शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

विक्रमगडकरांना हवे आहे नवीन बसस्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:16 IST

प्रवाशांचे हाल : पिकअप शेडवर भागवले जाते काम

विक्रमगड : विक्रमगड तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत एस.टी. बसस्थानकच नसल्याने येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हांत, पावसाळ्यात पावसात तासन्तास ताटकळत येथील प्रवाशांना एस.टी.ची वाट पाहावी लागते. विक्रमगड हे तालुक्यातील शहराचे मुख्य ठिकाण असतानाही येथे तालुका निर्मितीपासून बसस्थानक नाही. त्यामुळे सद्यस्थितीत २० वर्षापासून उपलब्ध पिकअप शेडवर काम भागविले जात आहे. या ठिकाणी अद्ययावत बसस्थानक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात असतानाही याकडे कुणीही गांभीर्याने पाहात नाही.

विक्रमगड तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड लाखांच्या घरात जाऊन पोहचली आहे. तर विक्रमगड शहराची लोकसंख्या २५ हजारावर गेली आहे. येथून दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाºया अंदाजित ६० ते ७० एस.टी. बसेस सुटतात. विक्रमगड शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालय, इंजिनीअरिंग कॉलेज, आय.टी.आय. व विविध आस्थापनांमध्ये काम करणारे असंख्य अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे एस.टी.चे असंख्य प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र आजही गेल्या तालुका निर्मितीच्या २० वर्षापासून सुविधांविना विक्रमगड मुख्यालयी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे साधे पिकअप शेड आहे, तेही प्रवाशांना असून नसल्यासारखेच आहे. कारण बस पिकअप शेडसमोर एसटी बस थांब्यांसाठी जागाच शिल्लक राहात नाही, तर प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा नाही. विक्रमगडसाठी असलेली सद्यस्थितीतली पिकअप शेड २० वर्षापूर्वी खासदार निधीतून बांधलेली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाने प्रवाशांसाठी केले तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.प्रसाधनगृहाचीही सोय नाहीच्विक्रमगड शहर हे तालुक्यातील ९४ गावपाड्यांचे मुख्यालय असल्याने दररोज गाव-खेड्यापाड्यांतून तसेच शहरांतून विक्रमगडमध्ये अगर विक्रमगडहून एस.टी. बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणू आदी ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र तालुक्याचे मुख्यालय असूनही विक्रमगड शहरात अद्यापही अद्ययावत असे एसटी बसस्थानक नाही.च्परिणामी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वृद्ध, रुग्ण, महिला प्रवाशांसाठी प्रसाधनगृहांची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अशा प्रवाशांचे तर हाल पाहावत नाहीत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार