शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

प्राथमिक सोयी नसलेले गाव

By admin | Updated: May 15, 2016 01:12 IST

राहायला पक्के घर नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही आणि पोटाला अन्न नाही, अशी अवस्था असलेल्या गावात सरकारने १४.७५ लाख रुपये मोजून समाजभवन उभारले आहे.

हितेन नाईक, पालघरराहायला पक्के घर नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही आणि पोटाला अन्न नाही, अशी अवस्था असलेल्या गावात सरकारने १४.७५ लाख रुपये मोजून समाजभवन उभारले आहे. गोरगरिबांना चिडवणारे हे चित्र आहे, खोडाळ्यातील कातकरीपाड्याचे. या गावात आदिवासी-कातकरी समाजाची इनमीन ५० घरे असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गावातील सर्व पुरुष मंडळी शहराकडे असतात.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी मोखाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांत ९५ टक्के आदिवासी लोकवस्ती आहे. आदिवासींना केंद्रबिंदू मानून नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली असताना जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला असताना सर्वसामान्यांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली आहे काय, हे पाहिल्यास नाही, असे काहीसे खेदाने म्हणावे लागेल. असे चित्र मोखाडा-खोडाळामधील ग्रामीण भागात दिसून आले.खोडाळा येथील कातकरीपाड्यातील झोपड्यांमध्ये राहणारे कातकरी समाजबांधव आजही जगण्याचा संषर्घ करीत आहेत. प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख व त्याची पत्नी आपल्या मुलांना म्हाताऱ्या आईवडिलांकडे सोपवून रोजगाराच्या शोधार्थ भिवंडी, वाडा, ठाणे, पालघर इ. भागांत ४ ते ५ महिने राहतात. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील अंगणवाडी नावाला असल्याचे दिसून येते. पिण्याचे पाणी स्वच्छतेच्या कसोटीवर नापास असून आरोग्याच्या सुविधांचा अभावही येथे प्रकर्षाने जाणवतो. या पाड्यातील ८० टक्के घरे ही चंद्रमौळी झोपड्या असल्याने त्यांच्या गरिबीची साक्ष देत असल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना जीवनोपयोगी सुविधा देणे गरजेचे असताना आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा योजनेतून १४ लाख ७५ हजारांचे समाजभवन उभारण्यात आले. जे या पाड्यातील नागरिकांच्या काही उपयोगाचे नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासन आदिवासी समाजाच्या विकासासाठी नियोजित केलेल्या निधीचा योग्य विनियोग करीत नसल्याचे दिसून येत आहे.