शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आदिवासींसाठी लढणारा योद्धा हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:18 IST

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांच्या विरोधात भाजपा सरकार विरोधातच अनेकदा दंड थोपटणारे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा योद्धा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पालघर : वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांच्या विरोधात भाजपा सरकार विरोधातच अनेकदा दंड थोपटणारे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा योद्धा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. वनगा यांनी भूमीपुत्रांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.तलासरी तालुक्यातील कवाडा या अत्यंत दुर्गम आदिवासीबहुल पाड्यावर १ जून १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला. माजी खासदार व नायब राज्यपाल रामभाऊ कापसे, माधवराव काणे व प्रभाकर रेगे यांच्या तालमीत ते वाढले. त्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. मुंबई विद्यापीठातून बीए व त्यानंतर त्यांनी एलएलबी पूर्ण केले. १९७९ पासून त्यांनी वकिली सुरू केली. अ‍ॅड. श्रीनिवास मोडक यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. वकिली हा पेशा न ठेवता त्यांनी समाज बांधवांचे अनेक खटले मोफत लढविले. त्यांनी जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा, तलासरी, सिल्व्हासा येथील आदिवासींचे प्रश्न सोडविले. पुढे जव्हारला स्वत:चे कार्यालय स्थापून १९८० पासून स्वतंत्रपणे वकिलीला सुरूवात केली. त्यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालय ते मुंबई उच्च न्यायालय अशी १९८० ते ९६ पर्यंत वकिली केली.खा. चिंतामण वनगा १९८२ ते ८४ भाजपचे जिल्हा चिटणीस तर १९८४ ते ८६ या काळात ते भाजपा युवा मोर्चाचे चे प्रदेश सचिव होते. १९८७ ते १९९० ते जव्हार तालुकाध्यक्ष होते. १९९५ पर्यंत ते भाजपाच्या आदिवासी आघाडीचे ते प्रदेशाध्यक्ष राहिले. पक्षाने त्यांना १९९७ साली भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त केले.दिल्लीत मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शनडॉ. राममनोहर लोहिया रूग्णालयात वनगा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. केंद्रीय परिवहन व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराजे अत्राम आदींनी श्रद्धांजली वाहिली.वनगा हे नि:स्पृह, निस्वार्थी आणि समर्पित कार्यकर्ते होते. आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले होते.- नितीन गडकरी,केंद्रीय परिवहन मंत्रीत्यांच्या निधनाने आदिवासी समाजाचे मोठे नुकसान झाले. आम्ही एकत्र काम करायचो. वनवासी कल्याण आश्रमाच्या शाळा त्यांनी सुरु केल्या.- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री१९९६ पासून माझा त्यांचा परिचय आहे. साधे आणि मनमिळावू नेते होते. मतदारसंघात केलेल्या कामाची पावती म्हणूनच ते तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकले.- हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्य मंत्रींभाजपाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे.- खा.रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Chintaman Wangaचिंतामण वनगा