शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड तालुक्यात पाणीबाणी, टँकरची मागणी वाढली, सध्या एका टँकरद्वारे होतात चार फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:35 IST

सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे.

विक्रमगड : सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे़. तालुक्यात दरवर्षी ३४ ते ३५ गावपाडयांना पाणीटंचाईची झळ बसत असते़ व टॅकरने पाणीपुरठा करावा लागतो़यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील्याने फेब्रुवारी पासूनच येथे पाणी टंचाई सुरु झाली आहे, ती आता मे मध्ये पराकोटीला पोहचली आहे. जोपर्यत चांगला पाउस होत नाही तोपर्यत पाणी टंचाईचा सामना करावाच लागणार आहे़ गेल्या दोन वर्षापासून विक्रमगड तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ त्यामुळे नदी, नाले, विहीरी आटून विविध गाव पाडयांत पाणीटंचाई सुरु झाली आहे़ सध्या शासनाच्या आठवडा अहवालानुसार खुडेद, घोडीचापाडा, कुंडाचापाडा, झापपाडा, कोंडगाव, गावठाण, सवादे, फडवळेपाडा अशा गावपाडयांना १ टँकरने दिवसाला ४ फे-या मारुन पाणी पुरवठा केला जात आहे़तर अनेक गाव पाडयांचे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यांत आलेले आहेत़ सध्या पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता तिन ते चार टँकरची आवश्यकता असून तसा प्रस्ताव पाठविण्यांत आलेला आहे़तालुक्यात गावपाडयातील विविध जलस्त्रोत पूर्ण आटले असून सध्या वेहेलपाडा, देहेर्जे, साखरे, खुडेद, घाणेघर, सुकसाळे, टेटवाली, जांभे, केव, तलवाडा, दादडे या महसुली गावांसह काचरपाडा, फरलेपाडा, मेढीचापाडा, पाटीलपाडा, महालेपाडा, सुरुमपाडा, काकडपाडा, गांगडपाडा नाळशेत, शिळशेत-तरेपाडा-वेडगेपाडा, शनवारपाडा, रोजपाडा आदी ठिकाणी लोकांना पाण्यासाठी नदीचा आसरा घ्यावा लागत आहे़. तसेच डोंगरी पाडयावर देखील अशीच परिस्थिती असून गेल्या १० ते २० दिवसांपासून येथील महिलांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हांत वणवण भटकंती करावी लागते आहे़.विक्रमगड तालुक्यात या भागत तर दरवर्षी पाणी टंचाईची झळ बसत असतांनाही प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची हालचल करतांना दिसत नाही़ त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी पहाटे उठून लांबचा पल्ला असो तरीही ही पायपीट करावीच लागते़ यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्याबाबतही वर्षानुवर्षे काहीही कारवाई होत नाही.टंचाई निवारणाबाबत जिल्हा प्रशासन पुरेसे गंभीर नाहीप्रशासनाने जानेवारी महिन्यापासूनच संभाव्य यावर मात करण्याकरीता टंचाई निवारण आराखडा तयार करुन ती निर्माणच होऊ नये यासाठी याकरीता गंभीर पावले उचलावयास हवी जेणे करुन टंचाईग्रस्त भागाचा वाढत जाणार भार कमी होईल़ फेब्रुवारी महिन्यातच आटत चालेल्या विहीरींमध्ये टँकरने पाणी ओतले पाहीजे़ अशी भूमीका अगोदरच पासून ठेवल्यास पाणी टंचाई होणार नाही.

टॅग्स :Waterपाणी