शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गरिबांना ठेंगाच - विवेक पंडित

By admin | Updated: February 2, 2017 02:42 IST

रोजगार हमीवर ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद दाखवण्यात आलेली आहे. गेल्यावर्षी ३८ हजार कोटी रुपये होते. पण, तरतूदीनुसार निधी उपलब्ध होत नाही. प्रत्यक्षात निधी

वसई: रोजगार हमीवर ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद दाखवण्यात आलेली आहे. गेल्यावर्षी ३८ हजार कोटी रुपये होते. पण, तरतूदीनुसार निधी उपलब्ध होत नाही. प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून दिला नाही तर तरतूदीला अर्थ उरत नाही. रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली आहेत. रोजगार हमी प्रभावी व्हायची असेल तर निधी उपलब्ध करून देणे आणि यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. निधी अंदाजित केला किंवा अर्थसंकल्पीत केला याचा अर्थ तो उपलब्ध करून दिला जाईल असा होत नाही. अर्थसंकल्पातून प्रत्यक्षात गरीबाच्या पदरात काहीच पडणार नाही. अशी प्रतिक्रिया माजी आमदार विवेक पंडित यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केलीसामान्यांचा अर्थसंकल्प-नाईकअर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, तरुण, रोजगार प्रशिक्षण, महिला, रेल्वे सुविधा आणि संरक्षण, उद्योग, लहान कंपन्या, पर्यटन, बँकींग आदी क्षेत्रांबरोबरच डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण तरतूदी करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देत ३ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. २.५ ते ५ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना ५ टक्के प्राप्तिकर भरावा लागणार आहे. या निर्णयामुळे सुमारे ७५ लाख नोकरदार आणि छोट्या व्यापारी वर्गाला दिलासा मिळणार आहे. शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात गतवर्षी पेक्षा २४ टक्यांनी जास्त म्हणजे १ लाख ८७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येत्या ५ वर्षांत शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्पाचाही पुनरूच्चार करण्यात आला. त्यासाठी शेतीला पतपुरवठा करणाऱ्या पतसंस्था, सोसायट्या आणि जिल्हा बँकांना कोअर बँकिंग प्रणालीने जोडण्यात येणार आहे. याशिवाय, ग्रामविकासासाठी ३ लाख कोटींची तरतूद करण्यात आली असून २०१९ पर्यंत ५० लाख ग्रामपंचायती गरिबी मुक्त करण्याची नवी घोषणा यावेळी सरकारने केली. तसेच २०१९ पर्यंत देशातल्या १ कोटी लोकांना पक्की घरें बांधून देण्याचा मानस या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया भाजपा वसई विरार जिल्हा सरचिटणीस, राजन नाईक यांनी व्यक्त केली आहे.मित्रांचा अर्थसंकल्प-डिमेलोहा अर्थंसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापारी मित्रांच्या हितासाठी असून अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही स्वत:च्या व्यापारी मित्रांचे हित जपून फक्त देशभक्तीचे लेबल लावून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. मध्यमवर्गींयांना करसवलतीचा काहीच फायदा होणार नाही. फक्त उत्तरप्रदेश आणि पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जनतेसमोर भ्रम निर्माण केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कृषी नुकसानासाठी या अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद नाही. मध्यमवर्गीयांच्या उत्पनावर कर सवलत देतांना हात आखडता घेवून सरकारने विश्वासघात केला आहे. याचवेळी उद्योगपतींना मात्र विविध सवलती व करात कपात करून हा अर्थसंकल्प उद्योगपतीधार्जीणा असल्याचे दाखवून दिले आहे. अशी प्रतिक्रिया वसई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉमनिक डिमेला यांनी व्यक्त केली आहे.अर्थसंकल्प चांगला-धनारेसरकारने सादर केलेला अर्थसंकल्प अतिशय चांगला असून यात मध्यमवर्गीयांच्या फायद्याचा विचार केलेला आहे , शेतकऱ्यांनाही विशेष पॅकेज देऊन त्याचेही हित साधले आहे अशी प्रतिक्रिया डहाणूचे आमदार पास्कल धनारे यांनी व्यक्त केली आहे कुठे आहे विकास-ठाकूरनोटबंदीचा मारा सहन केल्यानंतर नागरिकांना ठोस तरतूदींची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली आहे. शेती व हाऊसिंग पॉलिसी, कर या बाबत भरीव सवलती नाहीत. मागील अर्थसंकल्पातील बुलेट ट्रेनचा विसर पडला दिसला. केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थमंत्र्यांना माझे १० पैकी २ मार्क्स अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी व्यक्त केली. ह्या बजेट मुळे काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही. मध्यमवर्गीयाच्या कर सवलतीच्या रक्कमेत जरी वाढ करण्यात आली असली तरी विशेष फायदा नाही. उद्योगपती आणि बडया भांडवलदाराना अनेक फायदे मिळतील. -उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष, पालघरमहिलाच्या हिताचे अनेक निर्णय घेताना मनरेगातुन ५५ टक्के महिलांसाठी रोजगार निर्मिती व ८ हजार कोटींची तरतुद वाढविल्याने रोजगार निर्मिती होऊन स्थलांतर आणि पर्यायाने कुपोषणाला आळा बसणार आहे. -सुरेखा थेतले,जि. प.अध्यक्ष - पालघर