शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

मार्चमध्येच ग्रामीण भागात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 00:58 IST

गावकऱ्यांच्या घशाला कोरड : पाण्यासाठी करावी लागते वणवण

सुनील घरत

पारोळ : मार्च महिन्याच्या प्रारंभीच वसई-विरारचा पारा ३७ अंशांवर पोहोचला असून वसईच्या पूर्वेकडील ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अनेक खेड्यापाड्यांत पाणीटंचाईची समस्या दरवर्षी निर्माण होते. आता  ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिला व घरातील सदस्यांची पायपीट सुरू झाली आहे. तर विहिरींची पाणी पातळी खाली गेल्याने महिलांना पाणी काढण्यासाठी जीवाशी खेळ करावा लागत आहे. 

उन्हाळा सुरू झाला की, वसई पूर्वेकडील गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. वसई तालुक्यातील खेड्यापाड्यात मुख्यतः पूर्वेकडील भागात नागरिकांना विहिरी, तलाव आणि बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मार्चच्या सुरुवातीलाच या भागातील विहिरी आटू लागल्याने भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वसई पूर्वेकडील काही भागात व गावखेड्यांत पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी येथील महिलांना वणवण करावी लागत आहे. खड्डे मारून झिरपणाऱ्या पाण्यावर येथील नागरिकांना अवलंबून राहावे लागते. गावांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येथील गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार होता. परंतु अजूनही त्याचे काम रखडले आहे. जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. 

येथील नागरिकांना बोअरवेल, विहिरी, तलाव येथील पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. पाण्याचे स्रोत योग्य पद्धतीने जतन होत नसल्याने तेदेखील आता बंद पडू लागले आहेत. त्यामुळे अनेक विहिरी, तलाव यांची पातळी खालावली असून काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या आहेत.   यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वसई-विरार महापालिका पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते तरीही समस्या सुटत नाही. कर भरूनही करदाते तहानलेलेच आहेत. मग कर का भरायचा, असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर घोटभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार