शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

विक्रमगडला ४ महिने मुख्याधिकारीच नाही

By admin | Updated: May 22, 2017 01:48 IST

नगरपंचायतीचा कारभार जानेवारीमध्ये मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या काळात सुरु झाला खरा मात्र ते रोज येणारे मोर्चे, आंदोलने, नागरिकांकडून मिळणाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : नगरपंचायतीचा कारभार जानेवारीमध्ये मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या काळात सुरु झाला खरा मात्र ते रोज येणारे मोर्चे, आंदोलने, नागरिकांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीला कंटाळून रजेवर गेल्याने चार महिन्यांपासून या नगरपंचायतीला कुणीही वाली नाही.मुख्याधिकाऱ्यांविनाच कारभार चालविला जात आहे़ याबाबत ग्रामस्थांनी टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर शासनाकडुन तात्पुरत्या स्वरुपात पालघर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे या पदाचा चार्ज सोपविण्यात आला होता मात्र ते देखील त्यांची कामे सोडून येथे येण्यास तयार नसल्याने आता हा कार्यभार जव्हार नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचे समजते मात्र त्यांचाही येथे अजून थांगपत्ता नसल्याने नागरिकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे़ थोडयाच दिवसांत शाळा सुरु होणार असल्याने त्यासाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासणार आहे़ मात्र या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास कुणासही वेळ नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे़विक्रमगड नगरपंचायतीची लोकसंख्या ८ हजार ३४० असून १७ गाव-पाडयांचा समावेश आहे़ या सर्व पंचक्रोशिचा संपूर्ण कारभार हा याच नगरपंचायतीमार्फत चालतो १५ कर्मचाऱ्यांची पदे न भरताच कारभार सुरु करण्यांत आल्याने विकासकामांना गती कशी येणार असा सवाल उपस्थित केला जात असतांनाच आता मुख्याधिकारी देखील गायब झाल्याने नगरपंचायतीचा पुरता बोजवारा उडालेला आहे़विदयार्थ्यांना विविध कामांसाठी तसेच शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले महत्वाचे दाखल, घरपटटी, अ‍ॅसेसमेन्ट उतारा, व इतर कागदपत्रे मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे़ त्यातच येथील गावपाडयांत केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत हगणदारी मुक्त गाव योजनेतून शौचालये बांधण्याचे काम जोमाने सुरु असून त्यासाठी लागणा-या धनादेशांवर मुख्याधिकाऱ्यांची सही आवश्यक असते, त्यामुळे ही कामे देखील रखडलेली आहेत़ शासनाने ग्रामपंचायत असताना असलेला कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून व नगरपंचायतीला आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती करून मगच नगरपंचायतींची स्थापना करणे आवश्यक होते. परंतु ते न करताच नगरपंचायत स्थापन केल्याने ढाँचा बदलण्यापलीकडे काहीही साध्य झालेले नाही.नगरपंचायतीकरीता शासन मान्य मंजूर पदांचा तपशिलनगरपंचायतीची एकंदरीत लोकसंख्या आजच्या घडीला १० हजारापर्यत आहे़ या लोकसंखेकरीता आधारावर नगरपंचायतीमधील गाव पाडयांच्या नियोजन विकास कामांच्यासाठी शासनमान्य मंजूर पदांचामध्ये १) सहायक कार्यालय अधिक्षक, २)सहायक मालमत्ता पर्यवेक्षक, ३)सहायक सार्वजनिक बांधकाम अभियंता, ४)सहायक पाणीपुरवठा अभियंता, ५)सहायक नगररचनाकार, ६)सहायक समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी, ७)करनिरिक्षक, ८)लेखापाल, ९)लिपिंक टंकलेखक, १०)गाळणी चालक, वीजतंत्री जोडारी, ११)पंप आॅपरेटर, वीजतंत्री जोडारी, १२)शिपाई, १३) मुकादम, १४) व्हालमन, १५)स्वच्छता निरिक्षक़ अशी एकुण मुख्याधिकारी सोडून १५ पदांपैकी एकही पदे भरलेले नाही़