शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड तालुक्यात पाण्याचा खडखडाट !

By admin | Updated: May 11, 2017 01:40 IST

तालुक्यातील गाव पाड्यात पानी टंचाई ची तीव्रता वाढीस लागली असून मे महिन्याच्या प्रखर उन्हात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : तालुक्यातील गाव पाड्यात पानी टंचाई ची तीव्रता वाढीस लागली असून मे महिन्याच्या प्रखर उन्हात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे मात्र याकडे संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे अनेक कूपनलिका बिहिरी कोरड्या पडल्या आहेत तर काही भागात विहिरींनी तळ गाठला आहे अनेक कूपनलिका दुरु स्त करण्यात आलेल्या नाहीत. दुसरीकडे विहिरी बांधण्याच्या कामामध्ये आवश्यक ती गती नसल्यामुळे ग्रामस्थां मध्ये संतापाचे वातावरण आहे. तालुक्यातील अनेक कूपनलिका नादुरुस्त असल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना घेता येत नाहीतालुक्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची स्ुरुवात होते व मे ङ्क्त जूनच्या दरम्यान ती पराकोटीला पोहचते दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. तालुक्यातील तलवाडा - शनवार पाडा, खोरीपाडा, कवडास( खोरीपाडा) केव- पवारपाडा, वसुरी- सहारेपाडा, घानेघर- काचरपाडा व् फरलेपाडा, बास्ते-दिवेपाडा, बास्ते-गावठाण, टेटवाली-कातकरीपाडा,खुडेद-कुडाचापाडा, खुडेद-बिरारीपाडा, केव- भगतपाडा, सांबरेपाडा, आंबिवली- ठाकरेपाडा,विजयनगर, भानपुर- वांगनपाडा, भानपूर-उंबरपाडा या गाव पाड्यात आठ टैंकर ने पाणी पुरवठा चालू आहे. तर खुडेद-घोडीचापाडा, सवादे- कोबाडपाडा, नडगेपाडा, मेघवालेपाडा, साखरे- डोंगरिपाडा, पागीपाडा, आपटी बु. - पहाडपाडा, दांडेकरपाडा, सारशी- तांबडमाळ, खडकी-रिंजडपाडा, केव-रावतेपाडा, शिळशेत- गावठाण, तरेपाडा, केव-सासेआळी, शेलारआळी, सुकसाळे- सुरु मपाडा, या गावपाड्यात टँकर सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एप्रिल महिन्यात प्रस्ताव पाठवून ही ते पडून आहेत. पाणीटंचाई निर्माण होण्यास बोअरवेल नादुरुस्त होणे नव्या विहिरी बांधणे ,त्यासाठी लाभार्थाना योग्यवेळेत निधी उपलब्ध करून न देणे अशी कारणे आहेत. ही पाणीटंचाई दरवर्षी निर्माण होते. हे प्रशासनाला माहित असतांनाही तिच्या निवरणाचा कोणताही व्यापक आराखडा जिल्हा प्रशासन तयार करीत नाही. साध्या टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना दिले जात नाहीत. त्यामुळे पिण्यासाठी पाण्याचे दोन थेंबही गावपाड्यातील नागरिकांना मिळत नाहीत. नवे जिल्हाधिकारी याबाबत तातडीने लक्ष घालतील काय? असा जनतेचा सवाल आहे.