शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

जलयुक्त शिवारवरील कोट्यवधीचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:34 IST

कुपोषणाच्या दाहकतेने काळवंडलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला होता.

पालघर : कुपोषणाच्या दाहकतेने काळवंडलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला होता. हे सावट दूर होते न होते तोच नेहमी प्रमाणे ग्रामीण भागातील तीन तालुके सध्या भीषण पाणीटंचाईच्या दाहकतेने होरपळून निघाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या शासनाच्या ओंजळीमध्ये मात्र एक थेंब ही पाणी मिळालेले नसल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यात शेवटच्या आॅगस्ट महिन्यात सरासरी (६२.७ टक्के) पेक्षा कमी (४६.९ टक्के) तर सप्टेंबर मध्ये ५७.१ टक्क्या पेक्षा अवघा ९.६ टक्के इतकाच पाऊस पडल्याने ५० पैशापेक्षा आणेवारी कमी भरलेल्या पालघर, विक्र मगड व तलासरी या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तेथील शेतकरी, विद्यार्थ्यांना अनेक सवलतींचा लाभ शासन पातळीवरून देण्यात आला होता.त्यात पीक कर्ज माफी, शेतकरी वीज पंप बिल वसुलीला स्थगिती, शेतसारा माफी, विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास आदींचा समावेश होता.सध्या राज्यात दुष्काळाची दाहक परिस्थिती असल्याने त्यावर उपाय करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आपापल्या भागातील मंत्री, पालकमंत्री यांचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. पालघर जिल्ह्यात अशा दौºयाचे कुठेही नियोजन असल्याचे दिसत नसून पालकमंत्री विष्णू सवरा तब्येत बरी नसल्याच्या कारणाने बाहेरच पडलेले नाहीत. जिल्ह्यात इतर राज्याप्रमाणे दुष्काळाच्या झळा दाहक नसल्या तरी पाण्याच्या गंभीर टंचाई ने चार तालुक्यात गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे.मोखाडा तालुक्यातील २७ गावे व ६२ पाड्यात २४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून जव्हार तालुक्यातील आठ गावे व १५ पाडे, वाडा तालुक्यातील ३ गावे २४ पाडे, विक्र मगड तालुक्यातील १ गाव व ४ पाडे असे एकूण ३९ गावे आणि १०५ पाडे या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. या चार तालुक्यातील ५४ हजार १३३ लोकांना पिण्याच्या एका थेंबासाठी कोरड्या पडलेल्या आजूबाजूच्या नदी-नाल्यांची पात्रात खड्डे खोदण्याची वेळ आली आहे.शासनाने तीनवर्षांचा हिशेब द्यावा!सामाजिक वनीकरण विभागाने मोखाडा तालुक्यामध्ये २०१६-१७ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी ३.१७ लाख खर्च केला आहे. जलयुक्त शिवार अभियातून २०१५-१६ मध्ये मोखाड्यात ६०६ कामे करण्यात आली असून १८ कोटी ६८ लाख २९ हजार एवढा खर्च झाला आहे. २०१६-१७ मध्ये ९१ कामे करण्यात आली असून ४ कोटी १२ लाख ८१ हजाराचा खर्च झाला आहे. तर २०१७-१८ मध्ये ९ कामांवर ५८ लाख ४ हजार खर्च झाला असून गेल्या तीन वर्षात ७०७ कामांवर २३ कोटी ३९ लाख १४ हजार रु पये खर्च झाला आहे. तरीही आदिवासींची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट कायम आहे.

टॅग्स :palgharपालघर