शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

विक्रमगडकरांना हवे आहे नवीन बसस्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:16 IST

प्रवाशांचे हाल : पिकअप शेडवर भागवले जाते काम

विक्रमगड : विक्रमगड तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत एस.टी. बसस्थानकच नसल्याने येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हांत, पावसाळ्यात पावसात तासन्तास ताटकळत येथील प्रवाशांना एस.टी.ची वाट पाहावी लागते. विक्रमगड हे तालुक्यातील शहराचे मुख्य ठिकाण असतानाही येथे तालुका निर्मितीपासून बसस्थानक नाही. त्यामुळे सद्यस्थितीत २० वर्षापासून उपलब्ध पिकअप शेडवर काम भागविले जात आहे. या ठिकाणी अद्ययावत बसस्थानक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात असतानाही याकडे कुणीही गांभीर्याने पाहात नाही.

विक्रमगड तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड लाखांच्या घरात जाऊन पोहचली आहे. तर विक्रमगड शहराची लोकसंख्या २५ हजारावर गेली आहे. येथून दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाºया अंदाजित ६० ते ७० एस.टी. बसेस सुटतात. विक्रमगड शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालय, इंजिनीअरिंग कॉलेज, आय.टी.आय. व विविध आस्थापनांमध्ये काम करणारे असंख्य अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे एस.टी.चे असंख्य प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र आजही गेल्या तालुका निर्मितीच्या २० वर्षापासून सुविधांविना विक्रमगड मुख्यालयी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे साधे पिकअप शेड आहे, तेही प्रवाशांना असून नसल्यासारखेच आहे. कारण बस पिकअप शेडसमोर एसटी बस थांब्यांसाठी जागाच शिल्लक राहात नाही, तर प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा नाही. विक्रमगडसाठी असलेली सद्यस्थितीतली पिकअप शेड २० वर्षापूर्वी खासदार निधीतून बांधलेली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाने प्रवाशांसाठी केले तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.प्रसाधनगृहाचीही सोय नाहीच्विक्रमगड शहर हे तालुक्यातील ९४ गावपाड्यांचे मुख्यालय असल्याने दररोज गाव-खेड्यापाड्यांतून तसेच शहरांतून विक्रमगडमध्ये अगर विक्रमगडहून एस.टी. बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणू आदी ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र तालुक्याचे मुख्यालय असूनही विक्रमगड शहरात अद्यापही अद्ययावत असे एसटी बसस्थानक नाही.च्परिणामी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वृद्ध, रुग्ण, महिला प्रवाशांसाठी प्रसाधनगृहांची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अशा प्रवाशांचे तर हाल पाहावत नाहीत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार