शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

जव्हार रुग्णालयात पाणीबाणी

By admin | Updated: May 22, 2016 01:23 IST

‘कोणी प्यायला पाणी देता का पाणी’ म्हणत दारोदार पाण्याची भिक्षा मागण्याचा दुर्देवी प्रसंग सध्या जव्हार ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर ओढवला आहे.

हुसेन मेमन,  जव्हार‘कोणी प्यायला पाणी देता का पाणी’ म्हणत दारोदार पाण्याची भिक्षा मागण्याचा दुर्देवी प्रसंग सध्या जव्हार ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर ओढवला आहे. ग्रामीण रुग्णालयात पाण्याचा थेंब नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहेच परंतु अतिशय संतापाची बाब म्हणजे जे उपचारासाठी दाखल आहेत त्या रुग्ण महिलांना स्वत:च्या आजारपणाची पर्वा न करता घोटभर पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते आहे . पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेकडून शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो शिवाय आठवड्यातील दोन दिवस पाणी पुरवठा बंद असतो. तालुक्यातील १ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी असलेल्या शासकीय व सुसज्य अशा एकमेव ग्रामीण रुग्णालयासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे तेथे उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील आदिवासी रुग्णांना, त्यांच्या देखभालीसाठी आलेल्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. हॉस्पिटलच्या परिसरातील रहिवाशांनाच पाणी मिळत नाही तर ते रुग्णांना किंवा त्यांच्या आप्तांना कुठून देणार?जव्हार ग्रामीण रुग्णालयात दररोज सरासरी ३५० रुग्ण तपासणी साठी येतात, त्यातील बराचशा रु ग्णावर भरती करून उपचार करण्याची आवश्यकता असते. परंतु अगोदरच क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण भरती असल्यामुळे अनेकांना ८० कि.मी.दूर असलेल्या नाशिक, ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात हलवावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थतीत रुग्णसेवा करीत असले तरी पाणी नाही, लाईट नाही हे वास्तव उरतेच. ही सेवा सुरळीत ठेवण्याचे काम पालिका प्रशासनाचे आहे याचा विचार न करता खापर मात्र हॉस्पिटल प्रशासनावरच फोडले जाते. रुग्णालयात पाण्याची भीषण पाणी टंचाई असताना जव्हार नगरपरिषद त्यांना दिवसाला पाण्याचे दोन छोटे टँकर देते. हे ४००० लिटर्स पाणी तपासणीसाठी आलेले रु ग्ण , भरती असलेले रुग्ण व त्यांचा सोबत आलेले नातेवाईक, कर्मचारी निवासस्थाने यांना पिण्यासाठी तसेच प्राथमिक गरजांसाठी पाणी पुरत नाही.