शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

पाझर तलावातून टँकरने पाणी चोरी

By admin | Updated: March 30, 2016 01:17 IST

मार्च महिन्यात अखेरीस वसई विरार शहराला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असतांनाच सुगीचे दिवस आलेल्या टँकर लॉबीने तहसिलदारांचे आदेश धाब्यावर बसवून विरार जवळील

- शशी करपे,  वसई मार्च महिन्यात अखेरीस वसई विरार शहराला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असतांनाच सुगीचे दिवस आलेल्या टँकर लॉबीने तहसिलदारांचे आदेश धाब्यावर बसवून विरार जवळील एका पाझर तलावामध्ये पाणी चोरायला सुरुवात केली आहे उसगाव नदीतून पाणी उचलण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले असताना टँकर लॉबीने जवळच असलेल्या विहीरी आणि बोअरवेलमधून बेकायदा पाणी उपसा सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बांधकामांनाही आता टँकरने पाणी पुरवले जाऊ लागले आहे. वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेल्हार आणि उसगाव धरणातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. सूर्या धरणातून दररोज होणाऱ्या शंभर एमएलडी पाण्यावर शहराची मदार आहे. एकीकडे, इतर धरणातील पाणी साठा कमी होत चालला असताना सूर्या धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्येही अधूनमधून बिघाड होत असल्याने शहरात कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाणी टंचाईचा फायदा टँकर लॉबीला होऊ लागला आहे. वसई तालुक्यात सध्या साडेसहाशेहून अधिक टँकर धावतात. प्रत्येक टँकर दिवसाला चार फेऱ्या मारतो. यावरून महापालिका पाणी पुरवण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. टँकर चालक वसईच्या पूर्वेकडील गावांमधील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करून पुरवठा करीत आहेत. त्याठिकाणच्या लोकांच्या तक्रारी आल्यानंतर वसईचे तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी टँकर बंदी घातली होती. त्यामुळे वसईतील टँकर तीन दिवस बंद होते. पण, पाणी टंचाई लक्षात आल्यानंतर प्रांताधिकारी आणि तहसिलदारांनी टँकर चालकांना उसगाव नदीतून पंधरा दिवस पाणी उचलण्यास परवानगी दिली होती. तसेच गावातील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करण्यास बंदी घातली होती. त्याचबरोबर तलाठ्यांमार्फत स्थानिक विहीर आणि बोअरवेल मालकांना टँकरना पाणी विकण्यास मनाई केली होती. खुलेआम विहिर, बोअरवेलमधून पंपाने उपसा- टँकरचालक आणि विहीर व बोअरवेल मालकांनी तहसिलदारांचा आदेश धुडकावून पाणी विकण्याचा धंदा खुलेआम सुरु ठेवला आहे. - उसगाव नदी तीस ते चाळीस किलोमीटर दूर असल्याने वेळ आणि इंधन वाया जाऊन आर्थिक नुकसान होत असल्याने टँकर चालकांनी विरार, नालासोपारा आणि वसई पूर्वेकडील गावांमधील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा सुरु ठेवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी महावितरणच्या खांबांवरून चोरीचे वीज कनेक्शन घेतले गेल्याचे दिसून येते.पाझर तलावावर ‘दरोडा’पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन टँकर लॉबीने जवळच्या ठिकाणाहून जिथून मिळेल तिथून पाणी चोरायला सुरुवात केली आहे. विरारपासून सात किलोमीटर अंतरावर गासपाडा गावच्या हद्दीत असलेल्या एका पाझर तलावातून पंप लावून टँकरमध्ये पाणी भरले जाते. गावातील एक माणूस सरकारी तलावातील पाणी विकण्याचा धंदा करीत आहे. या परिसरात काही जणांनी बोअरवेल मारल्या असून त्यातूनही पाणी विक्री केली जात आहे. नालासोपाऱ्यातहिरवळीवर पाणी नालासोपारा शहरात सध्या प्रचंड पाणी टंचाई भेडसावत आहे. मात्र, शहरातील पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या शुर्पारक मैदानातील हिरवळीवर दिवसातून दोन वेळा चक्क दीड दीड तास पाणी मारले जात आहे. इथून जवळच पालिकेचा १० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आहे. त्यामधून मैदानातील हिरवळीसाठी पाणी वापरले जात आहे.