शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

स्मार्ट सिटीतून वसईला का डावलले?

By admin | Updated: August 5, 2015 00:58 IST

सॅटेलाईट सिटी असलेल्या वसई विरारमध्ये गेल्या ५ वर्षात महानगरपालिकेने भरीव विकासकामे केली असताना का वगळण्यात आले असा सवाल नागरीक करीत आहेत

वसई : सॅटेलाईट सिटी असलेल्या वसई विरारमध्ये गेल्या ५ वर्षात महानगरपालिकेने भरीव विकासकामे केली असताना का वगळण्यात आले असा सवाल नागरीक करीत आहेत. अवघ्या ५ वर्षात २४०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या या महानगरपालिकेला या योजनेतून वगळण्यासंदर्भात कोणते निकष लावले याची सध्या माहिती घेण्यात येत आहे.सन २००९ साली महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर केवळ वर्षभरातच या परिसराला सॅटेलाईट सिटीचा दर्जा केंद्र सरकारने दिला तसेच, विकासकामासाठी सुमारे ८०० ते ९०० कोटीचा आर्थिक निधी मंजूर केला. त्यापैकी २ ते ३ हप्ते महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आले. मिळालेल्या आर्थिक निधीतून महानगरपालिकेने भूमीगत गटारे व अन्य विकासकामे मार्गी लावली. गेल्या ५ वर्षात महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून प्रचंड विकासकामे करण्यात आली. त्यामध्ये रस्ता रूंदीकरण, समाजमंदिरे बांधणे, अद्ययावत मच्छीमार्केट बांधणे अशी नानाविध विकासकामे करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने स्मार्ट सिटी निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. परंतु, सरकारने राज्यभरातून आलेल्या अनेक महानगरपालिकांचा या योजनेत समावेश केला. मात्र, वसई विरार महानगरपालिकेचा समावेश केला नाही. इतर महानगरपालिकेच्या तुलनेत सर्वाधिक विकासकामे या महानगरपालिकेच्या हद्दीत झाली असताना डावलण्यात आल्यामुळे करदात्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत योग्य त्या स्तरावर लवकरच दाद मागितली जाणार आहे. (प्रतिनिधी)