शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

किनाऱ्यावरील डांबरगोळ्यांमुळे जलप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 23:12 IST

मत्स्य उत्पादनावर परिणाम : किनाऱ्यांचीही मोठी धूप, तिवरांची जंगले नष्ट होण्याची भीती

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : प्रदूषणाच्या विळख्याने जिल्हा होरपळू लागला असताना वायू प्रदूषणाने स्थानिकांचे आयुष्यमान घटू लागले आहे. त्यातच आता समुद्रातून मोठ्या प्रमाणात किनाºयावर आलेल्या तेल-तवंगामुळे (डांबरगोळे) जल प्रदूषण वाढत असून मत्स्य संपदेसह किनाºयावरील तिवरांची (कांदळवन) जंगले नष्ट करायला सुरुवात केली आहे.

प्रदूषणात जिल्ह्याने एक नंबर गाठल्यानंतर इथले नदी, नाले, खाडी, खाजणे, शेती-बागायती तारापूर एमआयडीसीमधून सोडल्या जाणाºया प्रदूषित पाण्याने नापीक बनल्या आहेत. त्यातच हरित लवादाने दिलेल्या आदेशानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार किनारपट्टीवरील अनेक गावांत कॅन्सर, त्वचेचे आजार व श्वसनाच्या आजाराची मोठी संख्या असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे माणसाचे सरासरी आयुष्यमान घटत असताना उपाययोजनेबाबत शासन व प्रशासन संवेदनशील नसल्याचे दिसून आले आहे. तारापूर एमआयडीसी, पालघर बिडको, पिडको औद्योगिक वसाहतीमधूनही निघणाºया प्रदूषणाविरोधात इथले स्थानिक लढत असताना आता समुद्री मार्गाने येणाºया तेल-तवंगांची मात्रा वाढू लागली आहे. पावसाळ्यात काही कालावधीत किनाºयावर दिसणारे डांबरगोळे आता वर्षभर दिसून किनारे विद्रूप करू लागले आहेत. शिरगावच्या किनारपट्टीवर उत्तरेस विस्तारलेल्या तिवरांचे (कांदळवने) क्षेत्र प्लास्टिक कचरा व डांबर गोळ्याच्या आक्रमणाने धोक्यात सापडले आहे. समुद्राच्या पाण्याद्वारे वाहून आलेले क्रूड आॅइल तिवरांच्या पानांवर साचून राहिल्याने ती पाने करपून जात संपूर्ण झाडे सुकून गेली आहेत. त्याचबरोबर या करपून खाली गळलेल्या पानांचा कचरा आणि तेलाच्या डांबरगोळ्यांपासून बनलेले टार बॉल्स किनाºयावर मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. या भागातील सुमारे अडीच एकर क्षेत्रावरील तिवरांची झाडे नष्ट होत असल्याचे धक्कादायक वास्तव पर्यावरणप्रेमी प्राध्यापक भूषण भोईर यांनी समोर आणले आहे. ही तिवरांची जंगले हळूहळू नष्ट झाल्यास मत्स्यप्रजनन आणि माश्यांच्या अधिवासांची मोठी गंभीर समस्या निर्माण होत त्याचा परिणाम मत्स्य संपदेवर झाला आहे.

ज्या ठिकाणी ही कांदळवने मेलेली आहेत, बरोबर त्याच्यासमोरील बाजूस समुद्रकिनाºयाची धूप सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर कांदळवने नष्ट झाल्यास त्याचा विपरीत परिणाम ऊसबाव आणि वडराई येथील किनारपट्टीवर होऊ शकतो.- प्रा. भूषण विलास भोईर,प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर.