शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

असुविधांचे माहेरघर बनले विरार स्टेशन

By admin | Updated: January 23, 2016 23:29 IST

पश्चिम रेल्वेवरील गर्दीमध्ये चौथ्या क्रमांकावर विरार रेल्वे स्टेशन आहे. विरार रेल्वे स्टेशनमधून दररोज किमान दोन लाखाच्या आसपास प्रवाशी ये-जा करतात. तर विरार येथून रेल्वे दरदिवशी

वसई : पश्चिम रेल्वेवरील गर्दीमध्ये चौथ्या क्रमांकावर विरार रेल्वे स्टेशन आहे. विरार रेल्वे स्टेशनमधून दररोज किमान दोन लाखाच्या आसपास प्रवाशी ये-जा करतात. तर विरार येथून रेल्वे दरदिवशी अठरा लाखाच्या आसपास महसुल मिळतो. प्राथमिक सुविधांपासून दूर असलेल्या विरार स्टेशन परिसरात प्रवाशांना आजही रेल्वे रुळ ओलांडून ये-जा करावी लागत असल्याने गेल्यावर्षभरात ७४ जणांचा जीवगेला असून ५२ जण गंभीर जखमी झाले आहेत. डहाणू लोकल सुुरु होण्यापूर्वी विरार रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेचे शेवटचे उपनगरीय स्टेशन होते. त्याचबरोबर येथून डहाणूला नियमित शटल सेवा आहे. तसेच लांबपल्लयांच्या अनेक गाड्याही विरारला थांबतात. मात्र प्रवाशांना कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. विरार स्टेशनमध्ये एकूण सात फलाट आहे. त्यातील फलाट क्रमांक एक स्टेशनपासून दूर आहे. या फलाटावर पुरेसे पंखे, बसण्यासाठी बाके नाहीत. वीजेची सोय अपुरी असल्याने रात्री बऱ्यापैकी अंधार असतो. महिलांसाठी असुरक्षित असलेल्या फलाटावर प्रवाशांचा विरोध असतानाही रात्री उशिरा लोकल येतात. त्यामुळे अंधारात पायपीट करीत स्टेशनकडे ये-जा करावी लागते. या फलाटावरून नियमित लोकल सुटत असली तरी प्रवाशांसाठी ना स्वच्छतागृह आहे ना पाणपोई.फलाट क्रमांक दोनचीही तिच स्थिती आहे. याठिकाणी संपूर्ण फलाटावर छप्पर नाही. फलाटावर असलेले एकमेव स्वच्छतागृह पादचारी पुलासाठी तोडून टाकण्यात आले आहे. तर माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी स्वत: खर्चून बांधलेले आणि प्रवाशांच्या पसंतीला उतरलेले गार्डन रेल्वेने पादचारी पुलासाठी तोडून टाकले. फलाट क्रमांक दोन-तीनची अवस्थाही बिकट आहे. याठिकाणी असलेली एकमेव पाणपोई पादचारी पुलासाठी तोडण्यात आली. पण, पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. या दोन फलाटांवरून लोकल आणि लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटतात. त्यासाठी शेकडो प्रवाशी फलाटावर असतात. पण त्यांना बसायला पुरेसे बाकडे पंखे नाहीत. फलाटावर पूर्ण छप्पर नाही. येथुन रात्री आणि पहाटे गुजरातकडे शटल सुटते. त्यासाठी बरेचसे प्रवाशी फलाटांवरच झोपत असतात. पण, विरार स्टेशनात दोन-तीन फलाटावर एकमेव स्वच्छतागृह तेही छोटेंसे आणि अतिशय घाणेरडे आहे. याठिकाणी नैसर्गिक विधीसाठी प्रवाशी अक्षरश: रांगा लावून उभे असलेले दिसतात. (प्रतिनिधी)विरार रेल्वे स्टेशनवर एक सबवे आहे. तोही घाण आणि उग्र वास प्रवाशांना त्रस्त करीत असतो. काही अपवाद वगळता सबवे फेरीवाल्यांच्या बाजाराने भरलेला असतो. त्यानंतर एक जुना पादचारी पूल आहे. तर पुढे नवा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. दुसरी कोणतीच सुविधा नसल्याने शेकडो प्रवाशी रुळ ओलांडून ये-जा करताना दिसतात. त्यामुळे विरार रेल्वे परिसरात रेल्वे अपघातात ठार आणि गंभीर होण्याची संख्या सर्वाधिक आहे. गर्दी पाहता याठिकाणी तिकीट खिडक्यांची संख्या अपुरी आहे. एटीव्हीएम मशीन आहेत पण त्याही पुरेशा नसल्याने तिकीटांसाठी नेहमी मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात.फलाट क्रमांक चार-पाच अतिशय घाणेरडे आणि उग्र वास असलेले ठिकाण. तरीही लोकल आणि शटल प्रवाशी ताटकळत उभे राहतात. पाच क्रमांकाच्या फलाटावर रात्री एक शटल उभी असते. या फलाटावर वीजेचे दिवे कमी असल्याने रात्री अंधार असतो. फलाट क्रमांक चार-पाच विरार परिसरातील बेघर, भिकारी, गर्दुल्ले यांचे हक्काचे निवासस्थान बनले आहे. हीच माणसे रात्रभर शटलमध्ये बसून नैसर्गिक विधी करीत असतात. त्यामुळे त्याठिकाणी प्रचंड घाण आणि डोके दुखवणारा उग्र वास असतो. या फलाटावर ना बाके आहेत ना पुरेसे पंखे, त्यात उग्र वासाने उठणारे डोके याही स्थितीत प्रवाशी संयम न सोडता गाडीची वाट पहात उभे असतात.