शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

पाणीपुरवठा योजना अपूर्णच; जलयुक्त शिवारांतर्गत विहिरी नूतनीकरणावर करोडोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:38 IST

मार्च महिन्यापासून तहाणलेल्या विक्रमगडमध्ये मे महिन्यापर्यंन खडखडाट होतो. तालुक्यातील काही गावपाड्यांमध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. नदी-नाले आटू लागले असून विहीरींनीही तळ गाठला आहे.

तलवाडा : मार्च महिन्यापासून तहाणलेल्या विक्रमगडमध्ये मे महिन्यापर्यंन खडखडाट होतो. तालुक्यातील काही गावपाड्यांमध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. नदी-नाले आटू लागले असून विहीरींनीही तळ गाठला आहे. दरम्यान, दरवर्षीच्या या रडगाण्यावर गत तेरा वर्षांपासून सुरु असलेली पाणी पुरवठा योजनांची मलमपट्टी अपुर्ण अवस्थेमध्ये असल्याने दोषी अधिकारी व ठेकेदाराचीं चौकशीची मागणी होत आहे.तालुक्यातील १० ग्राम पंचायतींसाठी राबविण्यात आलेल्या नळपाणी योजना अर्धवट अवस्थेमध्ये असून त्यातील ६ योजना १३ वर्षा पासून तर ४ योजना ६ वर्षा पासून रखडलेल्या असल्याने या योजनाच्या कामात गैर प्रकार झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनाच्या अपूर्ण अवस्थेबाबत जिल्हा परीषद प्रशासनाकडे अनेक वेळा नागरिकांनी तक्र ारी करून ही जिल्हा परीषद पाणी पुरवठा विभाग प्रत्यक्ष कुठल्याच प्रकारची चौकशी करत नसल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. या योजनान साठी तब्बल १ कोटी ९७ लाख ५९ हजार रु खर्च झाला आहे. तालुक्यातील २००४-५ साला पासून पाणी पुरवठा योजनांना साठी देहर्जे गावातील योजनेसाठी १५.८५ लाख निधी मंजूर होता पैकी १२.६० लाख वितरीत करण्यात आला. साखरेसाठी २२.९९ लाख निधी मंजूर होता त्यापैकी १७.७३ लाख वितरीत करण्यात आला. केव (शीलशेत) गावसाठी २१.६१ लाख निधी मंजूर होता. पैकी ८.६१ लाख निधी वितरीत करण्यात आला. या योजनात अपहार झाल्याने या योजना न्याय प्रविष्ठ असल्याने गेल्या १३ वर्षांपासून रखडल्या आहेत. २००५-६ साली दादाडे (कमळ पाडा) गावासाठी २३.०४ लाख निधी मंजूर होता. पैकी ८.६२ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. जांभा- पोचाडा गावासाठी १०.५१ लाख निधी मंजूर होता. पैकी ६.६१ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.टेटवालीसाठी ३४.२४ लाखटेटवाली (बागपाडा) गावासाठी ३४.२४ लाख निधी मंजूर होता. त्यापैकी २९.२७ लाख निधी वितरीत करण्यात आला. उपराले गावासाठी ४५.४४ लाख निधी मंजूर होता. त्या पैकी ३८.८५ लाख निधी वितरीत करण्यात आला. उटावली- पोटखल साठी ४४.९९ लाख निधी मंजूर होता. पैकी २५.६४ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.तालुक्यातील रखडलेल्या योजना पुर्ण करण्याचे आदेश आम्ही संबधिताना दिले आहेत. या योजना पुर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक विहीरी नुतनिकरणची कामे सुरु आहे.- एस.बी.कदम, प्रभारी अभियंता,पाणी पुरवठा विभाग, पं. स. विक्रमगड

टॅग्स :Vasai Virarवसई विरार