शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

बटाटा लागवडीचा डहाणूत वेगळा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:24 IST

मिश्र शेतीला मित्राकडून मिळाली चालना। पुढील वर्षी नियोजनबद्धपणे घेणार पीक

अनिरुद्ध पाटील 

डहाणू/बोर्डी : तालुक्यातील सरावली गावच्या रमेश रामू धोडी (५०) यांनी शेतीत बटाटा लागवडीचा प्रयोग पहिल्यांदाच केला आहे. या लागवडीला महिना झाला असून पीक चांगले बहरल्याने पुढील वर्षी नियोजनबद्धपणे पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.डहाणू-जव्हार मार्गावरील सरावलीतील मानफोड पाडा येथे रमेश रामू धोडी यांची दीड एकराची शेती आहे. खरिपात भात या पारंपरिक पिकाची ते लागवड करतात. त्यांची भिस्त मोगरा शेतीवर असून ५०० रोपांची बाग आहे. कुटुंबातील सदस्यांकडून पहाटे कळ्यांची खुडणी झाल्यावर ते उत्पादन मुंबईतील बाजारपेठेत पाठवले जाते. त्यांची ही संपूर्ण शेती शेण, गांडूळ, गोमूत्र, पाला-पाचोळा अशा सेंद्रिय खतावरच केली जाते. याकरिता भाताची पावळी नजीकच्या दुग्ध व्यावसायिकाला देऊन त्या बदल्यात शेण घेतले जाते.

धोडी यांच्या एका उत्तर भारतीय मित्राने त्यांना बटाटा लागवडीचा प्रयोग सांगितला. त्यानंतर मित्रासह त्यांनी शहरातील भाजी मार्केटमधील बटाटा व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करून विक्रीस अयोग्य म्हणून बाजूला काढलेले बटाटे त्यांनी गोळा केले. ते घरी आणून त्यापैकी लागवडीयोग्य निवडून सेंद्रिय खतावर सावलीत तीन दिवस ठेवल्यानंतर गादी वाफ्यावर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याची लागवड केली. तालुक्यात बटाटा पीक घेतले जात नसल्याने, त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक जण त्यांच्या शेताला भेट देत आहेत.वडिलांकडून शेतीचे तंत्र शिकलो असून आजतागायत नोकरी केलेली नाही. मित्राने बटाटा लागवडीला प्रोत्साहित करून मार्गदर्शन केले. हा प्रयोग यशस्वी झाला असून पुढील वर्षी व्यापारी तत्त्वावर बटाटा लागवड करण्याचा मानस आहे.’- रमेश रामू धोडी,शेतकरी सरावली/डहाणू 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdahanu-acडहाणू