शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

विक्रमगड तालुक्यात पाणीबाणी, टँकरची मागणी वाढली, सध्या एका टँकरद्वारे होतात चार फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:35 IST

सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे.

विक्रमगड : सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे़. तालुक्यात दरवर्षी ३४ ते ३५ गावपाडयांना पाणीटंचाईची झळ बसत असते़ व टॅकरने पाणीपुरठा करावा लागतो़यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील्याने फेब्रुवारी पासूनच येथे पाणी टंचाई सुरु झाली आहे, ती आता मे मध्ये पराकोटीला पोहचली आहे. जोपर्यत चांगला पाउस होत नाही तोपर्यत पाणी टंचाईचा सामना करावाच लागणार आहे़ गेल्या दोन वर्षापासून विक्रमगड तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ त्यामुळे नदी, नाले, विहीरी आटून विविध गाव पाडयांत पाणीटंचाई सुरु झाली आहे़ सध्या शासनाच्या आठवडा अहवालानुसार खुडेद, घोडीचापाडा, कुंडाचापाडा, झापपाडा, कोंडगाव, गावठाण, सवादे, फडवळेपाडा अशा गावपाडयांना १ टँकरने दिवसाला ४ फे-या मारुन पाणी पुरवठा केला जात आहे़तर अनेक गाव पाडयांचे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यांत आलेले आहेत़ सध्या पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता तिन ते चार टँकरची आवश्यकता असून तसा प्रस्ताव पाठविण्यांत आलेला आहे़तालुक्यात गावपाडयातील विविध जलस्त्रोत पूर्ण आटले असून सध्या वेहेलपाडा, देहेर्जे, साखरे, खुडेद, घाणेघर, सुकसाळे, टेटवाली, जांभे, केव, तलवाडा, दादडे या महसुली गावांसह काचरपाडा, फरलेपाडा, मेढीचापाडा, पाटीलपाडा, महालेपाडा, सुरुमपाडा, काकडपाडा, गांगडपाडा नाळशेत, शिळशेत-तरेपाडा-वेडगेपाडा, शनवारपाडा, रोजपाडा आदी ठिकाणी लोकांना पाण्यासाठी नदीचा आसरा घ्यावा लागत आहे़. तसेच डोंगरी पाडयावर देखील अशीच परिस्थिती असून गेल्या १० ते २० दिवसांपासून येथील महिलांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हांत वणवण भटकंती करावी लागते आहे़.विक्रमगड तालुक्यात या भागत तर दरवर्षी पाणी टंचाईची झळ बसत असतांनाही प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची हालचल करतांना दिसत नाही़ त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी पहाटे उठून लांबचा पल्ला असो तरीही ही पायपीट करावीच लागते़ यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्याबाबतही वर्षानुवर्षे काहीही कारवाई होत नाही.टंचाई निवारणाबाबत जिल्हा प्रशासन पुरेसे गंभीर नाहीप्रशासनाने जानेवारी महिन्यापासूनच संभाव्य यावर मात करण्याकरीता टंचाई निवारण आराखडा तयार करुन ती निर्माणच होऊ नये यासाठी याकरीता गंभीर पावले उचलावयास हवी जेणे करुन टंचाईग्रस्त भागाचा वाढत जाणार भार कमी होईल़ फेब्रुवारी महिन्यातच आटत चालेल्या विहीरींमध्ये टँकरने पाणी ओतले पाहीजे़ अशी भूमीका अगोदरच पासून ठेवल्यास पाणी टंचाई होणार नाही.

टॅग्स :Waterपाणी