शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

जव्हार रुग्णालयात पाणीबाणी

By admin | Updated: May 22, 2016 01:23 IST

‘कोणी प्यायला पाणी देता का पाणी’ म्हणत दारोदार पाण्याची भिक्षा मागण्याचा दुर्देवी प्रसंग सध्या जव्हार ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर ओढवला आहे.

हुसेन मेमन,  जव्हार‘कोणी प्यायला पाणी देता का पाणी’ म्हणत दारोदार पाण्याची भिक्षा मागण्याचा दुर्देवी प्रसंग सध्या जव्हार ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर ओढवला आहे. ग्रामीण रुग्णालयात पाण्याचा थेंब नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहेच परंतु अतिशय संतापाची बाब म्हणजे जे उपचारासाठी दाखल आहेत त्या रुग्ण महिलांना स्वत:च्या आजारपणाची पर्वा न करता घोटभर पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते आहे . पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेकडून शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो शिवाय आठवड्यातील दोन दिवस पाणी पुरवठा बंद असतो. तालुक्यातील १ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी असलेल्या शासकीय व सुसज्य अशा एकमेव ग्रामीण रुग्णालयासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे तेथे उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील आदिवासी रुग्णांना, त्यांच्या देखभालीसाठी आलेल्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. हॉस्पिटलच्या परिसरातील रहिवाशांनाच पाणी मिळत नाही तर ते रुग्णांना किंवा त्यांच्या आप्तांना कुठून देणार?जव्हार ग्रामीण रुग्णालयात दररोज सरासरी ३५० रुग्ण तपासणी साठी येतात, त्यातील बराचशा रु ग्णावर भरती करून उपचार करण्याची आवश्यकता असते. परंतु अगोदरच क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण भरती असल्यामुळे अनेकांना ८० कि.मी.दूर असलेल्या नाशिक, ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात हलवावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थतीत रुग्णसेवा करीत असले तरी पाणी नाही, लाईट नाही हे वास्तव उरतेच. ही सेवा सुरळीत ठेवण्याचे काम पालिका प्रशासनाचे आहे याचा विचार न करता खापर मात्र हॉस्पिटल प्रशासनावरच फोडले जाते. रुग्णालयात पाण्याची भीषण पाणी टंचाई असताना जव्हार नगरपरिषद त्यांना दिवसाला पाण्याचे दोन छोटे टँकर देते. हे ४००० लिटर्स पाणी तपासणीसाठी आलेले रु ग्ण , भरती असलेले रुग्ण व त्यांचा सोबत आलेले नातेवाईक, कर्मचारी निवासस्थाने यांना पिण्यासाठी तसेच प्राथमिक गरजांसाठी पाणी पुरत नाही.