शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
3
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
4
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
5
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
6
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
7
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
8
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
9
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
10
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
11
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
12
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
13
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
14
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
15
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
16
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
17
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
18
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
19
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
20
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

‘लालपरी’साठी वसईकर एकवटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 23:04 IST

चौकसभांतून जनजागृती : एस.टी.चा मार्ग मोकळा करण्यासाठी सुरू केली चळवळ

विरार : वसईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली मात्र शहरातून हद्दपार झालेली एस.टी. आता पुन्हा शहरात धावावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी शहरातील ग्रामस्थ एकवटले असून एक चळवळ उभी केली जात आहे. या चळवळीतून वसईच्या पश्चिम पट्ट्यात चौकसभांच्या माध्यमातून जनजागृती सुरू झाली आहे.

एस.टी. म्हणजे ग्रामीण भागातील प्रवाशांचा मोठा आधार असतो. वसईकरांसाठी ही एस.टी. महत्त्वपूर्ण भूमिका बजवायची. निव्वळ प्रवासाचे साधन सोडाच वसईकरांची अर्थव्यवस्थाच या एस.टी.शी निगडित होती. कारण वसईच्या शेतात पिकणारा ताजा भाजीपाला, फुले, दूध याच एस.टी.तून शहराबाहेर विक्रीसाठी नेला जात होता. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था एस.टी.वर टिकून होती. मात्र प्रवाशांच्या हक्काची व जिव्हाळ्याची एस.टी. २०१७ साली वसई-विरारमधून तोट्याचे कारण देत हद्दपार झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले होते.

तरीही एस.टी. फेऱ्या बंदच्या विरोधात वसईतील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलन केली होती, मात्र याचा काहीही एक फायदा झाला नाही.दरम्यान, जशी एस.टी. सेवा बंद झाली तशी वसई विरार महापालिकेने २०१२ साली ठेकेदार स्वरूपात परिवहन सेवा सुरू केली. मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे परिवहन सेवेविरोधात अनेक तक्र ारी पुढे येऊ लागल्या. यामध्ये निकृष्ट दर्जाच्या बस, प्रदूषणकारी धूर ओकणाºया बसेस, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासीवाहतूक, शासनाला न भरलेला प्रवासी कर आणि बालपोषण अधिभार, वाहनतळ नसल्याने होणारी प्रवाशांची गैरसोय, परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार, सततचा संप अशा अनेक समस्या पुढे येत होत्या. त्यातच २०२० वर्ष उजाडल्यावर या समस्या वाढतच गेल्या.परिवहन कर्मचाºयांचा पगार वेळेवर न झाल्याने व इतर विविध मांगण्यासाठी या कर्मचाºयांनी गेल्या दोन महिन्यात दोनदा परिवहन सेवा बंद पाडली होती. त्यामुळे ११ दिवस परिवहन सेवा बंद होती. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना व नोकरदार वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागला. त्यातच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची ही मोठी गैरसोय झाली होती. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे सुद्धा अतोनात हाल झाले होते.परिवहन कर्मचाºयांच्या आंदोलनांमुळे प्रवासी वैतागलेच्सततच्या होणाºया या आंदोलन व परिवहन समस्यांमुळे विविध वर्गातील प्रवासी या सेवेला वैतागले आहेत. त्यामुळे वसईतून हद्दपार झालेली एस.टी. पुन्हा सुरू व्हावी, यासाठी वसईतील आम्ही गासकर संघटना तसेच वसईतील अनेक सामाजिक संघटना यांनी मिळून एक चळवळ सुरु केली आहे.च्यामध्ये चौकसभा घेऊन ग्रामस्थांना आवाहन करीत सर्वांनी आपल्या वैयक्तिक ई-मेल आयडीवरून परिवहनच्या विविध समस्या आणि एस.टी.ची मागणी हे आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे परिवहन मंत्री, परिवहन सचिव, जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाची शहर बस-सेवा पुन्हा चालू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.च्पालिकेची परिवहन सेवा ठेकेदाराच्या मनमानीनुसार चालत आहे. दोन महिन्यात तीन वेळा ही परिवहन सेवा बंद पडली. तसेच परिवहन सेवा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असताना पालिकेने त्याकडे लक्ष देण्याऐवजी महोत्सवी कार्यक्रमाकडे जास्त लक्ष दिले जात असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांनी केली.परिवहन संपामुळे आमच्या गावातील चाकरमानी व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे परिवहन सेवा जर अशीच बंद होत राहिली तर प्रवास कसा करावा? त्यासाठी आम्हाला पुन्हा वसईत एस.टी. हवी आहे. म्हणून आम्ही ही चळवळ सुरू केली असून नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे.- जॉय फरगोस, आम्ही गासकर संघटना 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार