शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जव्हार तालुक्यातील गावे विकासाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 03:02 IST

जव्हार : गुजरात व दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशांच्या सीमालगत असणारी तालुक्यातील गावे आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत.

हुसेन मेमनजव्हार : गुजरात व दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशांच्या सीमालगत असणारी तालुक्यातील गावे आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना मूलभूत सुविधांसाठी आजही झगडावे लागत आहे. यामध्ये रुईघर, बोपदरी, दाभेरी, पाचबुड, सागपाणा, सरोळीपाडा, रिठीपाडा यांचा समावेश आहे. त्यांना आजही रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, अशा मूलभूत सुविधा मिळालेल्याच नाहीत.यापैकी सरोळीपाडा, रिठीपाडा, पाचबुड या पाड्यांत विद्युत कनेक्शन पोहचले नाही. विशेष म्हणजे येथील विद्युतजोडणीला शासनाकडून मंजुरी मिळून पाच वर्ष झाली आहेत.मात्र अजूनही ही जोडणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील आदिवासींना आजही अंधारात जीवन जगावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रॉकेलचा दिवा वापरुन अभ्यास करावा लागतो आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत.सागपणा, रिठीपाडा, पाचबुड, या पाड्यांतील नागरिकाच्या नशिबी फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाई पूजलेली आहे. दरवर्षी येथील आदिवासींना उन्हाळ््यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहेत.ही गावे जव्हार तालुक्यापासून ४५ कि.मी. अंतरावर आहेत. येथील सीमेलगत आदिवासींना आजही आरोग्याच्या सुविधेसाठी दादरा नगर हवेली किंवा गुजरातचा आसरा घ्यावा लागत आहे.आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात व येथील गाव-पाड्यातील आदिवासींचा विकास व्हावा म्हणून शासनाकडून दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च होतो. परंतु, त्यांचे दैन्य काही संपत नाही. त्यामुळे तो जातो तरी कुठे असा प्रश्न जनतेला पडतो.>सगळ््याच बाबत आहे नन्नाचा पाढाया भागातील नागरिकांना शासनाकडून सुविधा मिळत नसल्याने, या भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. रोजगार नसल्याने त्यासाठी होणाºया स्थलांतरणाचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे नव्या पिढीच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. रोहोयोची कामे वेळेवर सुरु होत नाहीत. मजुरी वेळवर मिळत नाही त्यामुळे ही योजना असून नसल्यासारखीच ठरली आहे.