शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाखांची तरतूद तरी पाण्याच्या टाक्या अस्वच्छ; शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 05:00 IST

टाक्या स्वच्छ करण्यासाठी १५ लाख रूपयांची तरतुद गेल्या अंदाज पत्रकात केली असूनही हा निधी वापरला गेलेला नाही

विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पाणी साठवण टाक्या पावसाळयापूर्वी साफ करण्याची मागणी शिवसेनेने महापालिकेकडे केली आहे. गेले वर्षभर पाण्याच्या टाक्या साफच करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे़ महापालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.टाक्या स्वच्छ करण्यासाठी १५ लाख रूपयांची तरतुद गेल्या अंदाज पत्रकात केली असूनही हा निधी वापरला गेलेला नाही असे सांगण्यात आले. वसई - विरार महापालिका क्षेत्रात सूर्या पाणीपूरवठा योजना, उसगाव धरण आणि पेल्हार धरणातून २३० दशलक्ष लीटर पाणीपूरवठा केला जातो. मुख्य जलवाहिनीतून हे पाणी शहरात आल्यानंतर साठवण टाकीत येते.Þ त्यानंतर या पाण्याचे वितरण शहरात केले जाते.सध्या शहरात ३५ साठवण टाक्या आहेत. या शिवाय १८ नवीन टाक्यांचे काम सुरू आहे. त्यातील ५ टाक्या पूर्ण होत आल्या आहेत. सध्या ३५ साठवण टाकीतून नागरिकांना पाणी पूरवले जाते. दर तीन महिन्यांनी या टाक्या स्वच्छ करणे बंधनकारक असते Þमात्र, मागील दोन वर्षांपासून या साठवण टाक्या स्वच्छ केल्या नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या स्थितीमुळे नागरिकांना गढूळ आणि दूषित पाणी मिळत असून, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.आदेशाला केराची टोपलीवसई पूर्वेकडील प्रभागात असलेली साठवण टाकी स्वच्छ करण्यात आलेली नव्हती. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती.साठवण टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश शहर अभियंत्यांनी काढले तरी देखील टाक्या स्वच्छ करण्यात आल्या नाहीत, असे गटनेत्या स्वाती चेंदवणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना