शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

जव्हार रुग्णालयात पाणीबाणी

By admin | Updated: May 22, 2016 01:23 IST

‘कोणी प्यायला पाणी देता का पाणी’ म्हणत दारोदार पाण्याची भिक्षा मागण्याचा दुर्देवी प्रसंग सध्या जव्हार ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर ओढवला आहे.

हुसेन मेमन,  जव्हार‘कोणी प्यायला पाणी देता का पाणी’ म्हणत दारोदार पाण्याची भिक्षा मागण्याचा दुर्देवी प्रसंग सध्या जव्हार ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर ओढवला आहे. ग्रामीण रुग्णालयात पाण्याचा थेंब नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहेच परंतु अतिशय संतापाची बाब म्हणजे जे उपचारासाठी दाखल आहेत त्या रुग्ण महिलांना स्वत:च्या आजारपणाची पर्वा न करता घोटभर पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते आहे . पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेकडून शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो शिवाय आठवड्यातील दोन दिवस पाणी पुरवठा बंद असतो. तालुक्यातील १ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी असलेल्या शासकीय व सुसज्य अशा एकमेव ग्रामीण रुग्णालयासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे तेथे उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील आदिवासी रुग्णांना, त्यांच्या देखभालीसाठी आलेल्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. हॉस्पिटलच्या परिसरातील रहिवाशांनाच पाणी मिळत नाही तर ते रुग्णांना किंवा त्यांच्या आप्तांना कुठून देणार?जव्हार ग्रामीण रुग्णालयात दररोज सरासरी ३५० रुग्ण तपासणी साठी येतात, त्यातील बराचशा रु ग्णावर भरती करून उपचार करण्याची आवश्यकता असते. परंतु अगोदरच क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण भरती असल्यामुळे अनेकांना ८० कि.मी.दूर असलेल्या नाशिक, ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात हलवावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थतीत रुग्णसेवा करीत असले तरी पाणी नाही, लाईट नाही हे वास्तव उरतेच. ही सेवा सुरळीत ठेवण्याचे काम पालिका प्रशासनाचे आहे याचा विचार न करता खापर मात्र हॉस्पिटल प्रशासनावरच फोडले जाते. रुग्णालयात पाण्याची भीषण पाणी टंचाई असताना जव्हार नगरपरिषद त्यांना दिवसाला पाण्याचे दोन छोटे टँकर देते. हे ४००० लिटर्स पाणी तपासणीसाठी आलेले रु ग्ण , भरती असलेले रुग्ण व त्यांचा सोबत आलेले नातेवाईक, कर्मचारी निवासस्थाने यांना पिण्यासाठी तसेच प्राथमिक गरजांसाठी पाणी पुरत नाही.