शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

घोटभर पाण्यासाठी जागोजागी विरा, बुडकी

By admin | Updated: April 11, 2017 02:11 IST

डहाणू तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी सरकारकडून कोणतीही योजना या भागामध्ये

- शौकत शेख,  डहाणूडहाणू तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी सरकारकडून कोणतीही योजना या भागामध्ये कार्यान्वित नसल्याने त्यांना विरा किंवा बुडकीवरच अवलंबून रहावे लागत आहे.तालुक्यातून जाणारा मुंबई -अहमदाबाद हायवेच्या पूर्व व पश्चिम भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सरकारी योजनाच नसल्याने डोंगरकपाऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना घोटभर पाण्यासाठी नाला, ओहोळ किंवा उन्हाळ्यात सुकलेल्या नदीपात्रात स्वत: लाच खड्डे खोदावे लागत आहे. तसेच या खड्ड्यात जमलेले अशुद्ध पाणी त्यांना प्यावे लागते. या प्रकारालाच स्थानिक आदिवासींच्या बोली भाषेमध्ये विरा, बुडकी असे म्हणतात. शिसने, दिवशी, दाभाडी, किनदहवली, चळणी, सुसुखंडआंबा, धरमपूर, हळदपाडा, गांगणगाव, शिसने, आंबोली, चिंचले, कांदरवाडी, दह्याळे अशी तालुक्यातील ३० टक्के पेक्षा जास्त गावे आजही सरकारी योजनेविना स्वत: च आपल्याला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची सोय अर्थात विरा किंवा बुडकी खोदून करत आहेत.सरकारी ठेकेदारांनी जंगल नष्ट केल्याने डोंगर उघडेबोडके झाल्याने दिवसेंदिवस भुगर्भातील पाण्याची पातळी खोल चालली असून डोंगरकपाऱ्यात, दऱ्याखोऱ्यात विहीर किंवा बोअरवेल खोदताना पाणी लागेलच याचा भरवसा नाही. सुर्या सारखी प्रत्येक वर्षी महापूर घेऊन येणारी नदी याच तालुक्यातून जाते. शिसने डोंगरीपाडा, पाटीलपाडा या हजारा ते अडीच हजारपर्यंत लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये आदिवासी ग्रामपंचायती असल्याने त्यांचे वार्षिक उत्पन्न नगण्य आहे. त्यातच पाण्यासाठी सरकारी योजना राबवायची असल्यास १० टक्के रक्कम योजनेआधी भरायची अशी अट आहे. मात्र, सर्व ग्रामस्थ मिळूनही ही दहा टक्के रक्कम उभी करु शकत नाहीत, हे वास्तव माहित असल्याने ते देखील त्याचा आग्रह धरायला तयार नसतात. मात्र, सरकार दरबारी पिण्याच्या पाण्याची सोय असल्याची नोंद हमखास सापडेल. गेली ३३ वर्षे विधानसभेसाठी आदिवासीसाठी राखीव जागा आहे. त्यामध्ये सलग ३० वर्षे जे आमदार निवडून आले तेही आदिवासी समाजातील. मात्र तरीही येथील वणवण सुरूच आहे. निवडून आलेल्यांवर अन्य समाजाचे कायमच वर्चस्व राहिले असल्याने प्रथम शहरी भागासाठी पाण्याच्या योजना तयार झाल्या,आदिवासी पट्ट्यातील रहिवासी मात्र कायमच पाण्याविना राहिले.मायबाप सरकारकडून पिण्याच्या पाण्याची सोय अध्याप झालेली नाही. त्यामुळे आम्हाला बुडकीतुनच पाणी प्यावे लगत आहे.- शांताराम धांगडा, ग्रामस्थ, शिसने