शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

न्याहाळेच्या ४ पाड्यांत पाणीटंचाई

By admin | Updated: April 24, 2017 23:46 IST

जव्हार तालुक्यातील न्याहाळे बु. ग्रामपंचायत हद्दीतील चार पाड्यांत पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी

जव्हार: जव्हार तालुक्यातील न्याहाळे बु. ग्रामपंचायत हद्दीतील चार पाड्यांत पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी महिनाभरापूर्वी टँकरची मागणी पंचायत समितीकडे करूनही टँकर मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत आमचे सरकार असूनही आम्हाला पिण्यासाठी पाणी नसल्याची खंत माजी सरपंच जीवा भोगाडे व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.१५ कि. मी. वर असलेल्या या ग्रामपंचायत हद्दीतील काष्टीपाडा, मोगरवाडी, मोरिगळा, शिवाकोरड्याचीमेट, या पाड्यांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून नदी, नाले, विहिरींवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. दरवर्षी भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याने येथील ग्रामस्थांनी २९ मार्च रोजी टँकर मागणीचा ठराव करून तो पंचायत समितीकडे पाठविला होता. त्याला आता महिना उलटायला तरी या चार पाड्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू करण्यात आला नाही. येथील अधिका-यांकडून तहसिलदारांचा पाहणी अहवाल आणा नंतरच पाणी मिळेल असे सांगितले जाते. जव्हार तहसीलदार येथील अधिकारी पाहणी करण्यासाठी महिना लावत असतील ग्रामस्थांनी करायचे काय? असा सवाल ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)