शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडचा गावठी कोलम (झिनी), तांदूळ नामशेष होणार?

By admin | Updated: July 14, 2016 01:33 IST

कमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास रुचकर व मागणी जास्त असलेला गावठी कोलम (झिनी) तांदळचे उत्पादन पूर्वी प्रमाणे होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आ

राहुल वाडेकर,  विक्रमगडकमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास रुचकर व मागणी जास्त असलेला गावठी कोलम (झिनी) तांदळचे उत्पादन पूर्वी प्रमाणे होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे़ हा तांदूळ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ कारण त्याला मिळणारा कमी भाव, मजुरीचे वाढते दर, शेती साहित्याच्या वाढलेल्या किंमती, महागाई व निसर्गाचा लहरीपणा आहे. विक्रमगड तालुक्यातील घेतल्या जाणाऱ्या या रुचकर गावठी लहान दाण्याच्या भातपिकाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे़ शेतकरी सध्या या पिकाकडे दुर्लक्ष करीत असुन त्यामूळे एक चांगले भातपीक धोक्यात आले आहे़ सध्या हा तांदुळ बाजारात ५५ ते ५६ रुपये किलो दराने विकला जात आहे़तरुणाई शेती उत्पादनाबाबत उदासिन धोरणराबाबत आहे़ काही ठिकाणी नवनवीन सुधारीत जातीच्या वाणांची लागवड केली जात असल्याने या कोलम तांदळाचे उत्पादन घटले आहे़ त्याच्या उत्पादनासाठी मोठी मेहनत घ्यावी लागतेच व खर्चही बराच करावा लागतो़ हया तांदळाचा दाना लहान व गोडीस असल्याने निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही तर नुकसान सहन करावे लागते़ कारण गोड तांदुळास कीड लवकर लागते व त्यापासून खुप जपावे लागते, मेहनत घ्यावी लागते़ त्यामुळे या भात पिकाला पूर्वीचे गत वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे मत विक्रमगड येथील शेतकरी निलेश सांबरे यांनी लोकमतकडे व्यक्त केले.विक्रमगड तालुक्यातील मृदा,पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी विक्रमगड कोलमचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जात होते.एक सेंटीमिटर लांबीचा दाणा व सुगंध यामुळे हा खाण्यासाठी रुचकर म्हणून प्रसिध्द होता. याची सर्वत्र मोठी मागणी आहे़ विक्रमगडच्या मातीत हे रुचकर पीक तयार होत असल्याने या पिकाने आपले स्थान पक्के केले होते़ परंतु कालांतराने शेतकरीही आधुनिक युगातील नवीन व जादा उत्पादन देणाऱ्या भात पिकांकडे वळल्याने जास्त मेहनत व खर्चीक असलेल्या कोलमचे उत्पादन घेण्यास उदासीन झाला आहे़पूर्वी भात पिकाच्या मोजक्या जाती होत्या त्यात कोलम तांदळाला चांगला बाजारभाव मिळत असे़ त्यामुळे या भात पिकाची कोठारे तालुक्यातील विविध भागातील आदिवासी व कुणबी शेतकरी कणग्यांमध्ये भरुन ठेवत असे आणि त्या कणग्यांना शेणाने सावरुन सुरक्षित पॅकींग करुन बंद करुन भरुन ठेवत असायचे़ मात्र अलिकडे भातपिकांच्या संकरित व सुधारित जातीमुळे हे कष्टाळू भातपीक दुर्लक्षित होउ लागले आहे़ पूर्वीच्या जमान्यात आताची महागाई व येणारा खर्च जाउन बाजार भावही योग्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हे पीक घेण्याकडे पाठ फिरवली आहे. तालुक्यातील केवळ श्रीमंत शेतकरी व अपवाद वगळता काही मोजकेच शेतकरी हे दर्जेदार पीक घरी खाण्याकरिता घेत आहेत.