शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

घोटभर पाण्यासाठी जागोजागी विरा, बुडकी

By admin | Updated: April 11, 2017 02:11 IST

डहाणू तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी सरकारकडून कोणतीही योजना या भागामध्ये

- शौकत शेख,  डहाणूडहाणू तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी सरकारकडून कोणतीही योजना या भागामध्ये कार्यान्वित नसल्याने त्यांना विरा किंवा बुडकीवरच अवलंबून रहावे लागत आहे.तालुक्यातून जाणारा मुंबई -अहमदाबाद हायवेच्या पूर्व व पश्चिम भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सरकारी योजनाच नसल्याने डोंगरकपाऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना घोटभर पाण्यासाठी नाला, ओहोळ किंवा उन्हाळ्यात सुकलेल्या नदीपात्रात स्वत: लाच खड्डे खोदावे लागत आहे. तसेच या खड्ड्यात जमलेले अशुद्ध पाणी त्यांना प्यावे लागते. या प्रकारालाच स्थानिक आदिवासींच्या बोली भाषेमध्ये विरा, बुडकी असे म्हणतात. शिसने, दिवशी, दाभाडी, किनदहवली, चळणी, सुसुखंडआंबा, धरमपूर, हळदपाडा, गांगणगाव, शिसने, आंबोली, चिंचले, कांदरवाडी, दह्याळे अशी तालुक्यातील ३० टक्के पेक्षा जास्त गावे आजही सरकारी योजनेविना स्वत: च आपल्याला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची सोय अर्थात विरा किंवा बुडकी खोदून करत आहेत.सरकारी ठेकेदारांनी जंगल नष्ट केल्याने डोंगर उघडेबोडके झाल्याने दिवसेंदिवस भुगर्भातील पाण्याची पातळी खोल चालली असून डोंगरकपाऱ्यात, दऱ्याखोऱ्यात विहीर किंवा बोअरवेल खोदताना पाणी लागेलच याचा भरवसा नाही. सुर्या सारखी प्रत्येक वर्षी महापूर घेऊन येणारी नदी याच तालुक्यातून जाते. शिसने डोंगरीपाडा, पाटीलपाडा या हजारा ते अडीच हजारपर्यंत लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये आदिवासी ग्रामपंचायती असल्याने त्यांचे वार्षिक उत्पन्न नगण्य आहे. त्यातच पाण्यासाठी सरकारी योजना राबवायची असल्यास १० टक्के रक्कम योजनेआधी भरायची अशी अट आहे. मात्र, सर्व ग्रामस्थ मिळूनही ही दहा टक्के रक्कम उभी करु शकत नाहीत, हे वास्तव माहित असल्याने ते देखील त्याचा आग्रह धरायला तयार नसतात. मात्र, सरकार दरबारी पिण्याच्या पाण्याची सोय असल्याची नोंद हमखास सापडेल. गेली ३३ वर्षे विधानसभेसाठी आदिवासीसाठी राखीव जागा आहे. त्यामध्ये सलग ३० वर्षे जे आमदार निवडून आले तेही आदिवासी समाजातील. मात्र तरीही येथील वणवण सुरूच आहे. निवडून आलेल्यांवर अन्य समाजाचे कायमच वर्चस्व राहिले असल्याने प्रथम शहरी भागासाठी पाण्याच्या योजना तयार झाल्या,आदिवासी पट्ट्यातील रहिवासी मात्र कायमच पाण्याविना राहिले.मायबाप सरकारकडून पिण्याच्या पाण्याची सोय अध्याप झालेली नाही. त्यामुळे आम्हाला बुडकीतुनच पाणी प्यावे लगत आहे.- शांताराम धांगडा, ग्रामस्थ, शिसने