शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

बटाटा लागवडीचा डहाणूत वेगळा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:24 IST

मिश्र शेतीला मित्राकडून मिळाली चालना। पुढील वर्षी नियोजनबद्धपणे घेणार पीक

अनिरुद्ध पाटील 

डहाणू/बोर्डी : तालुक्यातील सरावली गावच्या रमेश रामू धोडी (५०) यांनी शेतीत बटाटा लागवडीचा प्रयोग पहिल्यांदाच केला आहे. या लागवडीला महिना झाला असून पीक चांगले बहरल्याने पुढील वर्षी नियोजनबद्धपणे पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.डहाणू-जव्हार मार्गावरील सरावलीतील मानफोड पाडा येथे रमेश रामू धोडी यांची दीड एकराची शेती आहे. खरिपात भात या पारंपरिक पिकाची ते लागवड करतात. त्यांची भिस्त मोगरा शेतीवर असून ५०० रोपांची बाग आहे. कुटुंबातील सदस्यांकडून पहाटे कळ्यांची खुडणी झाल्यावर ते उत्पादन मुंबईतील बाजारपेठेत पाठवले जाते. त्यांची ही संपूर्ण शेती शेण, गांडूळ, गोमूत्र, पाला-पाचोळा अशा सेंद्रिय खतावरच केली जाते. याकरिता भाताची पावळी नजीकच्या दुग्ध व्यावसायिकाला देऊन त्या बदल्यात शेण घेतले जाते.

धोडी यांच्या एका उत्तर भारतीय मित्राने त्यांना बटाटा लागवडीचा प्रयोग सांगितला. त्यानंतर मित्रासह त्यांनी शहरातील भाजी मार्केटमधील बटाटा व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करून विक्रीस अयोग्य म्हणून बाजूला काढलेले बटाटे त्यांनी गोळा केले. ते घरी आणून त्यापैकी लागवडीयोग्य निवडून सेंद्रिय खतावर सावलीत तीन दिवस ठेवल्यानंतर गादी वाफ्यावर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याची लागवड केली. तालुक्यात बटाटा पीक घेतले जात नसल्याने, त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक जण त्यांच्या शेताला भेट देत आहेत.वडिलांकडून शेतीचे तंत्र शिकलो असून आजतागायत नोकरी केलेली नाही. मित्राने बटाटा लागवडीला प्रोत्साहित करून मार्गदर्शन केले. हा प्रयोग यशस्वी झाला असून पुढील वर्षी व्यापारी तत्त्वावर बटाटा लागवड करण्याचा मानस आहे.’- रमेश रामू धोडी,शेतकरी सरावली/डहाणू 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdahanu-acडहाणू