शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

विक्रमगडचा गावठी कोलम (झिनी), तांदूळ नामशेष होणार?

By admin | Updated: July 14, 2016 01:33 IST

कमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास रुचकर व मागणी जास्त असलेला गावठी कोलम (झिनी) तांदळचे उत्पादन पूर्वी प्रमाणे होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आ

राहुल वाडेकर,  विक्रमगडकमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास रुचकर व मागणी जास्त असलेला गावठी कोलम (झिनी) तांदळचे उत्पादन पूर्वी प्रमाणे होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे़ हा तांदूळ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ कारण त्याला मिळणारा कमी भाव, मजुरीचे वाढते दर, शेती साहित्याच्या वाढलेल्या किंमती, महागाई व निसर्गाचा लहरीपणा आहे. विक्रमगड तालुक्यातील घेतल्या जाणाऱ्या या रुचकर गावठी लहान दाण्याच्या भातपिकाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे़ शेतकरी सध्या या पिकाकडे दुर्लक्ष करीत असुन त्यामूळे एक चांगले भातपीक धोक्यात आले आहे़ सध्या हा तांदुळ बाजारात ५५ ते ५६ रुपये किलो दराने विकला जात आहे़तरुणाई शेती उत्पादनाबाबत उदासिन धोरणराबाबत आहे़ काही ठिकाणी नवनवीन सुधारीत जातीच्या वाणांची लागवड केली जात असल्याने या कोलम तांदळाचे उत्पादन घटले आहे़ त्याच्या उत्पादनासाठी मोठी मेहनत घ्यावी लागतेच व खर्चही बराच करावा लागतो़ हया तांदळाचा दाना लहान व गोडीस असल्याने निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही तर नुकसान सहन करावे लागते़ कारण गोड तांदुळास कीड लवकर लागते व त्यापासून खुप जपावे लागते, मेहनत घ्यावी लागते़ त्यामुळे या भात पिकाला पूर्वीचे गत वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे मत विक्रमगड येथील शेतकरी निलेश सांबरे यांनी लोकमतकडे व्यक्त केले.विक्रमगड तालुक्यातील मृदा,पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी विक्रमगड कोलमचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जात होते.एक सेंटीमिटर लांबीचा दाणा व सुगंध यामुळे हा खाण्यासाठी रुचकर म्हणून प्रसिध्द होता. याची सर्वत्र मोठी मागणी आहे़ विक्रमगडच्या मातीत हे रुचकर पीक तयार होत असल्याने या पिकाने आपले स्थान पक्के केले होते़ परंतु कालांतराने शेतकरीही आधुनिक युगातील नवीन व जादा उत्पादन देणाऱ्या भात पिकांकडे वळल्याने जास्त मेहनत व खर्चीक असलेल्या कोलमचे उत्पादन घेण्यास उदासीन झाला आहे़पूर्वी भात पिकाच्या मोजक्या जाती होत्या त्यात कोलम तांदळाला चांगला बाजारभाव मिळत असे़ त्यामुळे या भात पिकाची कोठारे तालुक्यातील विविध भागातील आदिवासी व कुणबी शेतकरी कणग्यांमध्ये भरुन ठेवत असे आणि त्या कणग्यांना शेणाने सावरुन सुरक्षित पॅकींग करुन बंद करुन भरुन ठेवत असायचे़ मात्र अलिकडे भातपिकांच्या संकरित व सुधारित जातीमुळे हे कष्टाळू भातपीक दुर्लक्षित होउ लागले आहे़ पूर्वीच्या जमान्यात आताची महागाई व येणारा खर्च जाउन बाजार भावही योग्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हे पीक घेण्याकडे पाठ फिरवली आहे. तालुक्यातील केवळ श्रीमंत शेतकरी व अपवाद वगळता काही मोजकेच शेतकरी हे दर्जेदार पीक घरी खाण्याकरिता घेत आहेत.