शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

हलगर्जीमुळे कंत्राटी वीज कामगाराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:22 IST

महावितरण ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी यांनी आपल्या कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे वैभव पंगारा (२५) या कंत्राटी कर्मचाऱ्यांला जीव गमवावा लागला आहे.

वाडा : महावितरण ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी यांनी आपल्या कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे वैभव पंगारा (२५) या कंत्राटी कर्मचाऱ्यांला जीव गमवावा लागला आहे. हा प्रकार शुक्र वारी संध्याकाळी साडेसात वाजता अभनपाडा (अबिटघर) येथे घडला.अबिटघर येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तो सुरळीत करण्यासाठी महावितरणचे वाडा विभागाचे कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी हे ग्रामीण भागात कंत्राटी काम करणाºया तीन कामगारांना घेऊन गेले. अबिटघर येथील वीज उपकेंद्र (स्विचींग हाऊस) येथे बिघाड असल्याने या ठिकाणी उच्च दाबाने (२२ के.व्ही.) आलेला विद्युत प्रवाह बंद न करता कनिष्ठ अभियंता चौधरी यांनी कंत्राटी कामगारांकडून काम करण्यास सुरवात केली.उच्च दाबाचा विद्युत पुरवठा सुरु च ठेवल्याने या ठिकाणी काम करीत असलेला कंत्राटी कर्मचारी वैभव पंगारा यास विजेचा जोरदार शाँक लागला व तो जागीच ठार झाला. ही घटना कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी यांच्या उपस्थितीत होऊनही त्यांनी कुठलीही तत्परता दाखवली नाही.या बेजबाबदारपणा बद्दल त्यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मरण पावलेल्या या कंत्राटी कामगाराच्या कुटूंबियांनी केली आहे. ती न केल्यास तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी वाडा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केला आहे. या अपघातामध्ये प्रवीण तरसे हा कामगारही जखमी झाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार