शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

विद्यार्थी आंदोलनाचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:36 IST

जिल्हा परिषदेने १२९ शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात काल विद्यार्थ्यांनी काढलेला कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, बकºया मोर्चा यशस्वी झाला असून जिल्ह्यातील या शाळा सुरूच राहणार

पालघर : जिल्हा परिषदेने १२९ शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात काल विद्यार्थ्यांनी काढलेला कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, बकºया मोर्चा यशस्वी झाला असून जिल्ह्यातील या शाळा सुरूच राहणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. त्यामुळे विद्यार्थी तिथे शाळा ही शासनाची घोषणा कृतीत येण्यास बरीच मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षणमंत्री तावडे यांनी माघार घेतली आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या सभेत झालेल्या चर्चेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील आदिवासी भागातील शून्य ते तीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १२९ प्राथमिक शाळा बंद करण्याचे आदेश १२ जुलै रोजी दिले होते. शिक्षण हक्क कायद्याचा व शासनाच्या आदेशाचा आधार या कारवाईसाठी घेण्यात आला असला तरी पालघर जिप व्यतिरिक्त इतर कोणत्याही जिल्ह्याने ह्याबाबत अजूनही निर्णय घेतलेला नव्हता. ह्या कारवाई च्या अंमलबजावणी पूर्वीच केंद्रप्रमुखानी अनेक चुका केल्याचे निदर्शनास आले होत्या.त्यामुळे ह्या आदेशाच्या व कारवाईच्या निषेधार्थ गुरूवारी श्रमजीवी संघटनेच्यावतीने शेकडो विद्यार्थी,त्यांचे पालक ह्यांनी ‘दप्तर घ्या आणि बकर्या द्या’ अशी मागणी करून जि. प. मुख्यालयावर मोर्च्या काढला होता. शिक्षण हक्क कायद्या नंतर गाव तेथे शाळा नव्हे तर मूल तेथे शाळा (शिक्षणाची व्यवस्था) असायला हवी असे धोरण महाराष्ट्राला अभिप्रेत असताना प्रशासन आहे त्या कशा बंद करू शकतो असा सवाल लोकप्रतिनिधींनीही उपस्थित केला होता. त्याचे उत्तर कुणाकडेच नव्हते.