शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड तालुक्यात पाणीबाणी, टँकरची मागणी वाढली, सध्या एका टँकरद्वारे होतात चार फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:35 IST

सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे.

विक्रमगड : सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे़. तालुक्यात दरवर्षी ३४ ते ३५ गावपाडयांना पाणीटंचाईची झळ बसत असते़ व टॅकरने पाणीपुरठा करावा लागतो़यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील्याने फेब्रुवारी पासूनच येथे पाणी टंचाई सुरु झाली आहे, ती आता मे मध्ये पराकोटीला पोहचली आहे. जोपर्यत चांगला पाउस होत नाही तोपर्यत पाणी टंचाईचा सामना करावाच लागणार आहे़ गेल्या दोन वर्षापासून विक्रमगड तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ त्यामुळे नदी, नाले, विहीरी आटून विविध गाव पाडयांत पाणीटंचाई सुरु झाली आहे़ सध्या शासनाच्या आठवडा अहवालानुसार खुडेद, घोडीचापाडा, कुंडाचापाडा, झापपाडा, कोंडगाव, गावठाण, सवादे, फडवळेपाडा अशा गावपाडयांना १ टँकरने दिवसाला ४ फे-या मारुन पाणी पुरवठा केला जात आहे़तर अनेक गाव पाडयांचे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यांत आलेले आहेत़ सध्या पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता तिन ते चार टँकरची आवश्यकता असून तसा प्रस्ताव पाठविण्यांत आलेला आहे़तालुक्यात गावपाडयातील विविध जलस्त्रोत पूर्ण आटले असून सध्या वेहेलपाडा, देहेर्जे, साखरे, खुडेद, घाणेघर, सुकसाळे, टेटवाली, जांभे, केव, तलवाडा, दादडे या महसुली गावांसह काचरपाडा, फरलेपाडा, मेढीचापाडा, पाटीलपाडा, महालेपाडा, सुरुमपाडा, काकडपाडा, गांगडपाडा नाळशेत, शिळशेत-तरेपाडा-वेडगेपाडा, शनवारपाडा, रोजपाडा आदी ठिकाणी लोकांना पाण्यासाठी नदीचा आसरा घ्यावा लागत आहे़. तसेच डोंगरी पाडयावर देखील अशीच परिस्थिती असून गेल्या १० ते २० दिवसांपासून येथील महिलांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हांत वणवण भटकंती करावी लागते आहे़.विक्रमगड तालुक्यात या भागत तर दरवर्षी पाणी टंचाईची झळ बसत असतांनाही प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची हालचल करतांना दिसत नाही़ त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी पहाटे उठून लांबचा पल्ला असो तरीही ही पायपीट करावीच लागते़ यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्याबाबतही वर्षानुवर्षे काहीही कारवाई होत नाही.टंचाई निवारणाबाबत जिल्हा प्रशासन पुरेसे गंभीर नाहीप्रशासनाने जानेवारी महिन्यापासूनच संभाव्य यावर मात करण्याकरीता टंचाई निवारण आराखडा तयार करुन ती निर्माणच होऊ नये यासाठी याकरीता गंभीर पावले उचलावयास हवी जेणे करुन टंचाईग्रस्त भागाचा वाढत जाणार भार कमी होईल़ फेब्रुवारी महिन्यातच आटत चालेल्या विहीरींमध्ये टँकरने पाणी ओतले पाहीजे़ अशी भूमीका अगोदरच पासून ठेवल्यास पाणी टंचाई होणार नाही.

टॅग्स :Waterपाणी