शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी पडतो वाडा-जव्हारचा फेरा

By admin | Updated: January 20, 2016 01:43 IST

जन्म मृत्यूची नोंद वेळेवर केली नाही तर न्यायालयातून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र विक्रमगडला न्यायालय नसल्याने येथील आदिवासींना पदमोड करुन वाडा

राहुल वाडेकर,  तलवाडाजन्म मृत्यूची नोंद वेळेवर केली नाही तर न्यायालयातून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र विक्रमगडला न्यायालय नसल्याने येथील आदिवासींना पदमोड करुन वाडा, जव्हारला जावे लागते. पूर्वी तहसीलदार कार्यालयातून हे काम होत असे. तिच व्यवस्था पुर्ववत करावी अशी मागणी होत आहे.विक्रमगड तालुका हा आदिवासी बहुल भाग असून येथे शेती व्यतिरिक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही शेती हंगाम सोडला तर मजुरीशिवाय अन्य पर्याय नाही़ या चक्रामुळे मजुरीतूनच घरखर्च चालवावा लागत असल्याने शिक्षण नाही या अज्ञानामुळे वेळचेवेळी जन्म-मृत्यु नोंदणी केली जात नाही़ पुर्वी वेळेवर जन्म नोंदणी केली नसल्यास तहसिलदारांकडे उशिरा जन्म-मृत्यु नोंदणी करण्याकरीता प्रकरण सादर केले जात होते व त्यांच्यामार्फत ग्रामपंचायतीला आदेश देऊन ती त्याप्रमाणे जन्म मृत्यु दाखला देत असे. याकरीता या गरीब जनतेची कामे फुकटात होत होती़ मात्र आता येथील गरीब आदिवासी अज्ञानी जनतेला हायकोर्टाच्या डिसेंबर २०१३ च्या एका आदेशानुसार राज्य शासनाने परिपत्रक जारी केल्यापासुन उशिरा नोंदणी करण्याऱ्यांना आता कोर्टाची पायरी चढावी लागत आहे़ आता हेच आदेश कोर्टामार्फत करण्यात आल्याने व विक्रमगड येथे कोर्ट नसल्याने जव्हार किंवा वाडा या ठिकाणी जाऊन पैशांच्या भुर्दंडाबरोबरच वेळेचा अपव्य करावा लागत आहे़. त्यामुळे ही बाब आता खर्चीक व नाहक त्रास देणारी ठरली असल्याने पुन्हा हे आदेश तहसिलदारां मार्फत व्हावेत अशी एकमुखील मागणी पंचक्रोशीतून होत आहे़