शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

१५ लाखांची तरतूद तरी पाण्याच्या टाक्या अस्वच्छ; शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 05:00 IST

टाक्या स्वच्छ करण्यासाठी १५ लाख रूपयांची तरतुद गेल्या अंदाज पत्रकात केली असूनही हा निधी वापरला गेलेला नाही

विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पाणी साठवण टाक्या पावसाळयापूर्वी साफ करण्याची मागणी शिवसेनेने महापालिकेकडे केली आहे. गेले वर्षभर पाण्याच्या टाक्या साफच करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे़ महापालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.टाक्या स्वच्छ करण्यासाठी १५ लाख रूपयांची तरतुद गेल्या अंदाज पत्रकात केली असूनही हा निधी वापरला गेलेला नाही असे सांगण्यात आले. वसई - विरार महापालिका क्षेत्रात सूर्या पाणीपूरवठा योजना, उसगाव धरण आणि पेल्हार धरणातून २३० दशलक्ष लीटर पाणीपूरवठा केला जातो. मुख्य जलवाहिनीतून हे पाणी शहरात आल्यानंतर साठवण टाकीत येते.Þ त्यानंतर या पाण्याचे वितरण शहरात केले जाते.सध्या शहरात ३५ साठवण टाक्या आहेत. या शिवाय १८ नवीन टाक्यांचे काम सुरू आहे. त्यातील ५ टाक्या पूर्ण होत आल्या आहेत. सध्या ३५ साठवण टाकीतून नागरिकांना पाणी पूरवले जाते. दर तीन महिन्यांनी या टाक्या स्वच्छ करणे बंधनकारक असते Þमात्र, मागील दोन वर्षांपासून या साठवण टाक्या स्वच्छ केल्या नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या स्थितीमुळे नागरिकांना गढूळ आणि दूषित पाणी मिळत असून, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.आदेशाला केराची टोपलीवसई पूर्वेकडील प्रभागात असलेली साठवण टाकी स्वच्छ करण्यात आलेली नव्हती. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती.साठवण टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश शहर अभियंत्यांनी काढले तरी देखील टाक्या स्वच्छ करण्यात आल्या नाहीत, असे गटनेत्या स्वाती चेंदवणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना