शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

आदिवासींसाठी लढणारा योद्धा हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:18 IST

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांच्या विरोधात भाजपा सरकार विरोधातच अनेकदा दंड थोपटणारे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा योद्धा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पालघर : वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांच्या विरोधात भाजपा सरकार विरोधातच अनेकदा दंड थोपटणारे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा योद्धा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. वनगा यांनी भूमीपुत्रांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.तलासरी तालुक्यातील कवाडा या अत्यंत दुर्गम आदिवासीबहुल पाड्यावर १ जून १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला. माजी खासदार व नायब राज्यपाल रामभाऊ कापसे, माधवराव काणे व प्रभाकर रेगे यांच्या तालमीत ते वाढले. त्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. मुंबई विद्यापीठातून बीए व त्यानंतर त्यांनी एलएलबी पूर्ण केले. १९७९ पासून त्यांनी वकिली सुरू केली. अ‍ॅड. श्रीनिवास मोडक यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. वकिली हा पेशा न ठेवता त्यांनी समाज बांधवांचे अनेक खटले मोफत लढविले. त्यांनी जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा, तलासरी, सिल्व्हासा येथील आदिवासींचे प्रश्न सोडविले. पुढे जव्हारला स्वत:चे कार्यालय स्थापून १९८० पासून स्वतंत्रपणे वकिलीला सुरूवात केली. त्यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालय ते मुंबई उच्च न्यायालय अशी १९८० ते ९६ पर्यंत वकिली केली.खा. चिंतामण वनगा १९८२ ते ८४ भाजपचे जिल्हा चिटणीस तर १९८४ ते ८६ या काळात ते भाजपा युवा मोर्चाचे चे प्रदेश सचिव होते. १९८७ ते १९९० ते जव्हार तालुकाध्यक्ष होते. १९९५ पर्यंत ते भाजपाच्या आदिवासी आघाडीचे ते प्रदेशाध्यक्ष राहिले. पक्षाने त्यांना १९९७ साली भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त केले.दिल्लीत मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शनडॉ. राममनोहर लोहिया रूग्णालयात वनगा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. केंद्रीय परिवहन व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराजे अत्राम आदींनी श्रद्धांजली वाहिली.वनगा हे नि:स्पृह, निस्वार्थी आणि समर्पित कार्यकर्ते होते. आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले होते.- नितीन गडकरी,केंद्रीय परिवहन मंत्रीत्यांच्या निधनाने आदिवासी समाजाचे मोठे नुकसान झाले. आम्ही एकत्र काम करायचो. वनवासी कल्याण आश्रमाच्या शाळा त्यांनी सुरु केल्या.- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री१९९६ पासून माझा त्यांचा परिचय आहे. साधे आणि मनमिळावू नेते होते. मतदारसंघात केलेल्या कामाची पावती म्हणूनच ते तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकले.- हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्य मंत्रींभाजपाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे.- खा.रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Chintaman Wangaचिंतामण वनगा