शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

कोका-कोलाच्या सांडपाण्याने पाणी दूषित

By admin | Updated: January 10, 2017 04:47 IST

कोका-कोला कंपनीने आपले सांडपाणी व मुदत संपलेले थंडपेय गावच्या नाल्यात सोडल्याने त्यातील पाणी लालसर पडले असून बोअरवेलचे पाणीदेखील

वाडा : कोका-कोला कंपनीने आपले सांडपाणी व मुदत संपलेले थंडपेय गावच्या नाल्यात सोडल्याने त्यातील पाणी लालसर पडले असून बोअरवेलचे पाणीदेखील प्रदूषित झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आजारात वाढ झाली असून आरोग्य धोक्यात आले आहे. हेच पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत गेल्याने कडधान्याचे पीकदेखील धोक्यात आले आहे. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.या कंपनीला दररोज लाखो लीटर्स पाणी लागते. हे पाणी कंपनीत असलेल्या शेकडो बोअरवेल व वैतरणा नदीवर सिंचनासाठी बांधलेल्या १९८ मीटर लांबीच्या बंधाऱ्यातून कंपनी नामपात्र पाणीपट्टी देऊन उचलते. तालुक्यात मार्च महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवते. या कंपनीने तयार केलेले मुदतबाह्य पेय मार्केटमधून परत आले. ते दूषित झाल्याने कंपनीने गटारातून नाल्यात व शेतात सोडले आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी लालसर होऊन दूषित झाले आहे. (प्रतिनिधी)