शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

वसईत अव्वाच्या सव्वा दराने भाजीविक्री

By admin | Updated: August 11, 2015 23:29 IST

वसई-विरार परिसरात भाज्यांच्या दराने उच्चांक गाठला आहे. सर्व भाज्या १०० ते १५० रू. किलो या दराने विकण्यात येत आहेत. एकीकडे मच्छीचे मार्केट ओस पडले असताना भाज्यांचे भावही

वसई : वसई-विरार परिसरात भाज्यांच्या दराने उच्चांक गाठला आहे. सर्व भाज्या १०० ते १५० रू. किलो या दराने विकण्यात येत आहेत. एकीकडे मच्छीचे मार्केट ओस पडले असताना भाज्यांचे भावही चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे नागरीकांना सध्या अव्वाच्या सव्वा दराने भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत.वसई विरार परिसरातील भाजी मार्केटमध्ये नाशिक, कळंब, अर्नाळा, पालघर व डहाणू या भागातून भाजीपाला येत असतो. मध्यंतरीच्या काळात भाज्यांचे भाव घसरले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून भाज्यांच्या दराने अचानक उसळी घेतली. हिरवा वटाणा १६० रू. किलो, कांदा ४० रू. किलो, टॉमेटो ३० ते ३५ रू. किलो, कोबी, घेवडा, गवारी, भेंडी, दुधी, भोपळा प्रत्येकी १०० रू. किलो या दराने विकण्यात येत आहे. त्यामुळे भाज्यांनाही मागणी कमी प्रमाणात होत आहे. मच्छीमार्केट ओस पडले आहेत त्यामुळे भाज्यांना चांगली मागणी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु भाज्यांच्या चढ्या दरामुळे ग्राहकवर्ग फिरकत नसल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.भाज्यांच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नाही. मनमानी पद्धतीने दर लावण्यात येतात. अन्य पर्याय नसल्यामुळे भाज्या खरेदी करणे भाग असते. बाहेरून येणाऱ्या भाज्यांचा दर अधिक असल्यामुळे स्थानिक भाजीविक्रेतेही त्याच दराने आपली भाजी विकत असतात. - सुनिला यादव, विरारघाऊक बाजारातच चढ्या दराने भाजी खरेदी करावी लागते. या भाज्या ने-आण करणे, त्यावर येणारा खर्च वाढतो आहे. भाज्यांची आवक कमी झाली कि दर वाढतात ही वस्तुस्थिती आहे. सध्या घाऊक विक्रेतेही बाहेरून येणाऱ्या भाज्यांच्या दराशी बरोबरी करून विक्री करू लागल्यामुळे भाज्या महाग झाल्या आहेत हे खरे आहे.- शामसुंदर पासवान, भाजीविक्रेता