शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:28 IST

पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

- रविंद्र साळवेमोखाडा : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा दुष्काळामुळे मेटाकुटीला आला आहे अडिच महिने पावसाने ओढ दिल्याने जव्हार मोखाड्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली असतानादेखील आणेवारी जास्त दाखवल्याने दुष्काळाच्या यादीतून ‘जव्हार-मोखाडा’ हे कुपोषणाने पीडित असलेले तालुके डावलले. दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शेतकºयांना आता आत्महत्या कराव्या लागणार का, असा संतप्त सवाल आता जव्हार मोखाड्यातील शेतकºयांकडून उपस्थित होत आहे.पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सप्टेंबर महिन्यातील कडक उन्हामुळे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बहुतांश उभे पीक करपून गेले. भात, नागली आणि वरई या पिकांवर करपा, तांब्या आणि बगळ्या रोगांचा प्रार्दुभाव वाढला. वाढत्या तापमानात भातावरील विविध रोगांचा प्रसार होऊन भात पीक तयार होण्याची प्रक्रिया सुरू असताना पावसाने हुलकावणी दिल्याने आवश्यक पाणी शेतीला मिळाले नाही. त्यामुळे पिकाऐवजी गवताची पेंढी हाती आल्याने अनेक ठिकाणी शेतकºयांवर उभे भात पीक पेटवून देण्याची नामुष्की ओढवली.यंदा सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ९५ टक्के भाताची रोवणी करण्यात आली; परंतु पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भात शेती पावसाअभावी धोक्यात आली. त्यामुळे अनेक विघ्नांवर मात करीत केली जाणारी पारंपरिक शेती पुढे करायची का नाही, असा प्रश्न उभा ठाकला असताना दुष्काळाच्या यादीतून जव्हार मोखाडा हे तालुके वगळून सरकारने शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.शेतकºयांची थट्टापेरणी, पाऊस, भूजल पातळी, उत्पादन आदीच्या सॅटेलाईटद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी १७२ तालुक्यांवर दुष्काळाचे सावट असल्याची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार पालघर, विक्र मगड आणि तलासरी हे तीन दुष्काळाची झळ लागलेले तालुके घोषित करण्यात आले. प्रत्यक्षात संपूर्ण पालघर जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसावर अवलंबून असताना सॅटेलाईटद्वारे केलेला सर्व्हे जव्हार मोखाड्यातील शेतकºयांना बाधक ठरला असून पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर येथील आदिवासी शेतकरी डोळ्यात तेल घालून दुष्काळ यादीची वाट पाहत आहेत.जव्हार मोखाड्यातील पिकांची परिस्थिती गंभीर असून दुष्काळाबाबत सरकार संवेदनशील आहे. १५ डिसेंबरनंतर दुष्काळाची यादी प्रसिद्ध होणार असून, मंडळनिहाय दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे-विष्णू सवरा, पालकमंत्री पालघर जिल्हायावर्षी कोणतेच पीक हाताला लागले नाही. आमची शेती पाण्याअभावी पूर्ण करपून गेली. त्यामुळे सरकारने आमचा तालुका दुष्काळ यादीत समाविष्ट करून मदत जाहीर करावी.-शिवाजी गवळी, शेतकरीधामणशेत -कोशिमशेत ग्रामपंचायत

टॅग्स :Vasai Virarवसई विरार