शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मतदार यादी पुन:परीक्षण कार्यक्रमाचा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:35 IST

तक्रारींचा पाऊस : निमंत्रण पत्रिकाच पोहचल्या नाही, शासकीय यंत्रणा तोंडघशी

वसई : मतदार यादी पुन:निरीक्षण कामासाठी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांनी बी.एल.ओ ची भूमिका योग्य प्रकारे पार पाडावी व हे राष्ट्रीय कार्य समजावे असे परखड मत उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी महाजन यांनी निवडणूक संबधी माहिती देताना व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपस्थितांची रोडावलेली संख्या व या मोहिमेचे व्यापक उद्दिष्ट पाहता या मोहिमेचा पुन्हा फज्जा उडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र आणि मतदार याद्यांचा पुन:निरीक्षण कार्यक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. अडीच मतदारसंघ असलेल्या वसई तालुक्यात सुद्धा हा कार्यक्र म सहकार व महसूल यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दुपारी वसईतील सोमवंशीय क्षत्रिय सभागृह येथे आयोजित केला होता. दरम्यान, पालघर जिल्हा निवडणूक अधिकारी महाजन यांच्या निर्देशाने अवघ्या दोन दिवसाच्या कालावधीत हा महत्वाचा कार्यक्र म गडबडीत आयोजित करून वसईतील गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष व सचिव यांच्यासोबतच्या बैठकीसाठी हा राबविण्यात आला होता. मात्र, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही हा कार्यक्र म यशस्वी करू असे ठोस आश्वासन देणारे सहकार खाते आणि त्यांचे उपनिबंधक सोबत पालघर जिल्हा फेडरेशन या कार्यक्र माला उपस्थित असणारी गृहनिर्माण संथाच्या पदाधिकाºयांची संख्या पाहून चांगलेच तोंडघाशी पडले. परिणामी तासाभराने सुरु झालेल्या या महत्वपूर्ण कार्यक्र माचे मुळातच योग्य नियोजन व बहुतांशी पदाधिकाºयांना योग्य निमंत्रण न दिल्याने वसई तालुक्यातील साडेसहा हजार गृहनिर्माण संस्थांपैकी केवळ ५७ गृहनिर्माण सस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित राहिले. तसेच वसई प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी या मतदार याद्या कार्यक्र माची विस्तृत माहिती देताना मतदार नोंदणीच्या विशेष कार्यक्र मात जिल्ह्यातील सर्व मतदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रि य भाग घेऊन निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे असे ही सांगितले. यावेळी मंचावर जिल्हा निवडणूक अधिकारी महाजन, प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर, सहकारी संस्था, वसई उपनिबंधक प्रियांका गाडीलकर, नायब तहसीलदार मनीषा पिंपळे, विसपुते, ए आर, नालासोपारा अर्चना कदम , आणि जिल्हा हौसिंग फेडरेशन अध्यक्ष हार्दिक राऊत उपस्थित होते.साड सहा हजारांपैकी ५७ संस्थांची हजेरीया कार्यक्रमाला साडे सहा हजारापैकी केवळ ५७ संस्थेने आपली उपस्थित लावली त्यामुळे अन्य संस्थांना त्याची माहितीच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा रविवारी हा कार्यक्र म लावावा अशी मागणी करण्यात आली. तसेच अडीच मतदारसंघ असलेल्या वसई ,नालासोपारा व विरार भागातील व नवीन मतदार पाहता असे नियोजन करून विभागवार कार्यक्र म पुढील दिवसात व सुटीच्या दिवशी घेण्यात यावा अशा सूचना उपस्थितांनी केल्या.अध्यक्ष, सचिवांना बीएलओ चे काम सक्तीचेकरून वर्ष २०१० आणि २०१२ साली मतदार यादी पुन:निरीक्षण कामासाठी गृहनिर्माण संस्थांनी सहकार्य करणे अनिवार्य असल्या बाबतचे शासन आदेशाचे परिपत्रक आहे. तसे ते या पूर्वी ही पाठवण्यात आले होते. मात्र, अनेक गृहनिर्माण संस्थांनी हे परिपत्रक वाचण्याची तसदी देखील घेतली नाही त्यामुळे सर्वत्र गोंधळ आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार