शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

वाघोबा धबधब्यावर पर्यटकांना सक्त मनाई

By admin | Updated: August 8, 2016 01:59 IST

पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटा जवळील धबधब्या वरील मोठमोठे दगड आणि दरड कोसळण्याच्या मार्गावर असल्याने वनविभाग आणि पोलिसांनी पर्यटकांना धबधब्यावर यायला

पालघर : पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटा जवळील धबधब्या वरील मोठमोठे दगड आणि दरड कोसळण्याच्या मार्गावर असल्याने वनविभाग आणि पोलिसांनी पर्यटकांना धबधब्यावर यायला बंदी घातली आहे.तर बाजूच्याच रस्त्याच्या कडेजवळील डोंगरावरही १५ ते २० टनाची महाकाय शिळा आणि दरड ही धोकादायक अवस्थेत अडकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने जिल्हाधिकाऱ्याने त्याबाबतही गांभीर्यपूर्वक उपाययोजना आखण्याच्या सूचना वनविभागाला दिले आहेत.मागील ७ दिवसांपासून पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून निसर्गाने धारण केलेल्या रौद्रावताराने जिल्ह्यात आता पर्यंत २२ बळी घेतले आहेत. मागील २० जून पासून जवळपास नियमितपणे कोसळणाऱ्या पावसाने सर्वांचा जीव नकोसा करून टाकला आहे. सावित्रीच्या घटनेनंतर तर पावसाने सर्वांच्या मनात दहशत माजवून ठेवली आहे.आपापल्या घरातून नोकरी, व्यवसाय, शिक्षण ई.साठी बाहेर पडणारा माणूस घरात संध्याकाळी सुखरूप येईलच याची शाश्वती राहिली नसल्याने अनेक कुटुंबीय काळजीत जगत आहेत.पालघर जिल्ह्यात आता पर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक नदी, नाले, धबधबे, ओसंडून वहात आहेत. पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटातील धबधबा हा पालघर आणि परिसरातील पर्यटकांचा आवडीचे ठिकाण बनला असल्याने शनिवार,रविवार आणि अन्य सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु सतत कोसळणाऱ्या तुफानी पावसामुळे या धबधब्याच्या दोन्ही बाजूचे दगड आणि दरडी कोसळल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिल्या नंतर वन विभागासह पालघर पोलिसांनी या ठिकाणी आपली गस्त वाढविली असून पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. या संदर्भात पालघर चे वनसंरक्षक कुप्ते यांच्याशी संपर्क साधला असता वनकर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता धोकादायक परिस्थिती वाटत नाही, तरीही त्या ठिकाणी गस्त ठेवली आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)