शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार; पालघरमध्ये ‘विकेल ते पिकेल’ संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 22:55 IST

पालघरमध्ये ‘विकेल ते पिकेल’ संकल्पना : दलालांकडून होणारी लूट थांबणार

पालघर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्पादित भाजीपाला आता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित योजना पालघर शहरात कार्यान्वित होत असून तहसीलदार सुनील शिंदे यांनी कृषी अधिकाऱ्यांसह बैठक घेत तीन ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दलालांकडून होणारी लूट आता थांबणार असून त्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळत आर्थिक स्तर उंचावणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकार घेणाऱ्या ‘विकेल ते पिकेल’ या कृषी विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीला पालघर तालुक्यात सुरू करण्यात आली आहे. कृषी व पणन विभागाच्या समन्वयाने संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची सुरुवात करून थेट शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्थेला नवीन वर्षात सुरुवात होत आहे. पालघर तहसीलदार कार्यालयासमोर, माहीम रोडवरील कृषी संशोधन केंद्र आवार आणि मनोर मच्छी मार्केटजवळ अशा तीन ठिकाणी विक्री स्टाॅलची जागा निश्चित करण्यात आली आहे.

बुधवारी तहसीलदार सुनील शिंदे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, तालुका कृषी अधिकारी तरुण वैती आदी अधिकाऱ्यांनी प्रगतिशील शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी यांची बैठक पार पडली. ग्राहकांचा जास्तीतजास्त प्रतिसाद मिळेल, या दृष्टीने प्रयत्न करून जास्त ग्राहक असलेल्या सोसायट्यांमध्ये कायमस्वरूपी व्यवस्था उभी करण्याचे आदेशही यंत्रणांना देण्यात येणार असल्याने जास्त वस्ती असलेल्या रहिवासी संकुलात ताजा, स्वस्त आणि स्वच्छ भाजीपाला उपलब्ध होणार आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार