शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विक्रमगड तहसीलचा कारभार अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर

By admin | Updated: December 31, 2016 03:56 IST

१९९९ मध्ये अस्तित्वात आलेल्या विक्रमगड तालुक्याच्या तहसिल कार्यालयात मूलभूत सुविधेच्या अभावाबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे महसूल

- संजय नेवे,  विक्रमगड१९९९ मध्ये अस्तित्वात आलेल्या विक्रमगड तालुक्याच्या तहसिल कार्यालयात मूलभूत सुविधेच्या अभावाबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे महसूल प्रशासनावर ताण पडतो आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५ हजार ५२७ हेक्टर आहे. यात ९४ गावे, तर ४२३ पाड्यांचा समावेश आहे. सन-२००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १,१४,२५४ च्या घरात पोहचली आहे. सद्यस्थितीत ४० ग्रामपंचायती व ३ ग्रामदान मंडळांचा समावेश करण्यांत आला आहे. आज मितीस १७ वर्षाचा काळ लोटला तरी तहसिल कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांना बसण्यासाठी योग्य ती व्यवस्था झालेली नाही. सध्या हे कार्यालय पूर्वीच्या मंडळ अधिकारी कार्यालयातच असून नवीन इमारतीचा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडला आहे. दरवर्षी नवीन इमारतीकरीता निधी येऊन परत जातो परंतु जागेअभावी त्याचा वापर काही होत नाही. विक्रमगड तहसील कार्यालयात पुरवठा विभाग, महसूल विभाग, संजय गांधी विभाग, एम. आर. जी. एस विभाग, निवडणूक विभाग असून गेल्या १६ ते १७ वर्षांपासून या विभागातील महसूल विभाग सोडला तर बाकी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे अद्याप मंजूर नाहीत. त्यामुळे महसूल विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडूनच इतर विभागातील कामे करून घेतली जात आहेत. आज मितीस पुरवठा विभाग-७, संजय गांधी विभाग-५ व निवडणूक विभाग-३ अशी एकूण-१५ पदे रिक्तच आहेत. त्यामुळे जनतेची कामे वेळेत होत नाही व त्यांना वारंवार या कार्यालयात खेटे मारावे लागतात. वेळेबरोबरच पैशांचाही अपव्यय सहन करावा लागतो आहे. पुरवठा व संजय गांधी विभागास तालुका निर्मितीपासूनच मंजूरी नाही. यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला जात असूनही योग्य उपाययोजना केली जात नसल्याने त्याचा विपरीत परीणाम तालुक्यातील विकासकामांवर होत आहे.व नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विक्रमगड तहसिल कार्यालयातील रिक्त असणाऱ्या पदांबाबतची सर्व माहिती आम्ही वरिष्ठ कार्यालयास दिली असून याबाबत लवकरच उपाय योजना केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. - सुरेश सोनावणे, तहसिलदारविक्रमगड हा आदीवासी बहुल तालुका असून येथील जनतेला आपल्या कामासाठी विक्रमगड तहसिल कार्यालयात कोसो दूर पैसे खर्च करून यावे लागत परंतु इथे आल्यानंतर कर्मचारी वर्ग कमी असल्याने त्याची कामे वेळेत होत नसल्याने त्याना रिकाम्या हाती जावे लागते त्यामुळे त्याचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे आदिवासी विकासमंत्री असलेल्या पालकमंत्र्यांनी व पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबी कडे लक्ष द्यावे व ही रिक्त पदे भरावीत.- किरण गहला, माकपा सचिव,विक्र मगड