शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी ओसरले पण नुकसान मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 02:49 IST

वसई तालुक्यात सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या गाड्याही अनेक ठिकाणी पोहचणे अशक्य बनले आहे.

विरार : वसई तालुक्यात सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या गाड्याही अनेक ठिकाणी पोहचणे अशक्य बनले आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी कचºयाचे ठिग वाढले आहेत. पाण्यासोबत लोकांच्या घरात, सोसायटीत कचरा गेल्याने घाणीच्या समस्येला नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. सतत पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यावर कचरा साचून राहिल्याने अस्वच्छता व दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे.ज्या ठिकाणी पालिकेच्या गाड्या जाणे शक्य आहे. तेथील कचरा पालिकेच्या सफाई कर्मचाºयांनी उचला आहे. मात्र, अनेक ठिकाणी कुजलेला भाजीपाला व अन्य कचरा साचलेल्या पाण्यात कडून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीचे आजार देखील मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असल्याने महापालिकेने तातडीने त्यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.जवळपास ३० लाख लोकसंख्या असल्येल्या शहरात गेल्या ३ दिवसापासून लागातार पाऊस झाल्याने सर्वच यंत्रणांची परीक्षा झाली. दुकानात ग्राहक नसल्याने दुकानदारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचसोबत दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भिजलेले सामान फुकून देण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. तसेच अनेक ठिकाणी सोसायटीच्या टाक्यांमध्ये दुषीत पाणी गेल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.वसई तालुक्यात अनेक ठिकाणी जवळपास ३६ तास लाईट नव्हती. त्यामुळे लोकांना अजूनच त्रासाला सामोरी जावे लागले होते.पोलीस आणि पालिका कर्मचाºयांची मोठी कसरतवीज नसल्याने मोबाईल सेवा देखील ठप्प झाल्या होत्या. सर्वत्र पाणी भरल्याने लाईट बंद ठेवली गेली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी मीटरमध्ये पाणी गेल्याने पाऊस गेल्यानंतर देखील मीटर खराब झाल्याने लाईट आली नव्हती.महापालिकेच्या कर्मचाºयांनी अगदी २४ तास न झोपता काम केले. त्याचबरोबर पोलीस देखील मुसळधार पावसात २४ तास काम करत होते. अनेक ठिकाणी पावसात बंद पडलेल्या गाड्या हलवण्याचे काम देखील पोलीस करत होते. नागरिकांचे सेवेसाठी त्यांनी मोठी कसरत केली

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या