शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

किनाऱ्यावरील डांबरगोळ्यांमुळे जलप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 23:12 IST

मत्स्य उत्पादनावर परिणाम : किनाऱ्यांचीही मोठी धूप, तिवरांची जंगले नष्ट होण्याची भीती

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : प्रदूषणाच्या विळख्याने जिल्हा होरपळू लागला असताना वायू प्रदूषणाने स्थानिकांचे आयुष्यमान घटू लागले आहे. त्यातच आता समुद्रातून मोठ्या प्रमाणात किनाºयावर आलेल्या तेल-तवंगामुळे (डांबरगोळे) जल प्रदूषण वाढत असून मत्स्य संपदेसह किनाºयावरील तिवरांची (कांदळवन) जंगले नष्ट करायला सुरुवात केली आहे.

प्रदूषणात जिल्ह्याने एक नंबर गाठल्यानंतर इथले नदी, नाले, खाडी, खाजणे, शेती-बागायती तारापूर एमआयडीसीमधून सोडल्या जाणाºया प्रदूषित पाण्याने नापीक बनल्या आहेत. त्यातच हरित लवादाने दिलेल्या आदेशानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार किनारपट्टीवरील अनेक गावांत कॅन्सर, त्वचेचे आजार व श्वसनाच्या आजाराची मोठी संख्या असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे माणसाचे सरासरी आयुष्यमान घटत असताना उपाययोजनेबाबत शासन व प्रशासन संवेदनशील नसल्याचे दिसून आले आहे. तारापूर एमआयडीसी, पालघर बिडको, पिडको औद्योगिक वसाहतीमधूनही निघणाºया प्रदूषणाविरोधात इथले स्थानिक लढत असताना आता समुद्री मार्गाने येणाºया तेल-तवंगांची मात्रा वाढू लागली आहे. पावसाळ्यात काही कालावधीत किनाºयावर दिसणारे डांबरगोळे आता वर्षभर दिसून किनारे विद्रूप करू लागले आहेत. शिरगावच्या किनारपट्टीवर उत्तरेस विस्तारलेल्या तिवरांचे (कांदळवने) क्षेत्र प्लास्टिक कचरा व डांबर गोळ्याच्या आक्रमणाने धोक्यात सापडले आहे. समुद्राच्या पाण्याद्वारे वाहून आलेले क्रूड आॅइल तिवरांच्या पानांवर साचून राहिल्याने ती पाने करपून जात संपूर्ण झाडे सुकून गेली आहेत. त्याचबरोबर या करपून खाली गळलेल्या पानांचा कचरा आणि तेलाच्या डांबरगोळ्यांपासून बनलेले टार बॉल्स किनाºयावर मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. या भागातील सुमारे अडीच एकर क्षेत्रावरील तिवरांची झाडे नष्ट होत असल्याचे धक्कादायक वास्तव पर्यावरणप्रेमी प्राध्यापक भूषण भोईर यांनी समोर आणले आहे. ही तिवरांची जंगले हळूहळू नष्ट झाल्यास मत्स्यप्रजनन आणि माश्यांच्या अधिवासांची मोठी गंभीर समस्या निर्माण होत त्याचा परिणाम मत्स्य संपदेवर झाला आहे.

ज्या ठिकाणी ही कांदळवने मेलेली आहेत, बरोबर त्याच्यासमोरील बाजूस समुद्रकिनाºयाची धूप सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर कांदळवने नष्ट झाल्यास त्याचा विपरीत परिणाम ऊसबाव आणि वडराई येथील किनारपट्टीवर होऊ शकतो.- प्रा. भूषण विलास भोईर,प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर.