शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

जलयुक्त शिवारवरील कोट्यवधीचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:34 IST

कुपोषणाच्या दाहकतेने काळवंडलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला होता.

पालघर : कुपोषणाच्या दाहकतेने काळवंडलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला होता. हे सावट दूर होते न होते तोच नेहमी प्रमाणे ग्रामीण भागातील तीन तालुके सध्या भीषण पाणीटंचाईच्या दाहकतेने होरपळून निघाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या शासनाच्या ओंजळीमध्ये मात्र एक थेंब ही पाणी मिळालेले नसल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यात शेवटच्या आॅगस्ट महिन्यात सरासरी (६२.७ टक्के) पेक्षा कमी (४६.९ टक्के) तर सप्टेंबर मध्ये ५७.१ टक्क्या पेक्षा अवघा ९.६ टक्के इतकाच पाऊस पडल्याने ५० पैशापेक्षा आणेवारी कमी भरलेल्या पालघर, विक्र मगड व तलासरी या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तेथील शेतकरी, विद्यार्थ्यांना अनेक सवलतींचा लाभ शासन पातळीवरून देण्यात आला होता.त्यात पीक कर्ज माफी, शेतकरी वीज पंप बिल वसुलीला स्थगिती, शेतसारा माफी, विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास आदींचा समावेश होता.सध्या राज्यात दुष्काळाची दाहक परिस्थिती असल्याने त्यावर उपाय करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आपापल्या भागातील मंत्री, पालकमंत्री यांचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. पालघर जिल्ह्यात अशा दौºयाचे कुठेही नियोजन असल्याचे दिसत नसून पालकमंत्री विष्णू सवरा तब्येत बरी नसल्याच्या कारणाने बाहेरच पडलेले नाहीत. जिल्ह्यात इतर राज्याप्रमाणे दुष्काळाच्या झळा दाहक नसल्या तरी पाण्याच्या गंभीर टंचाई ने चार तालुक्यात गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे.मोखाडा तालुक्यातील २७ गावे व ६२ पाड्यात २४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून जव्हार तालुक्यातील आठ गावे व १५ पाडे, वाडा तालुक्यातील ३ गावे २४ पाडे, विक्र मगड तालुक्यातील १ गाव व ४ पाडे असे एकूण ३९ गावे आणि १०५ पाडे या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. या चार तालुक्यातील ५४ हजार १३३ लोकांना पिण्याच्या एका थेंबासाठी कोरड्या पडलेल्या आजूबाजूच्या नदी-नाल्यांची पात्रात खड्डे खोदण्याची वेळ आली आहे.शासनाने तीनवर्षांचा हिशेब द्यावा!सामाजिक वनीकरण विभागाने मोखाडा तालुक्यामध्ये २०१६-१७ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी ३.१७ लाख खर्च केला आहे. जलयुक्त शिवार अभियातून २०१५-१६ मध्ये मोखाड्यात ६०६ कामे करण्यात आली असून १८ कोटी ६८ लाख २९ हजार एवढा खर्च झाला आहे. २०१६-१७ मध्ये ९१ कामे करण्यात आली असून ४ कोटी १२ लाख ८१ हजाराचा खर्च झाला आहे. तर २०१७-१८ मध्ये ९ कामांवर ५८ लाख ४ हजार खर्च झाला असून गेल्या तीन वर्षात ७०७ कामांवर २३ कोटी ३९ लाख १४ हजार रु पये खर्च झाला आहे. तरीही आदिवासींची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट कायम आहे.

टॅग्स :palgharपालघर