शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

जलयुक्त शिवारवरील कोट्यवधीचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:34 IST

कुपोषणाच्या दाहकतेने काळवंडलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला होता.

पालघर : कुपोषणाच्या दाहकतेने काळवंडलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला होता. हे सावट दूर होते न होते तोच नेहमी प्रमाणे ग्रामीण भागातील तीन तालुके सध्या भीषण पाणीटंचाईच्या दाहकतेने होरपळून निघाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या शासनाच्या ओंजळीमध्ये मात्र एक थेंब ही पाणी मिळालेले नसल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यात शेवटच्या आॅगस्ट महिन्यात सरासरी (६२.७ टक्के) पेक्षा कमी (४६.९ टक्के) तर सप्टेंबर मध्ये ५७.१ टक्क्या पेक्षा अवघा ९.६ टक्के इतकाच पाऊस पडल्याने ५० पैशापेक्षा आणेवारी कमी भरलेल्या पालघर, विक्र मगड व तलासरी या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तेथील शेतकरी, विद्यार्थ्यांना अनेक सवलतींचा लाभ शासन पातळीवरून देण्यात आला होता.त्यात पीक कर्ज माफी, शेतकरी वीज पंप बिल वसुलीला स्थगिती, शेतसारा माफी, विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास आदींचा समावेश होता.सध्या राज्यात दुष्काळाची दाहक परिस्थिती असल्याने त्यावर उपाय करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आपापल्या भागातील मंत्री, पालकमंत्री यांचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. पालघर जिल्ह्यात अशा दौºयाचे कुठेही नियोजन असल्याचे दिसत नसून पालकमंत्री विष्णू सवरा तब्येत बरी नसल्याच्या कारणाने बाहेरच पडलेले नाहीत. जिल्ह्यात इतर राज्याप्रमाणे दुष्काळाच्या झळा दाहक नसल्या तरी पाण्याच्या गंभीर टंचाई ने चार तालुक्यात गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे.मोखाडा तालुक्यातील २७ गावे व ६२ पाड्यात २४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून जव्हार तालुक्यातील आठ गावे व १५ पाडे, वाडा तालुक्यातील ३ गावे २४ पाडे, विक्र मगड तालुक्यातील १ गाव व ४ पाडे असे एकूण ३९ गावे आणि १०५ पाडे या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. या चार तालुक्यातील ५४ हजार १३३ लोकांना पिण्याच्या एका थेंबासाठी कोरड्या पडलेल्या आजूबाजूच्या नदी-नाल्यांची पात्रात खड्डे खोदण्याची वेळ आली आहे.शासनाने तीनवर्षांचा हिशेब द्यावा!सामाजिक वनीकरण विभागाने मोखाडा तालुक्यामध्ये २०१६-१७ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी ३.१७ लाख खर्च केला आहे. जलयुक्त शिवार अभियातून २०१५-१६ मध्ये मोखाड्यात ६०६ कामे करण्यात आली असून १८ कोटी ६८ लाख २९ हजार एवढा खर्च झाला आहे. २०१६-१७ मध्ये ९१ कामे करण्यात आली असून ४ कोटी १२ लाख ८१ हजाराचा खर्च झाला आहे. तर २०१७-१८ मध्ये ९ कामांवर ५८ लाख ४ हजार खर्च झाला असून गेल्या तीन वर्षात ७०७ कामांवर २३ कोटी ३९ लाख १४ हजार रु पये खर्च झाला आहे. तरीही आदिवासींची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट कायम आहे.

टॅग्स :palgharपालघर