शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

प्राथमिक सोयी नसलेले गाव

By admin | Updated: May 15, 2016 01:12 IST

राहायला पक्के घर नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही आणि पोटाला अन्न नाही, अशी अवस्था असलेल्या गावात सरकारने १४.७५ लाख रुपये मोजून समाजभवन उभारले आहे.

हितेन नाईक, पालघरराहायला पक्के घर नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही आणि पोटाला अन्न नाही, अशी अवस्था असलेल्या गावात सरकारने १४.७५ लाख रुपये मोजून समाजभवन उभारले आहे. गोरगरिबांना चिडवणारे हे चित्र आहे, खोडाळ्यातील कातकरीपाड्याचे. या गावात आदिवासी-कातकरी समाजाची इनमीन ५० घरे असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गावातील सर्व पुरुष मंडळी शहराकडे असतात.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी मोखाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांत ९५ टक्के आदिवासी लोकवस्ती आहे. आदिवासींना केंद्रबिंदू मानून नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली असताना जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला असताना सर्वसामान्यांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली आहे काय, हे पाहिल्यास नाही, असे काहीसे खेदाने म्हणावे लागेल. असे चित्र मोखाडा-खोडाळामधील ग्रामीण भागात दिसून आले.खोडाळा येथील कातकरीपाड्यातील झोपड्यांमध्ये राहणारे कातकरी समाजबांधव आजही जगण्याचा संषर्घ करीत आहेत. प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख व त्याची पत्नी आपल्या मुलांना म्हाताऱ्या आईवडिलांकडे सोपवून रोजगाराच्या शोधार्थ भिवंडी, वाडा, ठाणे, पालघर इ. भागांत ४ ते ५ महिने राहतात. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील अंगणवाडी नावाला असल्याचे दिसून येते. पिण्याचे पाणी स्वच्छतेच्या कसोटीवर नापास असून आरोग्याच्या सुविधांचा अभावही येथे प्रकर्षाने जाणवतो. या पाड्यातील ८० टक्के घरे ही चंद्रमौळी झोपड्या असल्याने त्यांच्या गरिबीची साक्ष देत असल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना जीवनोपयोगी सुविधा देणे गरजेचे असताना आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा योजनेतून १४ लाख ७५ हजारांचे समाजभवन उभारण्यात आले. जे या पाड्यातील नागरिकांच्या काही उपयोगाचे नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासन आदिवासी समाजाच्या विकासासाठी नियोजित केलेल्या निधीचा योग्य विनियोग करीत नसल्याचे दिसून येत आहे.