शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाणी ओसरले पण नुकसान मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 02:49 IST

वसई तालुक्यात सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या गाड्याही अनेक ठिकाणी पोहचणे अशक्य बनले आहे.

विरार : वसई तालुक्यात सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या गाड्याही अनेक ठिकाणी पोहचणे अशक्य बनले आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी कचºयाचे ठिग वाढले आहेत. पाण्यासोबत लोकांच्या घरात, सोसायटीत कचरा गेल्याने घाणीच्या समस्येला नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. सतत पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यावर कचरा साचून राहिल्याने अस्वच्छता व दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे.ज्या ठिकाणी पालिकेच्या गाड्या जाणे शक्य आहे. तेथील कचरा पालिकेच्या सफाई कर्मचाºयांनी उचला आहे. मात्र, अनेक ठिकाणी कुजलेला भाजीपाला व अन्य कचरा साचलेल्या पाण्यात कडून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीचे आजार देखील मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असल्याने महापालिकेने तातडीने त्यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.जवळपास ३० लाख लोकसंख्या असल्येल्या शहरात गेल्या ३ दिवसापासून लागातार पाऊस झाल्याने सर्वच यंत्रणांची परीक्षा झाली. दुकानात ग्राहक नसल्याने दुकानदारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचसोबत दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भिजलेले सामान फुकून देण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. तसेच अनेक ठिकाणी सोसायटीच्या टाक्यांमध्ये दुषीत पाणी गेल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.वसई तालुक्यात अनेक ठिकाणी जवळपास ३६ तास लाईट नव्हती. त्यामुळे लोकांना अजूनच त्रासाला सामोरी जावे लागले होते.पोलीस आणि पालिका कर्मचाºयांची मोठी कसरतवीज नसल्याने मोबाईल सेवा देखील ठप्प झाल्या होत्या. सर्वत्र पाणी भरल्याने लाईट बंद ठेवली गेली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी मीटरमध्ये पाणी गेल्याने पाऊस गेल्यानंतर देखील मीटर खराब झाल्याने लाईट आली नव्हती.महापालिकेच्या कर्मचाºयांनी अगदी २४ तास न झोपता काम केले. त्याचबरोबर पोलीस देखील मुसळधार पावसात २४ तास काम करत होते. अनेक ठिकाणी पावसात बंद पडलेल्या गाड्या हलवण्याचे काम देखील पोलीस करत होते. नागरिकांचे सेवेसाठी त्यांनी मोठी कसरत केली

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या