शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

वाहनतळ योजना कागदावरच, वसई-विरारमध्ये पार्किंगसाठी शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:05 IST

वसई-विरारमध्ये पार्किंगसाठी शोधाशोध : दुतर्फा वाहने उभी केल्यामुळे रहदारीला अडथळा

आशीष राणे 

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांच्या कडेला अथवा गल्लोगल्लीत छोट्या- मोठ्या रस्त्यांवरदेखील दोन्ही बाजूंनी वाहने उभी केल्यामुळे तेथील रहदारीला अडथळा तसेच या ठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याच्या अनेक तक्रारी महानगरपालिकेला वारंवार प्राप्त होत आहेत. यावर उपाय म्हणून बहुमजली वाहनतळ योजना आखण्याची घोषणा मध्यंतरी पालिकेने केली होती, परंतु ही योजना अद्याप कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेचे आयुक्त बी. जी. पवार यांनी वसई-विरार शहरात भेडसावणाऱ्या पार्किंग प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. मधल्या काळात नारायण मानकर हे महापौरपदी असताना त्यांनी वसई रोड नवघर येथे पहिले बहुमजली वाहनतळ (मल्टिस्टोरेड पार्किंग) उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली होती. पुढे याबाबत निविदा प्रक्रिया राबवून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आणला होता. मात्र या पार्किंग निविदेचे घोडे कुठे अडले हेच कळले नाही. त्यामुळे आज शहरातील पार्किंगची बिकट समस्या पाहता लागलीच प्रशासनाने या मल्टीस्टोरेड पार्किंगबाबत युद्धपातळीवर निर्णय घेतला नाही तर समस्या मोठी बिकट होईल, असे चित्र वसई-विरारमध्ये आहे.यापूर्वी अनेकदा वसई रोड, नालासोपारा आणि विरार येथे वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रात वनसाइड पार्किंग, वन वे-टू वे वाहतूक, नो पार्किंग झोन अशा विविध प्रकारे पार्किंगचे नियोजन केले जायचे तर ठिकठिकाणी नो पार्किंगचे सूचना फलकही लावले आहेत. त्यातच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी मानून सहकार्य करण्याचे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने नागरिकांना सातत्याने करण्यात येते, परंतु नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याचे वाहतूक पोलीस व महापालिकेचे म्हणणे आहे.बेवारस वाहनांना नोटिसा बजावल्या पण...च्याशिवाय महापालिका हद्दीमध्ये अनेक बेवारस वाहने रस्त्यांवर पडून आहेत. अथवा कितीतरी वाहने अनेक महिने, वर्षे रस्त्यांवर उभी आहेत. अशा वाहनांच्या मालकांना महापालिकेने नोटिसाही बजावल्या आहेत. मात्र तरीही रस्त्यांवर वाहने उभी असल्याचे दिसत आहे.याशिवाय बºयाचदा रस्त्यांवर ट्रक, कंटेनर, स्कूल बसेसची पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.च्वसईचा नवघर भाग, आनंदनगर, साईनगर, अंबाडी रोड, स्टेला, पार्वती क्रॉस, पंडित दीनदयाळ नगर, ओमनगर, माणिकपूर मुख्य नाका आणि खासकरून पश्चिम रेल्वेच्या स्टेशनांवरील पूर्व-पश्चिम जागेत दररोज मोठी वाहतूककोंडी होत असते.च्शहरांत सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांवर अनधिकृत गॅरेज सुरू दिसतात. त्यामुळे प्रचंड कोंडी होत असते. शिवाय तेथे पंक्चरचे पाणी, प्लास्टिक रॅपरचा कचरा तसाच टाकला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छताही पसरते. गॅरेजचालकांकडून वाहन दुरुस्तीसाठी करण्यात येणारा रस्त्याचा वापर त्वरित थांबवावा अन्यथा त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTrafficवाहतूक कोंडी