शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

प्राथमिक सोयी नसलेले गाव

By admin | Updated: May 15, 2016 01:12 IST

राहायला पक्के घर नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही आणि पोटाला अन्न नाही, अशी अवस्था असलेल्या गावात सरकारने १४.७५ लाख रुपये मोजून समाजभवन उभारले आहे.

हितेन नाईक, पालघरराहायला पक्के घर नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही आणि पोटाला अन्न नाही, अशी अवस्था असलेल्या गावात सरकारने १४.७५ लाख रुपये मोजून समाजभवन उभारले आहे. गोरगरिबांना चिडवणारे हे चित्र आहे, खोडाळ्यातील कातकरीपाड्याचे. या गावात आदिवासी-कातकरी समाजाची इनमीन ५० घरे असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गावातील सर्व पुरुष मंडळी शहराकडे असतात.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी मोखाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांत ९५ टक्के आदिवासी लोकवस्ती आहे. आदिवासींना केंद्रबिंदू मानून नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली असताना जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला असताना सर्वसामान्यांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली आहे काय, हे पाहिल्यास नाही, असे काहीसे खेदाने म्हणावे लागेल. असे चित्र मोखाडा-खोडाळामधील ग्रामीण भागात दिसून आले.खोडाळा येथील कातकरीपाड्यातील झोपड्यांमध्ये राहणारे कातकरी समाजबांधव आजही जगण्याचा संषर्घ करीत आहेत. प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख व त्याची पत्नी आपल्या मुलांना म्हाताऱ्या आईवडिलांकडे सोपवून रोजगाराच्या शोधार्थ भिवंडी, वाडा, ठाणे, पालघर इ. भागांत ४ ते ५ महिने राहतात. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील अंगणवाडी नावाला असल्याचे दिसून येते. पिण्याचे पाणी स्वच्छतेच्या कसोटीवर नापास असून आरोग्याच्या सुविधांचा अभावही येथे प्रकर्षाने जाणवतो. या पाड्यातील ८० टक्के घरे ही चंद्रमौळी झोपड्या असल्याने त्यांच्या गरिबीची साक्ष देत असल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना जीवनोपयोगी सुविधा देणे गरजेचे असताना आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा योजनेतून १४ लाख ७५ हजारांचे समाजभवन उभारण्यात आले. जे या पाड्यातील नागरिकांच्या काही उपयोगाचे नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासन आदिवासी समाजाच्या विकासासाठी नियोजित केलेल्या निधीचा योग्य विनियोग करीत नसल्याचे दिसून येत आहे.