शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

विरारच्या पापडखिंड धबधब्यावर हुल्लडबाजी; सावधगिरी बाळगा, अन्यथा दुर्घटना अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:41 IST

पालघर, वसई हा पूर्व पश्चिम भाग बऱ्यापैकी निसर्गरम्य, हिरवेगार डोंगर, पाण्याचे ओहोळ अशा नानाविध कारणांनी पर्यटकांचे आकर्षण ठरला असून यापैकी उत्तम असे हे ठिकाण म्हणून विरार पूर्वेकडील पापडखिंडीकडे पाहिले जाते.

वसई : विरार शहराला लागून ग्रामीण भागातील पापडखिंड धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. पावसाळ्यात येथे तरुणांच्या हुल्लडबाजीला उत येऊ लागला आहे. शनिवार, रविवार किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी काही तरुणाचे ग्रुप मद्यपान करून डोंगराच्या टोकावर चढून जात आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने डोंगरावरील दगडही कमकुवत होत असतात. त्यामुळे डोंगरावरून दरड कोसळून जीवावर बेतणारा अपघात होण्याची भीती अन्य उपस्थित पर्यटकांकडूनच व्यक्त होत आहे.पालघर, वसई हा पूर्व पश्चिम भाग बऱ्यापैकी निसर्गरम्य, हिरवेगार डोंगर, पाण्याचे ओहोळ अशा नानाविध कारणांनी पर्यटकांचे आकर्षण ठरला असून यापैकी उत्तम असे हे ठिकाण म्हणून विरार पूर्वेकडील पापडखिंडीकडे पाहिले जाते. कुठलाही लांब पल्ल्याचा प्रवास न करता अगदी विरार शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील हा एकमेव छोटा धरण धबधबा असल्याने स्थानिकांची येथे मोठी गर्दी होते आहे. सुट्टीच्या दिवशी अथवा पावसामुळे रेल्वे सेवा बंद असल्यास या धबधब्यावर वसई- विरारकरांची मोठी गर्दी दिसून येत असते.पाण्यात उतरू नये?पापडखिंड धरणाच्या पाण्यात गेल्या काही वर्षांत तरु णांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असताना काळजी म्हणून यंदा या धरणाच्या पाण्यात कोणीही तरुण अथवा पर्यटक पोहण्यासाठी उतरू नये यासाठी वसई महापालिकेने या भागात दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत.

टॅग्स :Virarविरार