शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

‘त्या’ रस्त्याच्या कामात दिरंगाई; विद्यार्थ्यांना करावी लागते पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 23:11 IST

गोऱ्हे-गालतरे बससेवा महिन्यापासून बंद

वाडा : वाडा तालुक्यातील गोऱ्हे-गालतरे रस्त्याचे काम संथगतीने सुरू झाल्यामुळे बससेवा बंद झाली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून दररोज चार ते पाच किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालघर जिल्ह्यात थंडीची लाट असताना विद्यार्थ्यांना पहाटेच्या सुमारास लवकर उठून बसविना थंडीत पायपीट करावी लागत आहे.

तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा वाडा-गोऱ्हे-गालतरे रस्त्यावर गोऱ्हे येथे काँक्रिटीकरण कामाला एक महिना पूर्ण झाला असून संबंधित ठेकेदाराकडून दिरंगाई होताना दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याचे काम चालू असताना कुठेही फलक लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

गोऱ्हे-गालतरे हा रस्ता चार ते पाच कि.मी. लांबीचा असून त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून दहा कोटी निधी देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट टाकलेले दिसत आहे. रस्त्याचे काम चालू असताना पर्यायी रस्ता अरुंद असल्याने बस व इतर वाहने येत नसल्याने विद्यार्थ्यांना तसेच येथील नागरिकांना पायपीट करून घरी परतावे लागते. याबाबतीत मुख्यमंत्री सडक योजनेतील शाखा अभियंता विनोद घोलप यांना विचारले असता कुठलीही बससेवा बंद नसून याबाबतीत माझ्यापर्यंत काहीही आलेले नाही. बससेवा बंद असेल तर ती सुरू करण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले.

दरम्यान, रस्त्याचे काम चालू असल्यामुळे गावातून बस जात नाही. गावाच्या बाहेरून अरुंद रस्त्यावरून बस चालकाने बस फिरवण्यासाठी प्रयत्न करत असताना एका घराचा पत्रा तुटला. तो त्या वाहकाने भरून दिला. त्यामुळे रस्ता अरुंद असल्याने बससेवा बंद करण्यात आली आहे.

लवकरात लवकर काम पूर्ण करा

जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे काम दर्जेदार असेल याची खात्री आहे, परंतु रस्त्याचे काम खूप संथ गतीने चालू असल्याकारणामुळे बससेवा गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांचे हाल होत असून त्यांना प्रवासासाठी वणवण करून शाळेत जावे लागते. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करून शाळेतील मुलांचा त्रास दूर करावा.

- डॉ. राहुल पाटीलनाणे-गोऱ्हे रस्त्याचे काम संथ गतीने चालू आहे, त्यामुळे शाळेतील मुलांना जाण्यासाठी खूप त्रास होतो. कारण एस.टी. सेवाही बंद करण्यात आली आहे. तसेच रस्त्याचे काम चालू असताना कुठेही फलक लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला होणारा त्रास कमी करावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी केली आहे.- वैभव पाटील, नाणे

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरार