शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

मार्चमध्येच ग्रामीण भागात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 00:58 IST

गावकऱ्यांच्या घशाला कोरड : पाण्यासाठी करावी लागते वणवण

सुनील घरत

पारोळ : मार्च महिन्याच्या प्रारंभीच वसई-विरारचा पारा ३७ अंशांवर पोहोचला असून वसईच्या पूर्वेकडील ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अनेक खेड्यापाड्यांत पाणीटंचाईची समस्या दरवर्षी निर्माण होते. आता  ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिला व घरातील सदस्यांची पायपीट सुरू झाली आहे. तर विहिरींची पाणी पातळी खाली गेल्याने महिलांना पाणी काढण्यासाठी जीवाशी खेळ करावा लागत आहे. 

उन्हाळा सुरू झाला की, वसई पूर्वेकडील गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. वसई तालुक्यातील खेड्यापाड्यात मुख्यतः पूर्वेकडील भागात नागरिकांना विहिरी, तलाव आणि बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मार्चच्या सुरुवातीलाच या भागातील विहिरी आटू लागल्याने भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वसई पूर्वेकडील काही भागात व गावखेड्यांत पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी येथील महिलांना वणवण करावी लागत आहे. खड्डे मारून झिरपणाऱ्या पाण्यावर येथील नागरिकांना अवलंबून राहावे लागते. गावांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येथील गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार होता. परंतु अजूनही त्याचे काम रखडले आहे. जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. 

येथील नागरिकांना बोअरवेल, विहिरी, तलाव येथील पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. पाण्याचे स्रोत योग्य पद्धतीने जतन होत नसल्याने तेदेखील आता बंद पडू लागले आहेत. त्यामुळे अनेक विहिरी, तलाव यांची पातळी खालावली असून काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या आहेत.   यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वसई-विरार महापालिका पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते तरीही समस्या सुटत नाही. कर भरूनही करदाते तहानलेलेच आहेत. मग कर का भरायचा, असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर घोटभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार