शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

पाझर तलावातून टँकरने पाणी चोरी

By admin | Updated: March 30, 2016 01:17 IST

मार्च महिन्यात अखेरीस वसई विरार शहराला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असतांनाच सुगीचे दिवस आलेल्या टँकर लॉबीने तहसिलदारांचे आदेश धाब्यावर बसवून विरार जवळील

- शशी करपे,  वसई मार्च महिन्यात अखेरीस वसई विरार शहराला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असतांनाच सुगीचे दिवस आलेल्या टँकर लॉबीने तहसिलदारांचे आदेश धाब्यावर बसवून विरार जवळील एका पाझर तलावामध्ये पाणी चोरायला सुरुवात केली आहे उसगाव नदीतून पाणी उचलण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले असताना टँकर लॉबीने जवळच असलेल्या विहीरी आणि बोअरवेलमधून बेकायदा पाणी उपसा सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बांधकामांनाही आता टँकरने पाणी पुरवले जाऊ लागले आहे. वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेल्हार आणि उसगाव धरणातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. सूर्या धरणातून दररोज होणाऱ्या शंभर एमएलडी पाण्यावर शहराची मदार आहे. एकीकडे, इतर धरणातील पाणी साठा कमी होत चालला असताना सूर्या धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्येही अधूनमधून बिघाड होत असल्याने शहरात कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाणी टंचाईचा फायदा टँकर लॉबीला होऊ लागला आहे. वसई तालुक्यात सध्या साडेसहाशेहून अधिक टँकर धावतात. प्रत्येक टँकर दिवसाला चार फेऱ्या मारतो. यावरून महापालिका पाणी पुरवण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. टँकर चालक वसईच्या पूर्वेकडील गावांमधील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करून पुरवठा करीत आहेत. त्याठिकाणच्या लोकांच्या तक्रारी आल्यानंतर वसईचे तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी टँकर बंदी घातली होती. त्यामुळे वसईतील टँकर तीन दिवस बंद होते. पण, पाणी टंचाई लक्षात आल्यानंतर प्रांताधिकारी आणि तहसिलदारांनी टँकर चालकांना उसगाव नदीतून पंधरा दिवस पाणी उचलण्यास परवानगी दिली होती. तसेच गावातील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करण्यास बंदी घातली होती. त्याचबरोबर तलाठ्यांमार्फत स्थानिक विहीर आणि बोअरवेल मालकांना टँकरना पाणी विकण्यास मनाई केली होती. खुलेआम विहिर, बोअरवेलमधून पंपाने उपसा- टँकरचालक आणि विहीर व बोअरवेल मालकांनी तहसिलदारांचा आदेश धुडकावून पाणी विकण्याचा धंदा खुलेआम सुरु ठेवला आहे. - उसगाव नदी तीस ते चाळीस किलोमीटर दूर असल्याने वेळ आणि इंधन वाया जाऊन आर्थिक नुकसान होत असल्याने टँकर चालकांनी विरार, नालासोपारा आणि वसई पूर्वेकडील गावांमधील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा सुरु ठेवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी महावितरणच्या खांबांवरून चोरीचे वीज कनेक्शन घेतले गेल्याचे दिसून येते.पाझर तलावावर ‘दरोडा’पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन टँकर लॉबीने जवळच्या ठिकाणाहून जिथून मिळेल तिथून पाणी चोरायला सुरुवात केली आहे. विरारपासून सात किलोमीटर अंतरावर गासपाडा गावच्या हद्दीत असलेल्या एका पाझर तलावातून पंप लावून टँकरमध्ये पाणी भरले जाते. गावातील एक माणूस सरकारी तलावातील पाणी विकण्याचा धंदा करीत आहे. या परिसरात काही जणांनी बोअरवेल मारल्या असून त्यातूनही पाणी विक्री केली जात आहे. नालासोपाऱ्यातहिरवळीवर पाणी नालासोपारा शहरात सध्या प्रचंड पाणी टंचाई भेडसावत आहे. मात्र, शहरातील पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या शुर्पारक मैदानातील हिरवळीवर दिवसातून दोन वेळा चक्क दीड दीड तास पाणी मारले जात आहे. इथून जवळच पालिकेचा १० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आहे. त्यामधून मैदानातील हिरवळीसाठी पाणी वापरले जात आहे.