शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

असुविधांचे माहेरघर बनले विरार स्टेशन

By admin | Updated: January 23, 2016 23:29 IST

पश्चिम रेल्वेवरील गर्दीमध्ये चौथ्या क्रमांकावर विरार रेल्वे स्टेशन आहे. विरार रेल्वे स्टेशनमधून दररोज किमान दोन लाखाच्या आसपास प्रवाशी ये-जा करतात. तर विरार येथून रेल्वे दरदिवशी

वसई : पश्चिम रेल्वेवरील गर्दीमध्ये चौथ्या क्रमांकावर विरार रेल्वे स्टेशन आहे. विरार रेल्वे स्टेशनमधून दररोज किमान दोन लाखाच्या आसपास प्रवाशी ये-जा करतात. तर विरार येथून रेल्वे दरदिवशी अठरा लाखाच्या आसपास महसुल मिळतो. प्राथमिक सुविधांपासून दूर असलेल्या विरार स्टेशन परिसरात प्रवाशांना आजही रेल्वे रुळ ओलांडून ये-जा करावी लागत असल्याने गेल्यावर्षभरात ७४ जणांचा जीवगेला असून ५२ जण गंभीर जखमी झाले आहेत. डहाणू लोकल सुुरु होण्यापूर्वी विरार रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेचे शेवटचे उपनगरीय स्टेशन होते. त्याचबरोबर येथून डहाणूला नियमित शटल सेवा आहे. तसेच लांबपल्लयांच्या अनेक गाड्याही विरारला थांबतात. मात्र प्रवाशांना कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. विरार स्टेशनमध्ये एकूण सात फलाट आहे. त्यातील फलाट क्रमांक एक स्टेशनपासून दूर आहे. या फलाटावर पुरेसे पंखे, बसण्यासाठी बाके नाहीत. वीजेची सोय अपुरी असल्याने रात्री बऱ्यापैकी अंधार असतो. महिलांसाठी असुरक्षित असलेल्या फलाटावर प्रवाशांचा विरोध असतानाही रात्री उशिरा लोकल येतात. त्यामुळे अंधारात पायपीट करीत स्टेशनकडे ये-जा करावी लागते. या फलाटावरून नियमित लोकल सुटत असली तरी प्रवाशांसाठी ना स्वच्छतागृह आहे ना पाणपोई.फलाट क्रमांक दोनचीही तिच स्थिती आहे. याठिकाणी संपूर्ण फलाटावर छप्पर नाही. फलाटावर असलेले एकमेव स्वच्छतागृह पादचारी पुलासाठी तोडून टाकण्यात आले आहे. तर माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी स्वत: खर्चून बांधलेले आणि प्रवाशांच्या पसंतीला उतरलेले गार्डन रेल्वेने पादचारी पुलासाठी तोडून टाकले. फलाट क्रमांक दोन-तीनची अवस्थाही बिकट आहे. याठिकाणी असलेली एकमेव पाणपोई पादचारी पुलासाठी तोडण्यात आली. पण, पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. या दोन फलाटांवरून लोकल आणि लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटतात. त्यासाठी शेकडो प्रवाशी फलाटावर असतात. पण त्यांना बसायला पुरेसे बाकडे पंखे नाहीत. फलाटावर पूर्ण छप्पर नाही. येथुन रात्री आणि पहाटे गुजरातकडे शटल सुटते. त्यासाठी बरेचसे प्रवाशी फलाटांवरच झोपत असतात. पण, विरार स्टेशनात दोन-तीन फलाटावर एकमेव स्वच्छतागृह तेही छोटेंसे आणि अतिशय घाणेरडे आहे. याठिकाणी नैसर्गिक विधीसाठी प्रवाशी अक्षरश: रांगा लावून उभे असलेले दिसतात. (प्रतिनिधी)विरार रेल्वे स्टेशनवर एक सबवे आहे. तोही घाण आणि उग्र वास प्रवाशांना त्रस्त करीत असतो. काही अपवाद वगळता सबवे फेरीवाल्यांच्या बाजाराने भरलेला असतो. त्यानंतर एक जुना पादचारी पूल आहे. तर पुढे नवा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. दुसरी कोणतीच सुविधा नसल्याने शेकडो प्रवाशी रुळ ओलांडून ये-जा करताना दिसतात. त्यामुळे विरार रेल्वे परिसरात रेल्वे अपघातात ठार आणि गंभीर होण्याची संख्या सर्वाधिक आहे. गर्दी पाहता याठिकाणी तिकीट खिडक्यांची संख्या अपुरी आहे. एटीव्हीएम मशीन आहेत पण त्याही पुरेशा नसल्याने तिकीटांसाठी नेहमी मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात.फलाट क्रमांक चार-पाच अतिशय घाणेरडे आणि उग्र वास असलेले ठिकाण. तरीही लोकल आणि शटल प्रवाशी ताटकळत उभे राहतात. पाच क्रमांकाच्या फलाटावर रात्री एक शटल उभी असते. या फलाटावर वीजेचे दिवे कमी असल्याने रात्री अंधार असतो. फलाट क्रमांक चार-पाच विरार परिसरातील बेघर, भिकारी, गर्दुल्ले यांचे हक्काचे निवासस्थान बनले आहे. हीच माणसे रात्रभर शटलमध्ये बसून नैसर्गिक विधी करीत असतात. त्यामुळे त्याठिकाणी प्रचंड घाण आणि डोके दुखवणारा उग्र वास असतो. या फलाटावर ना बाके आहेत ना पुरेसे पंखे, त्यात उग्र वासाने उठणारे डोके याही स्थितीत प्रवाशी संयम न सोडता गाडीची वाट पहात उभे असतात.