शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जव्हार तालुक्यातील गावे विकासाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 03:02 IST

जव्हार : गुजरात व दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशांच्या सीमालगत असणारी तालुक्यातील गावे आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत.

हुसेन मेमनजव्हार : गुजरात व दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशांच्या सीमालगत असणारी तालुक्यातील गावे आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना मूलभूत सुविधांसाठी आजही झगडावे लागत आहे. यामध्ये रुईघर, बोपदरी, दाभेरी, पाचबुड, सागपाणा, सरोळीपाडा, रिठीपाडा यांचा समावेश आहे. त्यांना आजही रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, अशा मूलभूत सुविधा मिळालेल्याच नाहीत.यापैकी सरोळीपाडा, रिठीपाडा, पाचबुड या पाड्यांत विद्युत कनेक्शन पोहचले नाही. विशेष म्हणजे येथील विद्युतजोडणीला शासनाकडून मंजुरी मिळून पाच वर्ष झाली आहेत.मात्र अजूनही ही जोडणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील आदिवासींना आजही अंधारात जीवन जगावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रॉकेलचा दिवा वापरुन अभ्यास करावा लागतो आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत.सागपणा, रिठीपाडा, पाचबुड, या पाड्यांतील नागरिकाच्या नशिबी फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाई पूजलेली आहे. दरवर्षी येथील आदिवासींना उन्हाळ््यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहेत.ही गावे जव्हार तालुक्यापासून ४५ कि.मी. अंतरावर आहेत. येथील सीमेलगत आदिवासींना आजही आरोग्याच्या सुविधेसाठी दादरा नगर हवेली किंवा गुजरातचा आसरा घ्यावा लागत आहे.आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात व येथील गाव-पाड्यातील आदिवासींचा विकास व्हावा म्हणून शासनाकडून दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च होतो. परंतु, त्यांचे दैन्य काही संपत नाही. त्यामुळे तो जातो तरी कुठे असा प्रश्न जनतेला पडतो.>सगळ््याच बाबत आहे नन्नाचा पाढाया भागातील नागरिकांना शासनाकडून सुविधा मिळत नसल्याने, या भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. रोजगार नसल्याने त्यासाठी होणाºया स्थलांतरणाचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे नव्या पिढीच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. रोहोयोची कामे वेळेवर सुरु होत नाहीत. मजुरी वेळवर मिळत नाही त्यामुळे ही योजना असून नसल्यासारखीच ठरली आहे.