शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

२९ गावांतील ग्रामस्थांचा कल मनपाकडे!; महापालिकेतून गावे वगळली जाण्याची शक्यता धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 00:31 IST

हरकती-सूचनांतील ९,१८५ अर्ज महानगरपालिकेसाठी, केवळ २३३ अर्ज ग्रामपंचायतींच्या बाजूने तर २० अर्ज तटस्थ

पारोळ : वसई-विरार शहर महानगरपालिकेतून २९ गावे वगळण्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी संबंधित २९ गावांतीलच नागरिकांशी सल्लामसलत करून पुढील निर्णय घेण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर मागवण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा मोठ्या प्रमाणातील कल हा वसई-विरार महानगरपालिकेच्या बाजूने राहिला आहे. महापालिकेतून ही गावे न वगळता त्या ठिकाणी महापालिका प्रशासनच ठेवावे, अशी मागणी करणारे सदर २९ गावांतून सुमारे नऊ हजार १८५ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. तर, केवळ २३३ अर्जांद्वारे ग्रामपंचायत प्रशासन ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच २० अर्जदार तटस्थ राहिले आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने वसई-विरार क्षेत्रातून २९ गावे वगळण्यासाठी सर्व घटकांसोबत व्यापक सल्लामसलत करून यथोचित अंतिम निर्णय घेण्याचे आदेश शासनास दिले होते. त्या अनुषंगाने सद्य:स्थितीत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सुनावणी न घेता दि. १७ ते २४ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत प्रस्तुत क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याकडून लेखी हरकती व सूचना मागाविण्यात आल्या होत्या. त्यानुसार वसई-विरार शहर  महानगरपालिकेकडे एकूण ९४३८ अर्ज प्राप्त झाले. यापैकी २९ गावे महानगरपालिका क्षेत्रातून वगळण्याच्या बाजूने २३३ अर्ज व महानगरपालिका क्षेत्रातून गावे न वगळण्याच्या बाजूने ९१८५ व २० तटस्थ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार या क्षेत्रामध्ये युनिट ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन काय असावे? म्हणजेच पुन्हा ग्रामपंचायत ठेवाव्या अथवा स्वतंत्र नगरपालिका स्थापन कराव्या, याबाबतदेखील दि. २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत लेखी हरकती, सूचना व निवेदने मागाविण्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातून निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार एकूण २७०८ अर्ज प्राप्त झाले. २९ गावे महानगरपालिका क्षेत्रातून वगळण्याच्या बाजूने एकूण चार अर्ज तर महानगरपालिका क्षेत्रातून गावे न वगळण्याच्या बाजूने २७०४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

शक्यता झाली धूसर  २९ गावांतील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावरील कौल हा महापालिका प्रशासनाच्याच बाजूने असल्याने महापालिकेतून ही गावे यापुढे वगळली जाण्याची शक्यता धूसर झाली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार