शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत चेंगराचेंगरीमुळे गेला ३१ जणांचा जीव, अभिनेत्याला पाहण्याचा नादात मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
5
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
6
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
7
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
8
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
9
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
10
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
11
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
12
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
13
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
14
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
15
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
16
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
17
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
18
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
19
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
20
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:28 IST

पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

- रविंद्र साळवेमोखाडा : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा दुष्काळामुळे मेटाकुटीला आला आहे अडिच महिने पावसाने ओढ दिल्याने जव्हार मोखाड्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली असतानादेखील आणेवारी जास्त दाखवल्याने दुष्काळाच्या यादीतून ‘जव्हार-मोखाडा’ हे कुपोषणाने पीडित असलेले तालुके डावलले. दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शेतकºयांना आता आत्महत्या कराव्या लागणार का, असा संतप्त सवाल आता जव्हार मोखाड्यातील शेतकºयांकडून उपस्थित होत आहे.पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सप्टेंबर महिन्यातील कडक उन्हामुळे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बहुतांश उभे पीक करपून गेले. भात, नागली आणि वरई या पिकांवर करपा, तांब्या आणि बगळ्या रोगांचा प्रार्दुभाव वाढला. वाढत्या तापमानात भातावरील विविध रोगांचा प्रसार होऊन भात पीक तयार होण्याची प्रक्रिया सुरू असताना पावसाने हुलकावणी दिल्याने आवश्यक पाणी शेतीला मिळाले नाही. त्यामुळे पिकाऐवजी गवताची पेंढी हाती आल्याने अनेक ठिकाणी शेतकºयांवर उभे भात पीक पेटवून देण्याची नामुष्की ओढवली.यंदा सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ९५ टक्के भाताची रोवणी करण्यात आली; परंतु पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भात शेती पावसाअभावी धोक्यात आली. त्यामुळे अनेक विघ्नांवर मात करीत केली जाणारी पारंपरिक शेती पुढे करायची का नाही, असा प्रश्न उभा ठाकला असताना दुष्काळाच्या यादीतून जव्हार मोखाडा हे तालुके वगळून सरकारने शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.शेतकºयांची थट्टापेरणी, पाऊस, भूजल पातळी, उत्पादन आदीच्या सॅटेलाईटद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी १७२ तालुक्यांवर दुष्काळाचे सावट असल्याची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार पालघर, विक्र मगड आणि तलासरी हे तीन दुष्काळाची झळ लागलेले तालुके घोषित करण्यात आले. प्रत्यक्षात संपूर्ण पालघर जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसावर अवलंबून असताना सॅटेलाईटद्वारे केलेला सर्व्हे जव्हार मोखाड्यातील शेतकºयांना बाधक ठरला असून पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर येथील आदिवासी शेतकरी डोळ्यात तेल घालून दुष्काळ यादीची वाट पाहत आहेत.जव्हार मोखाड्यातील पिकांची परिस्थिती गंभीर असून दुष्काळाबाबत सरकार संवेदनशील आहे. १५ डिसेंबरनंतर दुष्काळाची यादी प्रसिद्ध होणार असून, मंडळनिहाय दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे-विष्णू सवरा, पालकमंत्री पालघर जिल्हायावर्षी कोणतेच पीक हाताला लागले नाही. आमची शेती पाण्याअभावी पूर्ण करपून गेली. त्यामुळे सरकारने आमचा तालुका दुष्काळ यादीत समाविष्ट करून मदत जाहीर करावी.-शिवाजी गवळी, शेतकरीधामणशेत -कोशिमशेत ग्रामपंचायत

टॅग्स :Vasai Virarवसई विरार