करावी लागते पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 23:11 IST

गोऱ्हे-गालतरे बससेवा महिन्यापासून बंद

वाडा : वाडा तालुक्यातील गोऱ्हे-गालतरे रस्त्याचे काम संथगतीने सुरू झाल्यामुळे बससेवा बंद झाली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून दररोज चार ते पाच किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालघर जिल्ह्यात थंडीची लाट असताना विद्यार्थ्यांना पहाटेच्या सुमारास लवकर उठून बसविना थंडीत पायपीट करावी लागत आहे.

तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा वाडा-गोऱ्हे-गालतरे रस्त्यावर गोऱ्हे येथे काँक्रिटीकरण कामाला एक महिना पूर्ण झाला असून संबंधित ठेकेदाराकडून दिरंगाई होताना दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याचे काम चालू असताना कुठेही फलक लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

गोऱ्हे-गालतरे हा रस्ता चार ते पाच कि.मी. लांबीचा असून त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून दहा कोटी निधी देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट टाकलेले दिसत आहे. रस्त्याचे काम चालू असताना पर्यायी रस्ता अरुंद असल्याने बस व इतर वाहने येत नसल्याने विद्यार्थ्यांना तसेच येथील नागरिकांना पायपीट करून घरी परतावे लागते. याबाबतीत मुख्यमंत्री सडक योजनेतील शाखा अभियंता विनोद घोलप यांना विचारले असता कुठलीही बससेवा बंद नसून याबाबतीत माझ्यापर्यंत काहीही आलेले नाही. बससेवा बंद असेल तर ती सुरू करण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले.

दरम्यान, रस्त्याचे काम चालू असल्यामुळे गावातून बस जात नाही. गावाच्या बाहेरून अरुंद रस्त्यावरून बस चालकाने बस फिरवण्यासाठी प्रयत्न करत असताना एका घराचा पत्रा तुटला. तो त्या वाहकाने भरून दिला. त्यामुळे रस्ता अरुंद असल्याने बससेवा बंद करण्यात आली आहे.

लवकरात लवकर काम पूर्ण करा

जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे काम दर्जेदार असेल याची खात्री आहे, परंतु रस्त्याचे काम खूप संथ गतीने चालू असल्याकारणामुळे बससेवा गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांचे हाल होत असून त्यांना प्रवासासाठी वणवण करून शाळेत जावे लागते. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करून शाळेतील मुलांचा त्रास दूर करावा.

- डॉ. राहुल पाटीलनाणे-गोऱ्हे रस्त्याचे काम संथ गतीने चालू आहे, त्यामुळे शाळेतील मुलांना जाण्यासाठी खूप त्रास होतो. कारण एस.टी. सेवाही बंद करण्यात आली आहे. तसेच रस्त्याचे काम चालू असताना कुठेही फलक लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला होणारा त्रास कमी करावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी केली आहे.- वैभव पाटील, नाणे

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरार